शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कोल्हापूर विभागातील १६ साखर कारखान्यांचे क्षमतेपेक्षा कमी गाळप, पंधरा हजार मजूर आलेच नाहीत 

By राजाराम लोंढे | Updated: December 14, 2023 13:02 IST

कारखान्याचे आर्थिक गणित बिघडणार

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील १६ साखर कारखाने क्षमतेपेक्षा कमीने गाळप करत आहेत. परजिल्ह्यातील यंदा सुमारे १५ हजार मजूर कमी आल्याने अपेक्षित ऊस पुरवठा होत नसल्याने, रोज ६० हजार टनापेक्षा अधिकचा ऊस कमी पडत आहे. स्थानिक ऊसतोड मजूर असलेले पश्चिमेकडील काही कारखान्यांचे गाळप जोरात सुरू आहे.यंदा पाऊस कमी झाल्याने ऊस पिकांची वाढ अपेक्षित झालेली नाही. फेब्रुवारीपासून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा बसणार आहेत. पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने पिके जगविणे मुश्कील होणार आहे. अशा परिस्थितीत हंगाम वेळेत सुरू होईल, असे वाटत होते. मात्र, ऊस दराच्या आंदोलनामुळे महिनाभर हंगाम पुढे गेला. महिनाभर झाले हंगाम सुरू होऊन, आता हंगामाने गती घेणे अपेक्षित होते.मात्र, कोल्हापुरातील ९ व सांगलीतील ७ कारखान्यांचे क्षमतेपेक्षा कमी गाळप होत आहे. या कारखान्यांना रोज सरासरी ६० हजार टनांपेक्षा अधिक तुटवडा भासत आहे. आता ही परिस्थिती आहे, तर हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात काय करायचे, असा प्रश्न कारखान्यांसमोर आहे.

उताऱ्यात यंदा ‘राजारामबापू’च आघाडीवरसाखर उताऱ्यात पहिल्या महिन्यात सांगली जिल्ह्यातील राजारामबापू सहकारी साखर कारखाना व त्यांचेच करंदवाडी युनिट आघाडीवर आहे. त्या पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी कासारी कारखान्याचा उतारा राहिला आहे.या कारखान्यांनी केली इथेनॉलची निर्मितीकोल्हापूर : ‘वारणा’, ‘दत्त-शिरोळ’, ‘उदयसिंगराव गायकवाड’, ‘डी.वाय. पाटील’, ‘गुरुदत्त’, ओलम ॲग्रो, दौलतसांगली : दत्त इंडिया-सांगली, सोनहिरा-कडेगाव, उदगीर शुगर, सद्गुरू श्री.श्री-राजेवाडीविभागात दीड लाखांहून अधिक मजूरकोल्हापूर व सांगली जिल्ह्यात स्थानिकचे ५० हजार, तर परजिल्ह्यातील एक लाख असे दीड लाखाहून अधिक मजूर ऊस तोडणीचे काम करतात. मात्र, यंदा १५ ते १६ हजार परजिल्ह्यातील मजूर आलेलेच नाहीत. त्यामुळे ऊसपुरवठ्याचा गुंता तयार झाला आहे.

क्षमतेपक्षा कमी गाळप करणारे कारखाने कारखाना  -  क्षमता  -  सध्याचे गाळपवारणा  - १२ हजार - १० हजारदत्त-शिरोळ  - १२ हजार - १० हजार ८१०शाहू-कागल  -  ७ हजार ५०० - ७ हजार ३५०जवाहर-हुपरी  - १६ हजार - १४ हजार १००राजाराम-कसबा बावडा - ३ हजार ५०० - ३ हजार २५०गायकवाड  -  ६ हजार   - ४ हजार ७६०गुरुदत्त-टाकळीवाडी-  ६ हजार - ५ हजार ४२०संताजी घोरपडे - ८ हजार  -  ६ हजार २७५इंदिरा-तांबाळे   -  ४ हजार -   ३ हजार ६०२

ऊसतोड मजुरांची नवी पिढी या व्यवसायात येत नाही. इतर राज्यांच्या तुलनेत येथे मजुरी कमी असल्याने मजूर येत नाहीत. यंदा सरासरी १२ टक्के मजूर आलेले नाहीत. - डॉ.सुभाष जाधव (सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी-वहातूक संघटना)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने