शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

उद्यापासून बारावी परीक्षेला सुरुवात; कोल्हापूर जिल्ह्यात ५१ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 1:29 PM

जिल्ह्यात ७३ केंद्र : भरारी पथकांद्वारे कॉपीला आळा

कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या करिअरचा महत्त्वाचा टप्पा मानली जाणारी बारावीची परीक्षा उद्या, बुधवारपासून सुरू होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ७३ केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेसाठी ५१ हजार १५५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. ही परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने सात भरारी पथके जिल्ह्यात कार्यरत असणार आहेत शिवाय प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांच्यासह विविध अधिकारीही केंद्रांना भेटी देणार आहेत.

बारावीच्या परीक्षेला उद्या, बुधवारपासून सुरुवात होणार आहे. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत १७५ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यासाठी विभागातील १ लाख १९ हजार १६८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. उद्या, बुधवारी इंग्रजीच्या पेपरपासून या परीक्षेला प्रारंभ होईल. २३ मार्चपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे.विभागाचे चित्र असेकोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात मिळून १७५ केंद्रे, एक लाख १९ हजार १६८ विद्यार्थी, २१ भरारी पथके.

परीक्षा केंद्रांवर कडेकोट व्यवस्थापरीक्षा काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, गैरप्रकार टाळण्याच्यादृष्टीने परीक्षा केंद्र परिसरातील शंभर मीटर परिसरात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. परीक्षार्थी, शिक्षणाधिकारी व शिक्षकांव्यतिरिक्त इतरांना प्रवेशास प्रतिबंध केलेला आहे. याशिवाय केंद्राच्या शंभर मीटर परिसरात एसटीडी बूथ, झेरॉक्स, फॅक्स केंद्र बंद राहणार आहे. परीक्षा केंद्रावर डिजिटल डायरी, मोबाईल, मायक्रोफोन, स्मार्टवॉच, वायरलेस या वस्तू नेण्यासाठी बंदी घातली आहे.

विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी. गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके कार्यरत असणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. -दत्तात्रय पोवार, - विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर.

सकारात्मक विचारांने सामोरे जा..विद्यार्थ्यांच्या जीवनातील दहावी व बारावी हा महत्त्वाचा टप्पा आहे. करिअरची सुरुवातच या टप्प्यावर निश्चित होते. त्यामुळे या परीक्षांचे जरूर महत्त्व असले तरी ही परीक्षा म्हणजेच सारे काही आहे असेही नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा, तयारी करावी. यशाचा आताच विचार न करता पेपरला शांतपणे सामोरे जावे. परीक्षेचा अनावश्यक ताणतणाव घेतल्यास त्याचा मनाच्या एकाग्रतेवर परिणाम होतो. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घेऊन त्यास सामोरे जावे, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHSC / 12th Exam12वी परीक्षा