शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 05:49 IST

तीन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: डोंबिवलीतील एमआयडीसीत झालेल्या स्फोटानंतर येथील उद्योग इतरत्र हलविण्याबाबत सरकार योजना तयार करत असून, त्यासाठी तीन अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीमध्ये उद्योग विभागाचे प्रधान सचिव, कामगार विभागाचे प्रधान सचिव आणि पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव यांचा समावेश आहे. डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा आणि अंबरनाथजवळील जांभिवली येथे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . कोणत्या उद्योगांचे स्थलांतर करायचे, याबाबतचा आढावा उच्चस्तरीय ही समिती घेणार असून, तीन आठवड्यांत याबाबतचा निर्णय होणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

सामंत यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत डोंबिवली स्फोटाच्या घटनेचा आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते. सामंत म्हणाले, डोंबिवलीत ज्या कंपन्यांनी नियमांचे पालन केले नाही, अनधिकृत बांधकाम केले आहे, त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. एप्रिल २०२२मध्ये इथले उद्योग बाहेर हलवण्यासाठी समिती नेमली होती, या समितीच्या दोन बैठका झाल्या. पण, नंतर काम ठप्प झाले. आता मात्र तीन आठवड्यांत समितीचा अहवाल आल्यानंतर सरकार याबाबतची कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. डोंबिवलीप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे, महाड या एमआयडीसीतही असे उद्योग असतील तर त्यांच्या स्थलांतराबाबतही सदर समिती अभ्यास करून अहवाल देणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

कोणते उद्योग हलवणार ?

सदर उच्चस्तरीय समिती डोंबिवलीतील उद्योगांची ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशी विभागणी करणार आहे. अतिसंवेदनशील, लोकांना त्रास होणाऱ्या, नियम न पाळणाऱ्या उद्योगांचा समावेश ‘अ’ गटात केला जाणार आहे. असे उद्योग डोंबिवली एमआयडीसीतून स्थलांतरित केले जाणार आहेत. मात्र, हे उद्योग स्थलांतरित करताना त्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी शासन घेईल, अशी ग्वाही देताना समिती या स्थलांतरणासाठी योजना तयार करणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.

या मुद्द्यांचाही होणार अभ्यास

  • डोंबिवलीच्या ज्या कंपनीत स्फोट झाला तिथे कोणते मटेरियल होते, त्याची परवानगी घेतली होती का? गुन्हे दाखल झाले आहेत, ते योग्य झाले आहेत का? रसायन आणले त्याला परवानगी होती का? 
  • इथल्या लहान कंपन्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत का? मोठ्या कंपन्या नियम पाळत आहेत का? याचाही अभ्यास ही समिती करणार आहे. इथल्या उद्योजकांना आपला उद्योग बदलायचा असेल तर त्याचीही परवानगी शासन देणार आहे.

आंदोलनामुळे गेल कंपनी गेली

गेल कंपनीला रत्नागिरी जिल्ह्यात उद्योग उभारायचा होता. मात्र, या ठिकाणी रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे ही कंपनी महाराष्ट्रातून बाहेर गेल्याचे सांगत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत केलेल्या टीकेला उत्तर दिले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतdombivaliडोंबिवलीBlastस्फोट