शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 05:49 IST

तीन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: डोंबिवलीतील एमआयडीसीत झालेल्या स्फोटानंतर येथील उद्योग इतरत्र हलविण्याबाबत सरकार योजना तयार करत असून, त्यासाठी तीन अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीमध्ये उद्योग विभागाचे प्रधान सचिव, कामगार विभागाचे प्रधान सचिव आणि पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव यांचा समावेश आहे. डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा आणि अंबरनाथजवळील जांभिवली येथे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . कोणत्या उद्योगांचे स्थलांतर करायचे, याबाबतचा आढावा उच्चस्तरीय ही समिती घेणार असून, तीन आठवड्यांत याबाबतचा निर्णय होणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

सामंत यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत डोंबिवली स्फोटाच्या घटनेचा आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते. सामंत म्हणाले, डोंबिवलीत ज्या कंपन्यांनी नियमांचे पालन केले नाही, अनधिकृत बांधकाम केले आहे, त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. एप्रिल २०२२मध्ये इथले उद्योग बाहेर हलवण्यासाठी समिती नेमली होती, या समितीच्या दोन बैठका झाल्या. पण, नंतर काम ठप्प झाले. आता मात्र तीन आठवड्यांत समितीचा अहवाल आल्यानंतर सरकार याबाबतची कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. डोंबिवलीप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे, महाड या एमआयडीसीतही असे उद्योग असतील तर त्यांच्या स्थलांतराबाबतही सदर समिती अभ्यास करून अहवाल देणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

कोणते उद्योग हलवणार ?

सदर उच्चस्तरीय समिती डोंबिवलीतील उद्योगांची ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशी विभागणी करणार आहे. अतिसंवेदनशील, लोकांना त्रास होणाऱ्या, नियम न पाळणाऱ्या उद्योगांचा समावेश ‘अ’ गटात केला जाणार आहे. असे उद्योग डोंबिवली एमआयडीसीतून स्थलांतरित केले जाणार आहेत. मात्र, हे उद्योग स्थलांतरित करताना त्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी शासन घेईल, अशी ग्वाही देताना समिती या स्थलांतरणासाठी योजना तयार करणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.

या मुद्द्यांचाही होणार अभ्यास

  • डोंबिवलीच्या ज्या कंपनीत स्फोट झाला तिथे कोणते मटेरियल होते, त्याची परवानगी घेतली होती का? गुन्हे दाखल झाले आहेत, ते योग्य झाले आहेत का? रसायन आणले त्याला परवानगी होती का? 
  • इथल्या लहान कंपन्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत का? मोठ्या कंपन्या नियम पाळत आहेत का? याचाही अभ्यास ही समिती करणार आहे. इथल्या उद्योजकांना आपला उद्योग बदलायचा असेल तर त्याचीही परवानगी शासन देणार आहे.

आंदोलनामुळे गेल कंपनी गेली

गेल कंपनीला रत्नागिरी जिल्ह्यात उद्योग उभारायचा होता. मात्र, या ठिकाणी रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे ही कंपनी महाराष्ट्रातून बाहेर गेल्याचे सांगत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत केलेल्या टीकेला उत्तर दिले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतdombivaliडोंबिवलीBlastस्फोट