शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

सीमाप्रश्न, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात १५ दिवस बंदी आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 13:21 IST

कोणतेही शस्त्र जवळ बाळगणे आणि पाच अगर पाचहून अधिक लोकांनी एकत्र येणे यावर बंदी

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तापलेले वातावरण, महाविकास आघाडीने उद्या दिलेला आंदोलनाचा इशारा आणि जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका या सर्व बाबींचा विचार करून कोल्हापूर पोलिसांनी आज शुक्रवारपासून १५ दिवसांसाठी बंदी आदेश जारी केला आहे. गुरुवारी रात्री उशिरा याबाबत आदेश काढण्यात आले आहेत.कर्नाटकामध्ये कन्नड वेदिके संघटनेने वाहनांवर केलेला हल्ला, त्याच्या कोल्हापूरमध्ये उमटलेल्या प्रतिक्रिया, त्यामुळे स्थानिक कन्नड व्यावसायिक आणि रहिवासी यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता तसेच महाविकास आघाडीने शनिवारी जाहीर केलेले आंदोलन आणि त्यासाठी बेळगावहून एकीकरण समितीच्या नेत्यांना दिलेले निमंत्रण या सर्व बाबींचा विचार करून हा बंदी आदेश जारी करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.आज शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून २३ डिसेंबर २०२२ रोजी रात्री १२ वाजेपर्यंतचा हा बंदी आदेश अपर जिल्हादंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी जारी केला आहे. त्यानुसार कोणतेही शस्त्र जवळ बाळगणे आणि पाच अगर पाचहून अधिक लोकांनी एकत्र येणे यावर बंदी आली आहे. साहजिकच आता महाविकास आघाडीलाही त्यांचे आंदोलन रद्द करावे लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकgram panchayatग्राम पंचायत