शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

‘त्या’ वाहनांवर कारवाईकरा, अन्यथा उग्र आंदोलन, मनविसेचा आरटीओला इशारा

By प्रशांत माने | Updated: October 3, 2022 16:34 IST

Kalyan News: काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या एका खाजगी स्कूल बसला अपघात झाला होता सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेच्या निमित्ताने वाहनांच्या देखभाल दुरूस्तीचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नम ऐरणीवर आला आहे.

- प्रशांत माने कल्याण - काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या एका खाजगी स्कूल बसला अपघात झाला होता सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेच्या निमित्ताने वाहनांच्या देखभाल दुरूस्तीचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नम ऐरणीवर आला असून जे बेकादेशीरपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करतात त्यांच्यावर कडक कारवाई करा अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यावतीने आरटीओला निवेदनाद्वारे दिला आहे.

कल्याण आरटीओ परिक्षेत्राअंतर्गत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर,अंबरनाथ, बदलापूर ही शहरे येतात. पनवेल-खारघरमध्ये शॉर्टसर्कीटमुळे धावत्या स्कूलबसला आग लागल्याच्या १२ सप्टेंबरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकमतने कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थी वाहतूकीचा आढावा घेता आरटीओच्या नियमांचे पालन होत नसल्याची बाब निदर्शनास आली होती. यावर ‘स्कूल व्हॅन, रिक्षामध्ये मेंढरासारखे भरतात विद्यार्थी’ या मथळयाखाली लोकमतमध्ये १४ सप्टेंबरला बातमी प्रसिध्द केली होती.

दरम्यान सात दिवसांपूर्वी अंबरनातमध्ये घडलेल्या घटनेमुळे वाहनांच्या देखभाल दुरूस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान याबाबत महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक पवित्र घेतला आहे. सोमवारी मनविसेच्या शिष्टमंडळाने कल्याण आरटीओचे अधिकारी विनोद साळवी यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. आरटीओ परिक्षेत्रातील सर्वच खाजगी तसेच शालेय विद्यार्थ्यांचे नियोजन करणा-या वाहनांची तसेच स्कूलबसची तपासणी करावी, बेकादेशीरपणे वाहतूक करणा-या आणि विद्यार्थ्यांच्या जीविताबरोबर खेळणा-या वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पंधरा दिवसात जर कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मनविसेचे कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी दिला. यावर कल्याण आरटीओकडून कारवाई सुरू असून एप्रिल पासून ते आजपर्यंत सुमारे १२० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई सातत्याने सुरू असल्याचे साळवी यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

टॅग्स :MNSमनसेkalyanकल्याण