शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

हिंदू कौन है? डोंबिवलीतल्या तिघांची ठरली शेवटची ट्रिप; दहशतवाद्यांनी एकामागून एक संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 14:12 IST

डोंबिवली येथील तीन पर्यटकही दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरले आहेत.

Pahalgam Terrorist Attack:जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन नरसंहार केला.पहलगाममधल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी फक्त पुरूषांना लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांची ओळख पटवून त्यांना संपवले. ठरवून हा हल्ला करण्यात आल्याचे पर्यटकांनी म्हटलं. महाराष्ट्रातील डोंबिवली येथील तीन पर्यटकही दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरले आहेत. दहशतवाद्यांनी हिंदू कोण आहेत असं विचारून गोळ्या झाडल्याचे मृत कुटुंबियांनी सांगितले.

पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना गोळ्या घालून ठार मारले. या दहशतवादी हल्ल्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांची माहिती समोर आली आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चुलत भावांचाही समावेश आहे. डोंबिवलीतील या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा, पांडुरंगवाडी आणि नांदिवली भागातील रहिवासी असलेल्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी अशी तिघांची नावे आहेत. हे सर्वजण कुटुंबासमवेत शनिवारी काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात हे तिघेही गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघे चुलत भाऊ होते. डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी संकुलात असलेल्या श्रीराम अचल इमारतीत अतुल मोने राहत होते. अतुल श्रीकांत मोने हे त्यांच्या कुटुंब आणि मित्रांसह काश्मीरमधील  पहलगाममध्ये  पर्यटणासाठी गेले होते. अतुल मोने हे त्यांची पत्नी आणि मुलगी असे तिघे तिथे गेले होते. अतुल मोने रेल्वेच्या परळ वर्कशॉपमध्ये सेक्शन इंजिनिअर म्हणून काम करत होते.  

या हल्ल्यानंतर अतुल मोने यांची मेहुणी राजश्री अकुल यांनी या घटनेबाबत माहिती दिली. दहशतवाद्यांनी हिंदू कोण आहेत असे विचारल्यानंतर लोकांवर गोळ्या झाडल्या. त्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य केले, असे राजश्री अकुल म्हणाल्या. त्यांच्याशी माझं बोलणं होत नव्हतं. 

"संध्याकाळी जेव्हा आमचे बोलणे झाले तेव्हा त्यांनी आम्ही सगळे ठीक आहेत असं सांगितले. त्यामुळे थोडे टेंशन कमी झाले. मात्र आठ वाजता जेव्हा नावासह आणि फोटोसह माहिती येऊ लागली तेव्हा धक्का बसला. अतुल यांच्यासह तिन्ही पुरुषांना गोळ्या घालण्यात आल्या. महिला आणि मुलांना सोडून दिले. बहिणीने सांगितले की त्यांनी सर्वात आधी गोळीबार सुरु केला. त्यांनी आधी हेमंत जोशी यांच्यावर गोळी झाडली. त्यांनी इथं हिंदू कोन आहे असं विचारलं. त्यानंतर संजय लेले यांच्या डोक्यात गोळी मारली तर अतुल मोने यांना पोटात गोळी मारली. त्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य केले," असे राजश्री अकुल यांनी सांगितले. 

"मी सरकारला फक्त एकच आवाहन करते की सर्वांसमोर दहशतवाद्यांना शक्य तितकी कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरून कोणीही कधीही कोणत्याही निष्पाप व्यक्तीचे जीवन संपवण्याचे धाडस करणार नाही," असेही राजश्री यांनी म्हटलं. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाdombivaliडोंबिवलीJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला