शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

कोल्हापूर जिल्ह्यात होणार १६५ समूह शाळा, २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या ४६८ शाळा

By पोपट केशव पवार | Updated: October 11, 2023 13:20 IST

प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू 

पोपट पवारकोल्हापूर : राज्यात कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समूह शाळा (क्लस्टर स्कूल) शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास १६५ समूह शाळा निर्माण होणार आहेत. या शाळांबाबतचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून लवकर ते शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत राज्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयास पाठविण्यात येणार आहेत.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या घराजवळ शिक्षण मिळणे गरजेचे आहे. मात्र, राज्यातील अनेक शाळांची पटसंख्या कमी असल्याने अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास अडचणी येतात. ही गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने समूह शाळांची संकल्पना पुढे आणली. नंदूरबार जिल्ह्यातील तोरणमाळ व पुणे जिल्ह्यातील पाणशेत येथे समूह शाळांचा उपक्रम राबविला. याच धर्तीवर इतर जिल्ह्यांत कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या परिसरात समूह शाळा सुरू करण्यात येणार आहेत.याबाबत शिक्षण आयुक्त कार्यालयाने सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना २१ सप्टेंबरला पत्र पाठवून कमी पटसंख्येच्या शाळांची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शिवाय अशा शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा तयार करण्यांदर्भातील प्रस्ताव १५ ऑक्टोबरपर्यंत पाठवण्यास सांगितले होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कमी पटसंख्येच्या शाळांची यादी तयार करून शाळांचे एकत्रिकरण करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. जिल्ह्यात २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या ४६८ शाळा आहेत. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास १६५ समूह शाळा निर्माण होतील. याबाबतचे प्रस्ताव लवकरच शिक्षण आयुक्त कार्यालयास पाठविण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या शाळा (१ ते २० विद्यार्थी )आजरा-४४, भुदरगड-५९, चंदगड-६०, गडहिंग्लज-२०, गगणबावडा-२९, हातकणंगले-११, कागल-११, करवीर-१२, पन्हाळा-३२, राधानगरी-७६, शाहूवाडी-९९, शिरोळ-१५

जिल्ह्यात वाहतूक व्यवस्थेचे आव्हानज्या शाळांमध्ये पटसंख्या कमी असेल अशा शाळांचे एकत्रिकरण करून समूह शाळा बनतील. पटसंख्या कमी असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना समूह शाळेत ने-आण करण्यासाठी शाळाच वाहतुकीची व्यवस्था करणार आहे. शाहूवाडी, राधानगरीसारख्या अतिदुर्गम भागात रस्त्यांअभावी वाहतूक व्यवस्था करणे मोठे आव्हान असणार आहे.

समूह शाळेचे हे आहेत निकष

  • कमी पटसंख्येच्या शाळांपासून समूह शाळा मध्यवर्ती ठिकाणी असावी, ती बाराही महिने सुरू असलेल्या रस्त्याने जोडली असावी.
  • कमी पटसंख्येच्या शाळांपासून समूह शाळेपर्यंतचा बसप्रवास ४० मिनिटांपेक्षा कमी असावा

गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा व विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन, बौध्दिक क्षमता विकसित होण्यासाठी समूह शाळा गरजेच्या आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतर या शाळांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल. - उदय सरनाईक, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण, जिल्हा परिषद कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळा