शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

शिष्यवृत्तीचे थकले तब्बल १०२ कोटी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला 'खो'

By पोपट केशव पवार | Updated: September 25, 2023 13:24 IST

कागदपत्रे न अडवण्याचे समाजकल्याणचे आवाहन

पोपट पवारकोल्हापूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, शुल्कासाठी त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी सरकारने त्यांना शिष्यवृत्ती सुरू केली खरी. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या विद्यार्थ्यांना पहिला व दुसरा हप्ता पूर्ण मिळाला नसल्याने या विद्यार्थ्यांची फरपट सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २०२१-२२ व २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील तब्बल १०२ कोटी रुपयांहून अधिकची शिष्यवृत्ती थकली आहे. त्यामुळे संबंधित महाविद्यालय प्रशासन अशा विद्यार्थ्यांकडे फी वसुलीसाठी तगादा लावत असल्याच्या तक्रारी आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्री शिप, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता दिला जातो. यासाठी जिल्हा समाजकल्याण विभागाकडे अर्ज केल्यानंतर कागदपत्रांची तपासणी करून त्याला मंजुरी दिली जाते. अकरावीपासून ते पी.एचडी.पर्यंत विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्त्या दिल्या जातात. ही शिष्यवृत्तीची रक्क्म महाडीबीटी अंतर्गत वितरित केली जाते. मात्र, सध्या समाजकल्याण विभागाकडे निधीची कमतरता असल्याने ही शिष्यवृत्ती गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमाच झालेली नाही. यामुळे संबंधित कॉलेज व विद्यार्थ्यांमध्ये वादाचे प्रकार घडत आहेत. या शुल्कासाठी कॉलेज प्रशासन विद्यार्थ्यांकडे तगादा लावत आहेत.

कोणत्या प्रकारची शिष्यवृत्तीभारत सरकार, फ्री शिप शिष्यवृत्ती व राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीव्हीजेएनटी-एसबीसी                                 किती अर्ज आले      किती रक्कम दिली          थकित रक्कम२०२२-२३          २७४७८                ६०, ७, ८६, ५०९           २९, २, ४५.१०३ २०२१-२२           २५३५०                ८०, ७९, २७, ७४१          १, ९६, ३१, ८६० 

एस्सी प्रवर्गातील थकीत शिष्यवृत्ती                      किती अर्ज आले     किती रक्कम दिली     थकीत रक्कम२०२२-२३ :      १७९२१                 ३२, ९, ४, ५४९           ३७, ९२, ६५, ०००२०२१-२२ :     १८०७९                  ३३, ८७, १८००            ३२, ५४, ३२, १२७            

मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थकली असली तरी विद्यार्थ्याची कागदपत्रे अडवू नयेत असे पत्र संबंधित महाविद्यालयांना दिले आहे. जर कुणाच्या कागदपत्रांसाठी अडवणूक होत असेल तर समाजकल्याण विभागाशी संपर्क साधावा.  - सचिन साळे, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग कोल्हापूर

राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास अडचणी येत आहेत. यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. ही शिष्यवृत्ती सरकारने त्वरित वितरित करावी. - प्रा. शहाजी कांबळे, राज्य संघटन सचिव, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट )

टॅग्स :kolhapurकोल्हापूरScholarshipशिष्यवृत्ती