शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त गावांच्या स्वच्छतेसाठी १ कोटी ९७ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 10:21 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील पुराचा फटका बसलेल्या २०६ गावांच्या स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने एक कोटी ९७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ही सर्व रक्कम सर्व ग्रामपंचायतींच्या खात्यांवर वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देपूरग्रस्त गावांच्या स्वच्छतेसाठी १ कोटी ९७ लाख२०६ ग्रामपंचायतींसाठी पंचायत समितीकडे निधी वर्ग

कोल्हापूर : जिल्ह्यातील पुराचा फटका बसलेल्या २०६ गावांच्या स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने एक कोटी ९७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ही सर्व रक्कम सर्व ग्रामपंचायतींच्या खात्यांवर वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले.गेल्या महिन्यामध्ये आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील ३१० गावे बाधित झाली आहेत. अनेक दिवस गावांत पुराचे पाणी राहिल्याने घनकचरा, ढिगारा, ओला कचरा साठून राहिला आहे. अशातच घराघरांतील भिजलेले साहित्य कचऱ्याच्या स्वरूपात बाहेर येत आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने गावातील सार्वजनिक स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब बनली आहे.

या सर्व कचऱ्याची नीटपणे विल्हेवाट लावण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलली आहेत. विखुरलेला कचरा गोळा करणे, त्याचे वर्गीकरण करणे आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसाठी ग्रामपंचायतींना निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र, याबाबत तातडीने निधीची मागणी केल्यानंतरही निधी लवकर मिळाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. पूरग्रस्त गावांच्या संख्येत सातत्याने बदल होत चालल्याने या कामाला गती आली नाही. अखेर गावांची संख्या निश्चित झाल्यानंतर हा निधी अदा करण्यात आला आहे.

या ग्रामपंचायतींना सन २०११ च्या जनगणनेनुसार १००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांना रु. ५०,००० आणि १००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना रुपये १,००,००० विशेष बाब म्हणून निधी प्राप्त झाला आहे. प्राप्त निधी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूरमार्फत घोषित केलेल्या ३१० पूरग्रस्त गावांना स्वच्छतेच्या कामासाठी दिला जाणार आहे.निधीची दिली होती ग्वाहीपूर ओसरल्यानंतर तातडीने गावांची स्वच्छता करणे आवश्यक होते; परंतु यासाठी शासन निधी देणार की नाही, हे स्पष्ट झाले नव्हते. अशात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी हा निधी मिळणार असल्याचे स्पष्ट करून स्वच्छतेची कामे हाती घेण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अनेक ग्रामपंचायतींनी स्वच्छतेची कामे हाती घेतली. त्यावर खर्चही केला. आता ही रक्कम संबंधित ग्रामपंचायतींना मिळणार आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदKolhapur Floodकोल्हापूर पूर