शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
2
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
3
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, चंद्रकांतदादांच्या 'त्या' व्हिडीओवर म्हणाली..
4
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
5
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
6
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
7
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
8
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
9
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
10
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
11
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
12
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
13
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
14
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
15
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
16
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
17
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
18
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
19
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
20
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत

टिटवाळा येथील श्री महागणपती मंदिराच्या पार्श्वभूमीवर टिटवाळा रेल्वे स्टेशन उभारावे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची सूचना 

By अनिकेत घमंडी | Updated: February 26, 2024 19:05 IST

अमृत भारत स्टेशन योजनेत शहाड व टिटवाळा रेल्वे स्थानकांमध्ये ४१ कोटी २५ लाखांची कामे...

 डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार अमृत भारत स्टेशन योजनांची निर्मिती केली जात आहे. या स्टेशनांमध्ये स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब उमटणार असून, टिटवाळा येथील श्री महागणपती मंदिराच्या पार्श्वभूमीवर टिटवाळा रेल्वे स्टेशन उभारावे, अशी सूचना केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी केले. 

मोदी यांच्याकडून देशाच्या विविध भागातील २१ हजार ५२० कोटी रुपयांच्या १५०० रोड ओव्हर ब्रिज आणि अंडरपासचे भूमिपूजन व लोकार्पण सोमवारी पार पडले. त्याचबरोबर अमृत भारत स्टेशन योजनेत भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहाड व टिटवाळा रेल्वे स्थानकांचा समावेश असून, प्रवाशांच्या सुविधांसाठी ४१ कोटी २५ लाखांची कामे केली जाणार आहेत. 

 पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने कल्याणइगतपुरी मार्गावरील रेल्वे अंडरपास क्र. ५३ व क्र. ७६, खडवली ते वासिंद दरम्यान अंडरपास क्र. ५९ यांचे लोकार्पण, तर कल्याणइगतपुरी मार्गावर रेल्वे उड्डाणपूल क्र. ५५ व क्र. ६५ यांचे भूमिपूजन केले. टिटवाळा येथे झालेल्या कार्यक्रमाला मंत्री पाटील यांच्यासह व्यासपीठावर मध्य रेल्वेचे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक (प्रशासन) शशीभूषण, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी यांची उपस्थित होते. तसेच रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता सचिन पांचाळ, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, भाजपाचे कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील, शक्तिवान भोईर, प्रदीप भोईर यांची उपस्थिती होती. 

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील वासिंदआसनगाव दरम्यानच्या आरओबीसाठी २९ कोटी ९२ लाख, टिटवाळा येथील खडवली येथील आरओबीसाठी ३ कोटी ९४ लाख, राळेगाव येथील आरओबीसाठी २८ कोटी ४३ लाख रुपये, टिटवाळा येथील अंडरपाससाठी ४ कोटी २१ लाख रुपये आदी सात कामांना निधी मंजूर झाला आहे. येत्या २०२५ अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर या भागात रेल्वे फाटकावर प्रवाशांना तिष्ठत बसावे लागणार नाही, असे प्रतिपादन पाटील यांनी केले. 

दरम्यान, अमृत भारत स्टेशन योजना विषयावर रेल्वेतर्फे टिटवाळा स्टेशन मॅनेजर एस झा यांनी विविध स्पर्धा घेतल्या होत्या. या स्पर्धांमधील विविध गटांतील ६० गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेत एंजल सागर पोळ याने लिहिलेल्या निबंध  सर्वोत्कृष्ट ठरला.  

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBJPभाजपा