शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

कल्याणच्या पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 12:45 AM

लवकरच होणार वाहतुकीसाठी खुला

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पत्रीपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून, लवकरच तो सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी येथे दिली. पत्रीपुलाच्या कामाची पाहणी शिंदे यांनी केली. यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, रमेश जाधव, कैलास शिंदे, नवीन गवळी आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

रेल्वे मार्गांवरील भागात पत्रीपुलाचा गर्डर टाकल्यानंतर तेथे काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. स्लॅबचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. पोहोच रस्त्याचे कामही आता पूर्ण होत आले आहे. त्यामुळे हा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, कोरोना विषाणूच्या संकटामुळे या पुलाच्या कामाला विलंब झाला आहे. रेल्वे व राज्य रस्ते विकास महामंडळाने पत्रीपुलाच्या कामाला सहा महिन्यांची मुदतवाढ अलिकडेच दिली होती. त्यानंतर या पुलाचे काम एप्रिल, २०२१ मध्ये निश्चित पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्या आधीच पुलाचे काम पूर्ण होत असल्याचे शिंदे म्हणाले.

विरोधकांचा मुद्दा संपुष्टातपत्रीपुलाच्या कामात अनेक तांत्रिक अडचणी होत्या. त्यावर मात करीत पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुलाच्या विलंबामुळे विरोधकांनी शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले होते. मात्र, पुलाचे काम मार्गी लागत असल्याने विरोधकांचा मुद्दाच संपुष्टात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :kalyanकल्याण