शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

१६ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हवेतच- कोल्हापूर विभागातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 01:10 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत पात्र ठरलेल्या कोल्हापूर विभागातील १६,८९५ विद्यार्थ्यांना वर्ष संपले तरी अद्याप ही शिष्यवृत्ती मिळालेली नाही

ठळक मुद्दे आॅनलाईनचा फटका

संतोष मिठारी।कोल्हापूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत पात्र ठरलेल्या कोल्हापूर विभागातील १६,८९५ विद्यार्थ्यांना वर्ष संपले तरी अद्याप ही शिष्यवृत्ती मिळालेली नाही. अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेतील गोंधळामुळे ती थकीत आहे. गुरुवारीच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निम्म्या शुल्कावरच प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत; परंतु गतवर्षीच्या शिष्यवृत्ती शुल्काचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे सरकारच्या योजना म्हणजे पुढचे पाठ..मागचे सपाट, अशा धाटणीच्या ठरत आहेत.

या योजनेअंतर्गत शासन अनुदानित (शासकीय अभिमत विद्यापीठांसह), खासगी विना अनुदानित (खासगी अभिमत, स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठे वगळून) महाविद्यालये अथवा तंत्रनिकेतनमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सहा लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना (व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशित विद्यार्थी वगळून) शिक्षण शुल्काच्या ५० टक्के शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यात पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

या संबंधीचा शासन आदेश दि. ७ आॅक्टोबर २०१७ ला उच्च व तंत्रशिक्षण विभागाने काढला. यापूर्वी आॅगस्ट-सप्टेंबरदरम्यान पात्र विद्यार्थ्यांचे ‘महाडीबीटी’ पोर्टलवर आॅनलाईन अर्ज मागवले. मात्र, आॅनलाईन अर्ज प्रक्रियेत त्रुटी राहिल्याने पुन्हा आॅफलाईन पद्धतीने अर्ज मागवले. कोल्हापूर विभागांतर्गत असलेल्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील १६,८९५ पात्र विद्यार्थ्यांसाठी ६ कोटी ८२ लाख ३७ हजार ३० रुपये इतके शुल्क मार्चमध्ये मंजूर झाले. मात्र,आॅफलाईन अर्जातील बँक खाते, आयएफसी कोड आदी तपासणी सुरू आहे. अर्ज आॅनलाईन आणि आॅफलाईन मागविण्याच्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला. शैक्षणिक वर्ष संपत आले, तरी त्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही.फक्त मराठा नव्हे..राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना ही केवळ मराठा समाजासाठी असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात ही योजना सर्व समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी आहे.शिक्षणशुल्क प्रतिपूर्ती अशीया योजनेअंतर्गत उत्पन्न मर्यादा अडीच लाख रुपये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी (शासकीय व अशासकीय अनुदानित) शंभर टक्के, (अंशत : अनुदानित, कायम विना अनुदानित) पन्नास टक्के , अडीच लाख ते सहा लाख रुपयांच्या मर्यादेसाठी पन्नास टक्के आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सहा लाखांपर्यंत उत्पन्न मर्यादेसाठी शंभर टक्के शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती देय आहे.महसूलमंत्र्यांचे आवाहनयोजनेतील पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्ती जमा झाल्यानंतर त्यातून महाविद्यालयाचे शुल्क भरावयाचे आहे; पण शिष्यवृत्तीच जमा झाली नसल्याने महाविद्यालयांचे शुल्क प्रलंबित आहे. अशा स्थितीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निम्म्या शुल्कावरच प्रवेश देण्याची महाविद्यालयांना सूचना दिली आहे. त्याला महाविद्यालये कितपत प्रतिसाद देणारा हा प्रश्नच आहे. 

कोल्हापूर विभागातील पात्र विद्यार्थ्यांच्या अर्जांच्या छाननी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात येईल.- डॉ. अजय साळी, कोल्हापूर विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण.

टॅग्स :onlineऑनलाइनkolhapurकोल्हापूर