शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सुनेच्या बाळंतपणासाठी नको सासऱ्याला निवडणूक ड्युटी, सरकारी कर्मचाऱ्यांची भन्नाट कारणे

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: April 18, 2024 17:16 IST

कोल्हापूर जिल्ह्यातून १६०० जणांचे अर्ज दाखल, कोणाला मिळते सूट..वाचा सविस्तर

इंदुमती गणेशकोल्हापूर : सुनेचे बाळंतपण आहे. त्यामुळे निवडणुकीची ड्युटी नको, अशी सासऱ्याची मागणी आहे. मी खूप बिझी असल्याने मला वेळ नाही, मी एमपीएससीचा अभ्यास करीत आहे, आठ वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले आहे, अशी भन्नाट कारणे देत जिल्ह्यातील जवळपास १६०० कर्मचारी-शिक्षकांनी मतदानाच्या दिवशी कामकाजातून मला वगळावे, अशी विनंती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. यातील कारणांची सत्यता पडताळूनच अर्ज मंजूर किंवा नामंजूर केले जाणार आहेत.

लोकसभेसाठी जिल्ह्यात कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदार होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १९ हजारांवर शासकीय कर्मचारी, शिक्षकांना निवडणूक ड्युटी लावण्यात आली आहे. त्यांचे पहिले प्रशिक्षण ५ तारखेला पार पडले. त्यावेळी गैरहजर असलेल्या १ हजार ४० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे.निवडणुकीची ड्युटी नको म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जवळपास १६०० कर्मचाऱ्यांचे अर्ज आले आहेत. त्यामध्ये काही जणांची कारणे अगदी योग्य आहेत किंवा खरेच त्यांना ही ड्युटी करणे अडचणीचे आहे, पण बहुतांश जणांनी फक्त जबाबदारीचे काम नको, यासाठी वाट्टेल ती कारणे देऊन ड्युटी रद्द करण्याची मागणी केली आहे. यातील अनेक कारणे तर भन्नाट आणि न पटणारी आहेत.

कोणाला मिळते सूट

  • गरोदर माता, स्तनदा माता .
  • गंभीर आजार असलेली व्यक्ती
  • दीर्घकाळ रजेवर असलेली व्यक्ती
  • मोठी शस्त्रक्रिया
  • निवृत्तीला ६ महिने राहिले आहेत
  • तातडीच्या सेवा द्यावी लागते असे क्षेत्र
  • जास्त दिव्यांगत्व असलेली व्यक्ती

दिलेली कारणे

  • नातेवाइकाचे लग्न
  • रक्तदाब आणि मधुमेह
  • मराठी येत नाही
  • पीएच. डी. सुरू आहे
  • नवरा-बायको दोघांना ड्युटी कशाला?
  • पालकांकडे, मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नाही

जबाबदारी नको, हे मूळ कारणपाच वर्षांतून एकदा आणि जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसांसाठी निवडणुकीची ड्युटी असते. ज्यांना खरेच अडचणीचे आहे, त्यांना वगळले तर इतरांना फक्त जबाबदारीचे काम नको असते किंवा चूक झाली तर काय करायचे, ही भीती असते. त्यामुळे ते ड्युटी रद्द करण्यासाठी प्रयत्न करीत असतात.

महिलांनाही नको केंद्राध्यक्षाची जबाबदारीकेंद्राध्यक्षाची जबाबदारी ही मुख्यत्वे पुरुष कर्मचाऱ्यांनाच दिली जाते. मोजून शंभर महिलांना केंद्राध्यक्षाची जबाबदारी देण्यात येत आहे. मात्र, तीदेखील नको असे महिलांचे म्हणणे आहे. महसूल प्रशासनातील ५० टक्के कामकाज महिला सांभाळतात, पोलिस अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी अशा मोठ्या पदांची जबाबदारी महिला सांभाळत असताना एक दिवसाची केंद्राध्यक्षाची जबाबदारी महिलांना नको आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४