शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

मंदिरं बंद, पण आरोग्यमंदिरं सुरू!; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपाला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 18:06 IST

आरोग्य मंदिरं हॉस्पिटलच्या रूपाने कार्यरत आहेत.त्यामुळे जनता आशीर्वाद देणार आहे : उद्धव ठाकरे

ठळक मुद्देआरोग्य मंदिरं हॉस्पिटलच्या रूपाने कार्यरत आहेत.त्यामुळे जनता आशीर्वाद देणार आहे : उद्धव ठाकरे

राज्यातील मंदीरं खुली करावीत याकरिता भाजपाने नुकतेच ठिकठिकाणी शंखानाद आंदोलन करत राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली होती. या मुद्द्यावरुन आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. मंदीरं बंद असली तरी आरोग्य मंदिरं सुरू आहेत आणि ही आरोग्य मंदिरं हॉस्पिटलच्या रूपाने कार्यरत आहेत.त्यामुळे जनता आशीर्वाद देणार आहे असे सांगत ठाकरे यांनी भाजपाचा समाचार घेतला आहे. 

डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात  कल्याणडोंबिवलीतील कोपर पुलासह विविध विकासकामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला.यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ठाकरे यांनी हे विधानं केलं आहे.  पुढे ते म्हणाले की, धार्मिक मंदिरे बंद असली तरी लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारी आरोग्य मंदिरे मात्र आज सुरू आहेत. त्याबद्दल जनता आपल्याला आशिर्वाद देत असून धार्मिक मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडण्यात येतील असेही त्यांनी  यावेळी स्पष्ट केले. कोव्हिडंचा काळ अजून संपला नसून माझ्या पक्षांसह सर्व  पक्षांना मी जबाबदारीने वागण्याचं आवाहन केलं आहे. आपण जबाबदारीने वागलो नाही तर लोकं कसे वागतील? हे सुद्धा त्यांना मी समजावलं असल्याचे  ते म्हणाले. या कार्यक्रमात  टिप्पणी, राजकीय शेरेबाजी, चिमटे आणि शाब्दिक चकमकींमुळे ही  विकासकामांपेक्षा आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊ लागली आहे याची अधिक प्रचिती आली. 

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यावेळी कल्याण डोंबिवली परिसरात सुरू असणाऱ्या विकास कामांबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे तर केंद्र सरकारचा कोवीड इनोव्हेशन पुरस्कार मिळाल्याबद्दल केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे यावेळी विशेष शब्दांत कौतुक केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र चव्हाण, विश्वनाथ भोईर,  आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, केडीएमसी आयुक्त शहर अभियंता सपना कोळी, सचिव संजय जाधव यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे अनेक मान्यवर उपस्थित होते. 

"...तर घोषणा देऊन काय उपयोग"एकीकडे जर आपल्या देशातील नागरिक औषधपाणी, ऑक्सिजन आदी आरोग्याच्या सुविधांपासून वंचित असतील तर नुसत्या 'भारत माता की जय' घोषणा देऊन काय उपयोग? ती भारतमाता आपल्याला काय बोलेल अशा शब्दांत  ठाकरे यांनी नाव भाजपला टोला लगावला. इतकंच नाही तर  घोषणांच्या पलीकडे जाऊन  आम्ही हिंदुत्वाची काळजी घेतो असेही ठाकरे यांनी आवर्जून सांगितलं.

आपल्या भाषणात डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी डीपीआर मंजूर होऊनही अद्याप काम सुरू न झालेल्या 428 कोटींच्या रस्त्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याचाच धागा पकडत मुख्यमंत्री म्हणाले की बॅकलॉगबाबत बोलायचे झाले तर 400 कोटी, साडेचारशे कोटींसह अगोदर साडेसहा हजार कोटींबाबत माहिती घ्यावी लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरेkalyanकल्याणdombivaliडोंबिवली