शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विमानतळासाठी जमीन देतो, तिप्पट मोबदला द्या!, १४६ खातेदारांनी अपेक्षित रकमेचा दिला अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 11:32 IST

प्रशासन देत असलेला दर व शेतकऱ्यांची प्रत्यक्ष मागणी याचा ताळमेळ जमत नसल्यानेच जमिनी ताब्यात घेण्याचा गुंता तयार झाला आहे.

कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळ विस्तारीकरणाच्या भूसंपादनासाठी १४६ खातेदारांनी अपेक्षित रकमेचा अर्ज दिला असून, ती रक्कम जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या रकमेच्या दोन ते तीन पट जास्त आहे. हे अर्ज आणि त्यावर आधारित अहवाल पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर होऊन त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. प्रशासन देत असलेला दर व शेतकऱ्यांची प्रत्यक्ष मागणी याचा ताळमेळ जमत नसल्यानेच जमिनी ताब्यात घेण्याचा गुंता तयार झाला आहे.

कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी मौजे मुडशिंगी (ता. करवीर) येथील जमीन संपादित करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने शेती, कृषक, अकृषक, औद्योगिक, महामार्गाला लागून असलेल्या जमिनी अशा वेगवेगळ्या प्रकारांत जमिनींचे मूल्यांकन केले आहे. ज्या बाधित खातेदारांना ही रक्कम अमान्य आहे, रक्कम वाढवून हवी आहे त्यांनी अपेक्षित रकमेचा अर्ज सादर करण्यासाठी प्रशासनाने शुक्रवारपर्यंतची मुदत दिली होती. या आठ दिवसांत प्रशासनाकडे एकूण १४६ अर्ज आले. त्यापैकी सर्वाधिक ८७ अर्ज हे शेत जमिनीचे आहेत. या खातेदारांनी दिलेली अपेक्षित रक्कम जिल्हा प्रशासनाने ठरविलेल्या रकमेच्या तिप्पट जास्त आहे. उर्वरित जमिनींसाठीदेखील दुप्पट जास्त रक्कम मागितली आहे. या अर्जांची छाननी करून पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे.

  • एकूण खातेदार : ९८२
  • सहमती पत्र दिलेले : १९०
  • दराबाबत अर्ज दिलेले : १८०

जमिनीचा प्रकार : प्रशासनाने दिलेला दर : अपेक्षित दर

  • शेती : ४. ५०. लाख : १२ ते १३ लाख
  • महामार्गाला लागून असलेल्या जमिनी : ७ लाख : १५ लाख
  • अकृषक : ९.६३ लाख : १२ ते १३ लाख
  • औद्योगिक : ११.२५ लाख : १८ लाख

उरलेल्या ६१२ खातेदारांचे काय?

ज्या ६१२ खातेदारांनी या दोन्ही प्रक्रियेत सहभाग घेतला नाही त्यांच्या बाबतीत दोन निर्णय होऊ शकतात. एकतर जिल्हाधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात सांगितल्याप्रमाणे भूसंपादन कायद्यानुसार जमिनी घेतल्या जातील. ही रक्कम २५ टक्के कमी असू शकते. दुसरा अपेक्षित रकमेचा अर्ज दिलेल्या खातेदारांनी दिलेल्या रकमेची सरासरी धरून त्यानुसार त्यांनाही दर दिला जाऊ शकतो.

विमानतळ विकासाला ब्रेक

कोल्हापुरातील शाहूपुरी परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांनी गुंतवणूक म्हणून येथे भूखंड घेतले आहेत. त्यांनी ते मूळ खरेदी करतानाच जास्त किमतीला विकत घेतल्याने आता त्यापासून चांगले पैसे मिळावेत, अशी त्यांची मागणी आहे. प्रशासन मात्र त्यास फारसे तयार नाही. परंतु यातून कोर्टबाजी झाली तर भूसंपादनाची प्रक्रिया रखडली जाऊ शकते. भूसंपादनाची प्रक्रियाच २०१८ पासून सुरू आहे. अजून त्यामध्ये किती वर्षे जातील तेवढा विमानतळाचा विकास लांबणीवर पडणार आहे याचा विचार दोन्ही घटकांनी करण्याची गरज आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळ