शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

शाळकरी मुलांच्या रिक्षाला अपघा, डोंबिवलीतील धक्कादायक घटना; सुदैवाने रिक्षातील विद्यार्थी सुखरूप

By प्रशांत माने | Updated: December 20, 2023 19:42 IST

रिक्षा चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जाते. या घटनेमुळे विदयार्थी वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

डोंबिवली: शाळकरी विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला अपघात झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास पुर्वेकडील मानपाडा चार रस्ता येथे घडली. रिक्षात तीन विदयार्थी होते. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. रिक्षा चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जाते. या घटनेमुळे विदयार्थी वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

रमेश बागुल असे रिक्षाचालकाचे नाव आहे. मानपाडा चार रस्ता येथून विदयार्थी घेऊन जात असताना त्याचा रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा रस्ता सोडून बाजुकडील एका दुकानात शिरता शिरता राहिली. रिक्षा थेट फुटपाथवर चढली आणि त्याठिकाणी पार्क असलेल्या मोटारसायकलला धडकली आणि थांबली. धक्कादायक बाब म्हणजे या रिक्षेत मागील सीटवर दोन विदयार्थी बसले होते. मागे सीटवर जागा असतानाही एका विदयार्थ्याला चालकाच्या बाजूला बसविण्यात आले होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शी प्रसाद आपटे यांनी दिली. महत्वाचे म्हणजे रिक्षाचालकाकडे परवाना नसल्याचेही समोर आले आहे. अपघात घडला तेव्हा रिक्षात तीन विदयार्थी होते परंतू एरव्ही दहा ते बारा विदयार्थी या रिक्षात असतात अशीही माहिती मिळत आहे.

आठ हजाराचा ठोठावला दंडसंबंधित रिक्षाचालकाकडे परवाना नसल्याने तसेच निष्काळजीपणे वाहन चालविल्याने वाहतूक शाखेच्या वतीने त्याला आठ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान बेजबाबदार रिक्षाचालकाविरोधात कोणीही तक्रार केलेली नाही त्यामुळे त्याच्याविरोधात  रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला नाही.

आरटीओ विभागाला जाग कधी येणार?कल्याण डोंबिवली शहरात रिक्षा प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असतात त्यात शाळकरी मुले देखील अपवाद नाही. बेकायदा वाहतूकीकडे आरटीओ विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बुधवारी घडलेल्या घटनेनंतर तरी आरटीओ विभागाला जाग येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातStudentविद्यार्थी