शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नाक्यावर सभा घेणारी माणसं, यांना कोण ओळखतं; आशिष शेलारांच्या टीकेला राज यांचं प्रत्युत्तर

By प्रशांत माने | Updated: May 14, 2023 21:37 IST

'आम्ही राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेला फार महत्त्व देत नाही', अशी टीका शेलार यांनी केली होती.

कल्याण: कर्नाटक विधानसभेत काँग्रेसला मिळालेले यश हे भारत जोडो यात्रेचा परिणाम आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये दिली होती. यावर घरात बसून स्वप्न बघणारे स्वप्नातल्या प्रतिक्रिया देतात, अशी टीका आशिष शेलार यांनी केली होती. त्याला आता राज यांनी कल्याणमध्ये जोरदार प्रत्युत्तर दिले. 

मुळात अशा गोष्टी त्यांना सुचतात जे निवडणुका आल्या की, नाक्यावर सभा घेतात, अशी टीका ठाकरे यांनी शेलार यांचे नाव न घेता केली. भारत जोडो यात्रेचा परिणाम कर्नाटकाच्या विजयात झाला, हे तुम्ही मोठ्या मनाने मान्य केलेच पाहिजे. आपण एखाद्या पराभवानंतर काय बोध घेतो, आपल्याला तो घ्यायचाच नसेल तर वागा तसेच, असं राज ठाकरे म्हणाले. 

ते पुढे म्हणतात, ज्यांची पोच नाही, त्यांना अशा गोष्टी सूचतात. मुळात यांचं अस्तित्व हे नरेंद्र मोदींमुळे आहे. त्यांना खाली कोण ओळखतो, असंदेखील ठाकरे यावेळी म्हणाले. कल्याणमधील गटबाजी बाबत त्यांना विचारणा केली असता कल्याणमध्ये पक्षात कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही, एकवेळ मतभेद असतील याकडे त्यांनी लक्ष वेधले.

काय म्हणाले आशिष शेलार?मुंबईत माध्यमांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, 'कर्नाटकमध्ये राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव असेल, तर मग जालंधरमध्ये आम आदमी पक्षाचा विजय आणि काँग्रेसचा पराभव का झाला? उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही भाजपाला घवघवीत यश मिळालं, तिथे ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव नव्हता का? यावर राज ठाकरे बोलतील का? राज ठाकरे हे केवळ स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी प्रतिक्रिया देतात. घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो. आम्ही त्यांच्या प्रतिक्रियेला फार महत्त्व देत नाही,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAshish Shelarआशीष शेलारMNSमनसेBJPभाजपा