शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील आयरेगाव टावरे पाड्यात पाणी टंचाई

By मुरलीधर भवार | Updated: February 24, 2026 16:57 IST

ही पाणी टंचाई सोडविण्याकडे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याची बाब समोर आली आहे.

मुरलीधर भवार, डाेंबिवली: डाेंबिवलीतील आयरे गाव टावरे पाड्यात पाणी टंचाईचा सामना नागरीकांना करावा लागतो. या भागातील नागरीकांना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. १५ लिटरचे कॅन दरराेज नागरीकांना विकत घ्यावे लागतात. ही पाणी टंचाई सोडविण्याकडे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याची बाब समोर आली आहे.

आयारे गावातील टावरे पाड्यात पाण्यासाठी प्रत्येक पाण्याच्या कॅनला २०० रुपये मोजावे लागत आहे. याठिकाणी चाळीची वस्ती आहे. तसेच बहुतांश प्रमाणात नव्याने इमारती उभारण्यात आल्या आहे. चाळीत आणि इमारतीत घर घेतले. मात्र त्याठिकाणी पाण्याचा पत्ता नाही. त्याचबरोबर या ठिकाणी पूर्वीपासून राहणारे रहिवासी आहे. त्यांना देखील पाण्यासाठी वणवण करावी लागते.

सायकला पाण्याचे कॅन लटकवून पाणी आणावे लागते. तर काही रिक्षा चालक पाण्याचे क’न रिक्षात भरुन पाणी वाहतानाचे चित्र या परिसरात आहे. या भागात पाणी नाही तर पाणी विकणारे पाणी कुठून आणता असा संतप्त सवाल नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे. सध्या १० वीची परिक्षा सुरु आहे. घरात पाणी नसल्याने पालकांना पाल्यासाठी वेळ देता येत नाही. त्यांच्या घरातील कामे खोळंबतात. पाणी टंचाईमुळे नागरीकांना विकतचे पाणी घेण्यावर पैसा खर्च करावा लागताे. त्यामुळे त्यांचे महिन्याचे आर्थिक गणित बिघडले आहे.

या संदर्भात या भागातील भाजपचे नगरसेवक मंदार टावरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, काही भागात तांत्रिक अडचणींमुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या परिसरात अंतर्गत जलवाहिनीचे टाकण्याचे काम सुरु आहे. ही जलवाहिनी टाकल्यावर सर्व पाणीपुरवठा करण्यात येईल, हा परिसर टावरे यांच्या प्रभागाला लागून आहे. तरी देखील त्या प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील आहे. या भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी भाजपने विशेष प्रयत्न केले आहे याकडे टावरे यांनी लक्ष वेधले आहे.

दोन वर्षापूर्वी आयरे टावरे पाड्यापासून जवळच असलेल्या भोपर संदप परिसरातील खदानीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या चार जणांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. त्यामुळे या परिसरातील पाणी टंचाई लवकर सोडविली गेली नाही तर पुन्हा कोण्याच्या तरी जीवावर बेतू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Water Scarcity Grips Ayre Gaon Tawre Pada in Dombivli

Web Summary : Residents of Ayre Gaon Tawre Pada in Dombivli face acute water scarcity, forcing them to buy expensive water. Locals are spending ₹200 per water can. BJP corporator Mandar Taware cites technical issues and ongoing pipeline work as the cause, promising resolution soon. Water scarcity may lead to loss of life.
टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणी कपात