शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 05:49 IST

तीन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: डोंबिवलीतील एमआयडीसीत झालेल्या स्फोटानंतर येथील उद्योग इतरत्र हलविण्याबाबत सरकार योजना तयार करत असून, त्यासाठी तीन अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीमध्ये उद्योग विभागाचे प्रधान सचिव, कामगार विभागाचे प्रधान सचिव आणि पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव यांचा समावेश आहे. डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा आणि अंबरनाथजवळील जांभिवली येथे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . कोणत्या उद्योगांचे स्थलांतर करायचे, याबाबतचा आढावा उच्चस्तरीय ही समिती घेणार असून, तीन आठवड्यांत याबाबतचा निर्णय होणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

सामंत यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत डोंबिवली स्फोटाच्या घटनेचा आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते. सामंत म्हणाले, डोंबिवलीत ज्या कंपन्यांनी नियमांचे पालन केले नाही, अनधिकृत बांधकाम केले आहे, त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. एप्रिल २०२२मध्ये इथले उद्योग बाहेर हलवण्यासाठी समिती नेमली होती, या समितीच्या दोन बैठका झाल्या. पण, नंतर काम ठप्प झाले. आता मात्र तीन आठवड्यांत समितीचा अहवाल आल्यानंतर सरकार याबाबतची कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. डोंबिवलीप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे, महाड या एमआयडीसीतही असे उद्योग असतील तर त्यांच्या स्थलांतराबाबतही सदर समिती अभ्यास करून अहवाल देणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

कोणते उद्योग हलवणार ?

सदर उच्चस्तरीय समिती डोंबिवलीतील उद्योगांची ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशी विभागणी करणार आहे. अतिसंवेदनशील, लोकांना त्रास होणाऱ्या, नियम न पाळणाऱ्या उद्योगांचा समावेश ‘अ’ गटात केला जाणार आहे. असे उद्योग डोंबिवली एमआयडीसीतून स्थलांतरित केले जाणार आहेत. मात्र, हे उद्योग स्थलांतरित करताना त्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी शासन घेईल, अशी ग्वाही देताना समिती या स्थलांतरणासाठी योजना तयार करणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.

या मुद्द्यांचाही होणार अभ्यास

  • डोंबिवलीच्या ज्या कंपनीत स्फोट झाला तिथे कोणते मटेरियल होते, त्याची परवानगी घेतली होती का? गुन्हे दाखल झाले आहेत, ते योग्य झाले आहेत का? रसायन आणले त्याला परवानगी होती का? 
  • इथल्या लहान कंपन्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत का? मोठ्या कंपन्या नियम पाळत आहेत का? याचाही अभ्यास ही समिती करणार आहे. इथल्या उद्योजकांना आपला उद्योग बदलायचा असेल तर त्याचीही परवानगी शासन देणार आहे.

आंदोलनामुळे गेल कंपनी गेली

गेल कंपनीला रत्नागिरी जिल्ह्यात उद्योग उभारायचा होता. मात्र, या ठिकाणी रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे ही कंपनी महाराष्ट्रातून बाहेर गेल्याचे सांगत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत केलेल्या टीकेला उत्तर दिले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतdombivaliडोंबिवलीBlastस्फोट