शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

उंबार्लीत श्रमदानातून दोन जलस्रोत झाले पुनरुज्जीवित; ३० स्वयंसेवकांनी घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 11:27 PM

३० स्वयंसेवकांनी घेतला पुढाकार : दोन फूट खोल मातीचा गाळ काढला

डोंबिवली : उंबार्ली येथील पक्षी अभयारण्यामध्ये ३० पर्यावरणप्रेमींनी १८ आणि २५ एप्रिल, अशा सलग दोन रविवारी श्रमदान करून दोन नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन केले. या जलस्रोतांमध्ये यावेळी पाण्याबरोबर गाळही काढण्यात आला. त्यामुळे आता त्यात अधिक प्रमाणात पाण्याचा साठा होणार आहे. त्याचा फायदा परिसरातील झाडांबरोबर पशू-पक्ष्यांना होईल, असे सांगण्यात आले.

उंबार्ली बाजूच्या डोंगरावर उंबराचे पाणी हा पाणवठा असून, त्याच्या कातळात जिवंत पाण्याचे झरे आहेत. पूर्वी या पाण्याचा वापर उंबार्लीतील ग्रामस्थ शेती व गुरांसाठी करत असत; पण गेली कित्येक वर्षे त्याचा वापर बंद आहे, तसेच पावसाच्या पाण्याबरोबर आलेल्या मातीचा गाळ त्यात साचला होता. श्रमदान शिबिरात जवळजवळ दोन फूट मातीचा ओला गाळ आणि चिखल या पाणवठ्यातून काढण्यात आला, तसेच गाळ व माती परत आत येऊ नये, यासाठी दगडांचा बंधारा बांधण्यात आला.

पाणवठ्याजवळ उंबराचे झाड असून, तिथे खोलगट भाग आहे. डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी त्यात साठवण्यासाठी खड्डा खोदण्यात आला. साधारण १५ बाय १० फूट, असा हा खड्डा आहे. खड्ड्यातून काढलेली माती दगडी बंधारा तयार करून त्यावर लेपण्यात आली, तसेच खड्ड्यात डोंगरावरची माती येऊ नये म्हणून वरच्या बाजूस डोंगर उतारावर मातीत चर खोदले. माती पावसाबरोबर वाहून जाणार नाही व पाणी जास्तीत जास्त मुरेल आणि ते झाडांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरेल, असे पर्यावरणप्रेमी मंगेश कोयंडे यांनी सांगितले. असेच अनेक उपक्रम डोंबिवली पक्षी अभयारण्यात राबविण्यात येतील. अशा उपक्रमांद्वारे पक्षी, प्राण्यांचे आणि झाडांचे संवर्धन, संरक्षण योग्यरीत्या करण्यात येईल, असे ते म्हणाले.

या संस्थांनी घेतला सहभागसलग दोन रविवार सकाळी ३० स्वयंसेवकांनी श्रमदान केले. या उपक्रमात उंबार्ली, सोनार पाडा, दावडी, भाल, धामटन, खोणी आणि निळजे ही डोंबिवली पक्षी अभयारण्य लगतच्या गावांतील ग्रामस्थही सहभागी झाले होते.

टॅग्स :kalyanकल्याण