शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

कल्याण-डोंबिवलीतील रिक्षा जाताहेत तरी कुठे? गस्तीदरम्यान सराईत रिक्षा चोर पाेलिसांच्या जाळ्यात...

By मुरलीधर भवार | Updated: March 20, 2025 13:21 IST

पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्यायदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पाेलिस निरीक्षक संदीप भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.

मुरलीधर भवार -

कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरात रिक्षा चोरीला जात होत्या. त्यामुळे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या रिक्षाचोरीचा तपास करण्यासाठी पोलिस सक्रिय झाले होते. कोळशेवाडी पोलिसांची रात्रीची गस्त सुरू असताना कल्याण पूर्वेतील शंभरफुटी राेडवर रिक्षाचोरी करणारा सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याच्याकडून पोलिसांनी चार रिक्षा जप्त केल्या आहेत. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्यायदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पाेलिस निरीक्षक संदीप भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. विशाल वाघ यांनी या तपास कामात महत्त्वाची भूमिका बजावली. कल्याण पूर्वेतील शंभर फुटी रस्त्यावर पोलिसांची रात्रीच्या वेळी गस्त सुरू होती. त्यांनी एका रिक्षाचालकाला हटकले. त्याच्याकडे कागदपत्रे मागितली असता ती कागदपत्रे नव्हती, तसेच रिक्षा चालविण्याचा परवानादेखील नव्हता. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडे असलेली रिक्षा ही चोरीची होती. पोलिसांनी लगेचच त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याची चौकशी सुरू केली. त्याला अटक करून अधिक तपास केला असता त्याचे नाव राजेंद्र जाधव असल्याचे त्याने सांगितले. 

प्रसंगी वायर जोडून रिक्षा चोरायचा राजेंद्र जाधव हा पार्क करून ठेवलेल्या अथवा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा मास्टर कीचा वापर करून चोरी करायचा. ज्या ठिकाणी मास्टर की काम करत नसेल त्या ठिकाणी तो रिक्षातील वायरी जोडून रिक्षा सुरू करायचा आणि ती चोरून न्यायचा. 

या हद्दीतून रिक्षा चोरीसडोंबिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा रिक्षांची चोरी केली. कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तीन  रिक्षा चोरीला गेल्या होत्या. बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक रिक्षा चोरीस गेली होती. पोलिसांनी आतापर्यंत चोरीस गेलेल्या चार रिक्षा हस्तगत केल्या आहेत. या रिक्षा चोराच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यांत सहा गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यांची उकल पोलिसांकडून करण्यात येत आहे.

...अन् भंगारात विक्रीराजेंद्र जाधव सराईत चोरटा असल्याचे उघड झाले. त्याने यापूर्वी कल्याण-डोंबिवली हद्दीत दुचाकी आणि रिक्षाचोरी केल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. राजेंद्र हा बनावट चावीच्या आधारे पार्क करून ठेवलेल्या रिक्षा चोरी करून पसार व्हायचा. तो डोंबिवली पाइपलाइन परिसरात राहत होता. त्याचे आई-वडील नगरला राहतात. तो काही कामधंदा करीत नसल्याने रिक्षाचाेरीचा व्यवसाय सुरू केला होता. चोरी केलेल्या रिक्षा तो कर्जत येथील अहिल्यानगरात जाऊन १५ ते २० हजार रुपयांना भंगारात विकायचा. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस