शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कल्याण डोंबिवलीत निघाली बालगोपाळांची ‘साक्षरता’ दिंडी! केडीएमसीचा उपक्रम

By प्रशांत माने | Updated: July 15, 2024 17:38 IST

कल्याण डोंबिवलीतील महापालिका शाळांच्या वतीने काढण्यात आलेल्या या साक्षरता दिंडीत बालगोपाळ विदयार्थी विदयार्थींनींसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने सोमवारी नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जनजागृतीसाठी साक्षरता दिंडीचे आयोजन केले होते. कल्याण डोंबिवलीतील महापालिका शाळांच्या वतीने काढण्यात आलेल्या या साक्षरता दिंडीत बालगोपाळ विदयार्थी विदयार्थींनींसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

मा. संचालक (योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशान्वये महापालिका क्षेत्रातील मनपाच्या सर्व तसेच व्यवस्थापनाच्या मान्यता प्राप्त शाळांच्या वतीने केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविण्याच्या निमित्ताने आपल्या शाळांच्या जवळपासच्या परिसरात बुधवारच्या आषाढी एकादशीचे औचित्य साधत सोमवारी साक्षरता जनजागृती दिंडीचे आयोजन केले होते. आपल्या शाळेच्या परिसरात एकही असाक्षर राहणार नाही यासाठी बॅनर फलक आणि घोषवाक्यांच्या माध्यमातून साक्षरता जनजागृती करण्यात आली. मांडा येथील केडीएमसीची शाळा क्रमांक ६० संत ज्ञानेश्वर प्राथमिक विदयालय, कल्याण पश्चिमेतील वडवली केडीएमसी शाळा क्रमांक ३४ आणि डोंबिवली पश्चिमेतील कोपरगाव येथील चरू बामा म्हात्रे विदयामंदिर, पुर्वेकडील संत तुलसीदास हिंदी शाळा आणि सयाजीराव गायकवाड शाळा यांसह अन्य शाळांनी आपापल्या परिसरात साक्षरता जनजागृती दिंडीचे आयोजन केले होते. दिंडी काढताना विदयार्थ्यांच्या सुरक्षेबाबतची योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती अशी माहिती शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी दिली.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाSchoolशाळाStudentविद्यार्थी