शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

टिटवाळा येथील श्री महागणपती मंदिराच्या पार्श्वभूमीवर टिटवाळा रेल्वे स्टेशन उभारावे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची सूचना 

By अनिकेत घमंडी | Updated: February 26, 2024 19:05 IST

अमृत भारत स्टेशन योजनेत शहाड व टिटवाळा रेल्वे स्थानकांमध्ये ४१ कोटी २५ लाखांची कामे...

 डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार अमृत भारत स्टेशन योजनांची निर्मिती केली जात आहे. या स्टेशनांमध्ये स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब उमटणार असून, टिटवाळा येथील श्री महागणपती मंदिराच्या पार्श्वभूमीवर टिटवाळा रेल्वे स्टेशन उभारावे, अशी सूचना केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी केले. 

मोदी यांच्याकडून देशाच्या विविध भागातील २१ हजार ५२० कोटी रुपयांच्या १५०० रोड ओव्हर ब्रिज आणि अंडरपासचे भूमिपूजन व लोकार्पण सोमवारी पार पडले. त्याचबरोबर अमृत भारत स्टेशन योजनेत भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहाड व टिटवाळा रेल्वे स्थानकांचा समावेश असून, प्रवाशांच्या सुविधांसाठी ४१ कोटी २५ लाखांची कामे केली जाणार आहेत. 

 पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने कल्याणइगतपुरी मार्गावरील रेल्वे अंडरपास क्र. ५३ व क्र. ७६, खडवली ते वासिंद दरम्यान अंडरपास क्र. ५९ यांचे लोकार्पण, तर कल्याणइगतपुरी मार्गावर रेल्वे उड्डाणपूल क्र. ५५ व क्र. ६५ यांचे भूमिपूजन केले. टिटवाळा येथे झालेल्या कार्यक्रमाला मंत्री पाटील यांच्यासह व्यासपीठावर मध्य रेल्वेचे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक (प्रशासन) शशीभूषण, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी यांची उपस्थित होते. तसेच रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता सचिन पांचाळ, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, भाजपाचे कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील, शक्तिवान भोईर, प्रदीप भोईर यांची उपस्थिती होती. 

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील वासिंदआसनगाव दरम्यानच्या आरओबीसाठी २९ कोटी ९२ लाख, टिटवाळा येथील खडवली येथील आरओबीसाठी ३ कोटी ९४ लाख, राळेगाव येथील आरओबीसाठी २८ कोटी ४३ लाख रुपये, टिटवाळा येथील अंडरपाससाठी ४ कोटी २१ लाख रुपये आदी सात कामांना निधी मंजूर झाला आहे. येत्या २०२५ अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर या भागात रेल्वे फाटकावर प्रवाशांना तिष्ठत बसावे लागणार नाही, असे प्रतिपादन पाटील यांनी केले. 

दरम्यान, अमृत भारत स्टेशन योजना विषयावर रेल्वेतर्फे टिटवाळा स्टेशन मॅनेजर एस झा यांनी विविध स्पर्धा घेतल्या होत्या. या स्पर्धांमधील विविध गटांतील ६० गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेत एंजल सागर पोळ याने लिहिलेल्या निबंध  सर्वोत्कृष्ट ठरला.  

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBJPभाजपा