शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आम्ही गांधीचे वारसदार, कायदा हातात घेणार नाही, पण...; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

By अनिकेत घमंडी | Updated: October 4, 2022 13:31 IST

पोलिसी वापर, गुंड लोकांना राजाश्रय नसावा हे नेत्यांनी लक्षात घ्यावे असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.

डोंबिवली - हिटलर जनतेच्या रेट्यापुढे टिकू शकला नाही. हा अतिरेक ठाणे जिल्ह्यात सुरू आहे. आम्ही गांधीचे वारसदार आहोत. कायदा हातात घेणार नाही पण अहिंसक आंदोलन करून उभे राहू. जनआंदोलन चिरडता येत नाही. ही वैचारिक लढाई आहे. अन्याय अत्याचार आम्ही सहन करणार नाही हे लक्षात घ्यावं असा इशारा माजी मंत्री राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पोलिसी वापर, गुंड लोकांना राजाश्रय नसावा हे नेत्यांनी लक्षात घ्यावे, एक माणूस क्रांती घडवतो हे लक्षात घ्यावे. सत्ता बदल आवर्जून होतो. शहरातील कायदा सुव्यवस्था कोलमडली असून ते योग्य नाही, भाजपचा कार्यकर्ता कसा असतो ही राजकीय दहशत या ठिकाणी दिसून येत असल्याचं आव्हाडांनी म्हटलं. 

डोंबिवलीकरांच्या सहनशिलतेला माझा मानाचा मुजरालोक मतदान कसं करतात, सुसंस्कृत शहर, विद्येच माहेर घर, स्मार्ट सिटी, सर्वगुणसंपन्न अस हे शहर आहे का? एक रस्ता दाखवा जिथे खड्डा नाही, वाईट जनतेच वाटतं, मत कोणत्या आधारावर देतात, कोणता सोन्याचा पत्रा इथं लावला आहे असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित करत डोंबिवलीकरांच्या सहनशिलतेला माझा मानाचा मुजरा असल्याचं खोचक विधान जितेंद्र आव्हाडांनी केले. 

काय आहे प्रकरण?कल्याण ग्रामीण मतदारसंघात संदप गावात राहणारे प्रल्हाद पाटील यांनी दिवा वसई मार्गावर ट्रेन खाली आत्महत्या केली, त्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ तयार केला होता, तो व्हिडिओ व्हायरल झाला. व्यवसायात त्यांना काही जणांनी त्रास दिला होता. त्यानुसार त्या प्रकरणी भाजप कार्यकर्ते माळी यांच्यासह पंधरा जणांविरोधात ठाणे लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे, माजी आमदार व जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळाने डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेत माळी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. तर संदप येथील व्यावसायिक प्रल्हाद म्हात्रे यांच्या आत्महत्या प्रकरणात नाहक भाजप कार्यकर्ते संदीप माळी यांना गुंतवलं जात आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून दबावतंत्रचे राजकारण केलं जात असून तपास यंत्रणेने निःपक्षपातीपणे चौकशी करावी, त्यापूर्वीच नाहक भाजपच्या पदाधिकाऱ्याला बदनाम करु नका, राष्ट्रवादीची तशी भूमिका सगळ्यांना माहिती आहे अशी टीका कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली होती. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा