शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

‘त्या’ वाहनांवर कारवाईकरा, अन्यथा उग्र आंदोलन, मनविसेचा आरटीओला इशारा

By प्रशांत माने | Updated: October 3, 2022 16:34 IST

Kalyan News: काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या एका खाजगी स्कूल बसला अपघात झाला होता सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेच्या निमित्ताने वाहनांच्या देखभाल दुरूस्तीचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नम ऐरणीवर आला आहे.

- प्रशांत माने कल्याण - काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या एका खाजगी स्कूल बसला अपघात झाला होता सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेच्या निमित्ताने वाहनांच्या देखभाल दुरूस्तीचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नम ऐरणीवर आला असून जे बेकादेशीरपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करतात त्यांच्यावर कडक कारवाई करा अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यावतीने आरटीओला निवेदनाद्वारे दिला आहे.

कल्याण आरटीओ परिक्षेत्राअंतर्गत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर,अंबरनाथ, बदलापूर ही शहरे येतात. पनवेल-खारघरमध्ये शॉर्टसर्कीटमुळे धावत्या स्कूलबसला आग लागल्याच्या १२ सप्टेंबरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकमतने कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थी वाहतूकीचा आढावा घेता आरटीओच्या नियमांचे पालन होत नसल्याची बाब निदर्शनास आली होती. यावर ‘स्कूल व्हॅन, रिक्षामध्ये मेंढरासारखे भरतात विद्यार्थी’ या मथळयाखाली लोकमतमध्ये १४ सप्टेंबरला बातमी प्रसिध्द केली होती.

दरम्यान सात दिवसांपूर्वी अंबरनातमध्ये घडलेल्या घटनेमुळे वाहनांच्या देखभाल दुरूस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान याबाबत महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक पवित्र घेतला आहे. सोमवारी मनविसेच्या शिष्टमंडळाने कल्याण आरटीओचे अधिकारी विनोद साळवी यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. आरटीओ परिक्षेत्रातील सर्वच खाजगी तसेच शालेय विद्यार्थ्यांचे नियोजन करणा-या वाहनांची तसेच स्कूलबसची तपासणी करावी, बेकादेशीरपणे वाहतूक करणा-या आणि विद्यार्थ्यांच्या जीविताबरोबर खेळणा-या वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पंधरा दिवसात जर कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मनविसेचे कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी दिला. यावर कल्याण आरटीओकडून कारवाई सुरू असून एप्रिल पासून ते आजपर्यंत सुमारे १२० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई सातत्याने सुरू असल्याचे साळवी यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

टॅग्स :MNSमनसेkalyanकल्याण