शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वाहनांवर कारवाईकरा, अन्यथा उग्र आंदोलन, मनविसेचा आरटीओला इशारा

By प्रशांत माने | Updated: October 3, 2022 16:34 IST

Kalyan News: काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या एका खाजगी स्कूल बसला अपघात झाला होता सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेच्या निमित्ताने वाहनांच्या देखभाल दुरूस्तीचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नम ऐरणीवर आला आहे.

- प्रशांत माने कल्याण - काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या एका खाजगी स्कूल बसला अपघात झाला होता सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेच्या निमित्ताने वाहनांच्या देखभाल दुरूस्तीचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नम ऐरणीवर आला असून जे बेकादेशीरपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करतात त्यांच्यावर कडक कारवाई करा अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यावतीने आरटीओला निवेदनाद्वारे दिला आहे.

कल्याण आरटीओ परिक्षेत्राअंतर्गत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर,अंबरनाथ, बदलापूर ही शहरे येतात. पनवेल-खारघरमध्ये शॉर्टसर्कीटमुळे धावत्या स्कूलबसला आग लागल्याच्या १२ सप्टेंबरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकमतने कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थी वाहतूकीचा आढावा घेता आरटीओच्या नियमांचे पालन होत नसल्याची बाब निदर्शनास आली होती. यावर ‘स्कूल व्हॅन, रिक्षामध्ये मेंढरासारखे भरतात विद्यार्थी’ या मथळयाखाली लोकमतमध्ये १४ सप्टेंबरला बातमी प्रसिध्द केली होती.

दरम्यान सात दिवसांपूर्वी अंबरनातमध्ये घडलेल्या घटनेमुळे वाहनांच्या देखभाल दुरूस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान याबाबत महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक पवित्र घेतला आहे. सोमवारी मनविसेच्या शिष्टमंडळाने कल्याण आरटीओचे अधिकारी विनोद साळवी यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. आरटीओ परिक्षेत्रातील सर्वच खाजगी तसेच शालेय विद्यार्थ्यांचे नियोजन करणा-या वाहनांची तसेच स्कूलबसची तपासणी करावी, बेकादेशीरपणे वाहतूक करणा-या आणि विद्यार्थ्यांच्या जीविताबरोबर खेळणा-या वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पंधरा दिवसात जर कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मनविसेचे कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी दिला. यावर कल्याण आरटीओकडून कारवाई सुरू असून एप्रिल पासून ते आजपर्यंत सुमारे १२० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई सातत्याने सुरू असल्याचे साळवी यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

टॅग्स :MNSमनसेkalyanकल्याण