शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

शिष्यवृत्तीचे थकले तब्बल १०२ कोटी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला 'खो'

By पोपट केशव पवार | Updated: September 25, 2023 13:24 IST

कागदपत्रे न अडवण्याचे समाजकल्याणचे आवाहन

पोपट पवारकोल्हापूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, शुल्कासाठी त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी सरकारने त्यांना शिष्यवृत्ती सुरू केली खरी. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या विद्यार्थ्यांना पहिला व दुसरा हप्ता पूर्ण मिळाला नसल्याने या विद्यार्थ्यांची फरपट सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २०२१-२२ व २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील तब्बल १०२ कोटी रुपयांहून अधिकची शिष्यवृत्ती थकली आहे. त्यामुळे संबंधित महाविद्यालय प्रशासन अशा विद्यार्थ्यांकडे फी वसुलीसाठी तगादा लावत असल्याच्या तक्रारी आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्री शिप, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता दिला जातो. यासाठी जिल्हा समाजकल्याण विभागाकडे अर्ज केल्यानंतर कागदपत्रांची तपासणी करून त्याला मंजुरी दिली जाते. अकरावीपासून ते पी.एचडी.पर्यंत विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्त्या दिल्या जातात. ही शिष्यवृत्तीची रक्क्म महाडीबीटी अंतर्गत वितरित केली जाते. मात्र, सध्या समाजकल्याण विभागाकडे निधीची कमतरता असल्याने ही शिष्यवृत्ती गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमाच झालेली नाही. यामुळे संबंधित कॉलेज व विद्यार्थ्यांमध्ये वादाचे प्रकार घडत आहेत. या शुल्कासाठी कॉलेज प्रशासन विद्यार्थ्यांकडे तगादा लावत आहेत.

कोणत्या प्रकारची शिष्यवृत्तीभारत सरकार, फ्री शिप शिष्यवृत्ती व राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीव्हीजेएनटी-एसबीसी                                 किती अर्ज आले      किती रक्कम दिली          थकित रक्कम२०२२-२३          २७४७८                ६०, ७, ८६, ५०९           २९, २, ४५.१०३ २०२१-२२           २५३५०                ८०, ७९, २७, ७४१          १, ९६, ३१, ८६० 

एस्सी प्रवर्गातील थकीत शिष्यवृत्ती                      किती अर्ज आले     किती रक्कम दिली     थकीत रक्कम२०२२-२३ :      १७९२१                 ३२, ९, ४, ५४९           ३७, ९२, ६५, ०००२०२१-२२ :     १८०७९                  ३३, ८७, १८००            ३२, ५४, ३२, १२७            

मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थकली असली तरी विद्यार्थ्याची कागदपत्रे अडवू नयेत असे पत्र संबंधित महाविद्यालयांना दिले आहे. जर कुणाच्या कागदपत्रांसाठी अडवणूक होत असेल तर समाजकल्याण विभागाशी संपर्क साधावा.  - सचिन साळे, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग कोल्हापूर

राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास अडचणी येत आहेत. यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. ही शिष्यवृत्ती सरकारने त्वरित वितरित करावी. - प्रा. शहाजी कांबळे, राज्य संघटन सचिव, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट )

टॅग्स :kolhapurकोल्हापूरScholarshipशिष्यवृत्ती