शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

भाजपाच नेमकं चाललयं तरी काय? दुसऱ्यांदा घेतला निर्णयावरून 'यु'टर्न; कुणाची मैत्री आली आड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 18:12 IST

मोठा गाजावाजा करत भाजपाने पत्रकार परिषद घेत अपर पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र शुक्रवारी पुन्हा पत्रकार परिषद घेत  मोर्चा स्थगित केल्याची माहिती भाजपकडून घेण्यात आली.

कल्याणकल्याणडोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसं  राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राज्यात सेना आणि भाजप मध्ये राजकीय चिखलफेक सुरू असताना कल्याण डोंबिवलीही त्याला अपवाद कशी राहणार? मात्र घेतलेल्या भूमिकेवरून दुस-यांदा भाजपा पक्षाने यूटर्न घेतल्यानं भाजपा पक्षात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठा गाजावाजा करत भाजपाने पत्रकार परिषद घेत अपर पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र शुक्रवारी पुन्हा पत्रकार परिषद घेत  मोर्चा स्थगित केल्याची माहिती भाजपकडून घेण्यात आली.  भाजपाच्या बदलत्या भूमिकेमूळे  राजकीय वर्तुळात पुन्हा कुजबुज  सुरू झाली आहे. 

केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा नगरसेवकांना टार्गेट केलं जातं असल्याचा आरोप करत भाजपाने महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर पक्षाच्या ऑनलाईन बैठकीतही मोर्च्यावर आपण ठाम असल्याचं सांगण्यात आलं. मात्र शुक्रवारी अचानक अपर पोलीस आयुक्त कार्यालयावर आयोजित केलेला मोर्चा स्थगित करण्यात आली अशी माहिती पत्रकार परिषद घेऊन सांगण्याची नामुष्की भाजपावर ओढावली.  मात्र भाजपाने  अचानक कोलांटीउडी का मारली? याबाबत दबक्या आवाजात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्ते, पदाधिका-यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहे. यावरून हा मोर्चा होऊ नये अशीच सरकारची भूमिका असल्याचं दिसून येत. नोटिसा झुगारून आम्ही मोर्चा काढला तर आमच्या असंख्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतील याची आम्हाला कल्पना आहे असं भाजपा आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले. तसेच कार्यकर्त्यांना अजून अडचणीत आणण्याची इच्छा नाही त्यामुळे काही कालावधीपुरता हा मोर्चा स्थगित करण्यात आल्याचंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं. भाजपाकडून हे कारण सांगितलं जातं असलं तरी अलीकडच्या काळात  भाजपाच्या वतीने अनेक आंदोलनं शहरात करण्यात आली. मग त्यावेळी पोलिसांनी परवानगी दिली होती की नाही? असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.     केडीएमसीनं लागू केलेल्या घनकचरा व्यवस्थापन शुल्कावरून भाजप आणि सेनेमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. त्यावेळी सुद्धा आक्रमक होऊन भाजपाने केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा  केली होती. मात्र या निर्णयावरून ही पक्षाने यु टर्न घेतला होता. 

मैत्री आली आड? 

सेना आणि भाजपमध्ये तू तू मैं मैं चा खेळ सुरू असला तरी युती असो किंवा नसो  ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांची राजकारणापलीकडची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे राज्यात या दोन्ही पक्षात कितीही कटुता वाढत असली तरी स्थानिक पातळीवर जेव्हा जेव्हा विशेषतः सेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळी भाजपानं माघार घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता या निर्णयावरूनही भाजपानं यु  टर्न घेतला असून यामध्ये ही वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची मैत्री आड आली का? अशी चर्चा सुरु झाली आहे. पण दुसरीकडे भाजपमधील कार्यकर्ते दुखावले गेले असल्याचं बोललं जातंय. याबद्दल काही कार्यकर्त्यांना विचारलं असता त्यांनी चुप्पी साधनंच पसंत केलं.

टॅग्स :BJPभाजपाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली