शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

पाच रुपयांमध्ये मिळणार वीस लिटर शुद्ध पाणी- जिल्ह्यातील ५१ गावांमध्ये ‘वॉटर एटीएम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 01:13 IST

केवळ एक रुपयामध्ये एक लिटर आणि पाच रुपयांमध्ये २० लिटर शुद्ध पाणी देणारे प्रकल्प कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने उभारले जात आहेत

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषदेकडून प्रकल्प उभारणी

समीर देशपांडे ।

कोल्हापूर : केवळ एक रुपयामध्ये एक लिटर आणि पाच रुपयांमध्ये २० लिटर शुद्ध पाणी देणारे प्रकल्प कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या वतीने उभारले जात आहेत. ५१ गावांमध्ये ७१ ठिकाणी हे प्रकल्प उभारले जात असून, सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हा नियोजन समितीमधून यासाठी निधी देण्यात आला आहे.

अनेक गावांमध्ये विविध कारणांनी पाणी दूषित होत असल्याने ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी ही योजना आखण्यात आली असून, या प्रकल्पांची उभारणी करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या यांत्रिकी विभागाकडे देण्यात आले आहे.

सामाजिक न्याय विभागाने यासाठी २०१७/१८ साली २ कोटी २ लाख; तर जिल्हा नियोजन समितीमधून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून ३७ गावांमधील अनुसूचित जाती जमाती वस्तींमध्ये ५२ ठिकाणी; तर नियोजनच्या निधीतून १४ गावांमध्ये १९ ठिकाणी हे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्या गावामधील किंवा वस्तीमधील १०० चौरस फुटांची जागा, पाणीपुरवठा आणि विजेची सोय उपलब्ध झाल्यानंतर तेथे या प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. एका प्रकल्पासाठी ३ लाख ३ हजार रुपये खर्च निश्चित करण्यात आला आहे.

या प्रकल्पातून प्रतितास २५० लिटर शुद्ध पाणी मिळणार असून १ लिटरसाठी एक रुपया आणि २० लिटरसाठी पाच रुपयांचे नाणे या यंत्रामध्ये टाकावे लागणार आहे. यातून जे पैसे जमा होणार आहेत, ते यंत्रणा उभारणाºया ठेकेदाराला दिले जाणार असून त्यांच्या कंपनीनेच तीन वर्षे या प्रकल्पाची देखभाल करायची आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्यायचे उपायुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला जात असल्याचे ‘यांत्रिकी’चे उपअभियंता उत्तम थोरात यांनी सांगितले.या गावांना लाभशिरोळ : धारवाड, घालवाड, लाटवाडी, शिरदवाड, हेरवाड, तमदलगे, खिद्रापूर, तेरवाड.हातकणंगले : खोतवाडी, तारदाळ, लक्ष्मीवाडी, आळते, नेज, रेंदाळ, नरंदे, घुणकी, कबनूर, कोरोची, चावरे.करवीर : कणेरी, दिंडनेर्ली, गडमुडश्ािंगी, वळीवडे, वसगडे, निगवे खालसा, कळंबे तर्फ ठाणे, उचगाव, चिंचवाड.आजरा : चाफवडे, सातेवाडी, वडकशिवाले, लाटगाव, सोहाळे, मलिग्रे.गडहिंग्लज : बड्याचीवाडी, कडगाव, कौलगे, कवळीकट्टी, दुंडगे, नेसरी.भुदरगड : खानापूर, कोळवण, भाटिवडे.चंदगड : सरोळी, गवसे.कागल : साके,सिद्धनेर्लीराधानगरी : सावर्डे, पाटणकर.पन्हाळा : पडळ, मसूदमालेयातील काही गावांमध्ये जागा उपलब्ध होत नसल्याने त्यांनी हा प्रकल्प नको असे लिहून दिले आहे.

 

टॅग्स :water transportजलवाहतूकkolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद