शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

ठाणे, कल्याण, की भिवंडी? महिलांना मिळणार कुठली हुंडी?; २०२९ मध्ये महिला खासदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 06:42 IST

पुरुष खासदारांची शेवटची निवडणूक, अनेकांनी मतदारसंघ राखीव होताच आपल्या पत्नी, बहीण यांना संधी दिली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तेच होण्याची भीती व्यक्त होत आहे.

अनिकेत घमंडीडोंबिवली : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नव्या इमारतीत आणलेल्या दीर्घकाळ प्रलंबित विधेयकावर मंजुरीची मोहोर उमटली व त्याची २०२९ मधील लोकसभा निवडणुकीत अंमलबजावणी झाली, तर ठाणे जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांना त्याचा फटका बसणार आहे. 

सध्या ठाण्यातून खासदार राजन विचारे, कल्याणमधून खासदार श्रीकांत शिंदे, भिवंडीतून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे लोकसभेवर निवडून गेलेले आहेत. तिघांनी ही २०१४ व २०१९ अशा दोन्ही वेळेस त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०२४ च्या निवडणुकीत हे तिघे पुन्हा रिंगणात दिसतील, हे निर्विवाद सत्य आहे. २०२९च्या निवडणुकीत या तीन लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ महिलांकरिता राखीव झाला, तर त्यांच्याकरिता २०२४ ची लोकसभा निवडणूक ही अखेरची असणार आहे.

गतवर्षीच्या राजकीय भूकंपानंतर खा. विचारे हे उद्धव ठाकरे गटाचे, तर खा. शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार आहेत. खा. पाटील हे भाजपचे आहेत. राज्यात जरी शिंदे-फडणवीस-पवार असे महायुतीचे सरकार असले तरी कल्याण मतदारसंघात खा. शिंदे यांच्याशी भाजपचे फारसे जुळत नाही. खा. पाटील यांचे विद्यमान आमदार किसन कथोरे, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याशी मतभेदांमुळे फारसे जुळत नाही.

ठाणे लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे आहे. तो भाजपला हवा आहे. कल्याण मतदारसंघ शिंदे गटाकडे आहे. भिवंडी भाजपाकडे आहे. समजा यापैकी एक मतदारसंघ राखीव झाला तर अन्य दोन मतदारसंघांतील पुरुष उमेदवार दुसऱ्या मतदारसंघात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार का, असा प्रश्न आहे.

ठाणे, भिवंडी, कल्याण या लोकसभा मतदारसंघांपैकी कोणताही मतदारसंघ महिलांकरिता राखीव झाला तर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस असो की मनसे, या एकाही पक्षाकडे महिला उमेदवार कोण असू शकतो, हे आताच ठामपणे सांगता येणार नाही.  सर्वच पक्षांत दीर्घकाळ पक्षकार्य केलेल्या, महापालिकांमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या महिला आहेत.

राजकारणातील भ्रष्टाचार कमी करण्याकरिता महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी दिले होते. अनेकांनी मतदारसंघ राखीव होताच आपल्या पत्नी, बहीण यांना संधी दिली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तेच होण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :Women Reservationमहिला आरक्षणlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक