शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलांच्या रिक्षाला अपघा, डोंबिवलीतील धक्कादायक घटना; सुदैवाने रिक्षातील विद्यार्थी सुखरूप

By प्रशांत माने | Updated: December 20, 2023 19:42 IST

रिक्षा चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जाते. या घटनेमुळे विदयार्थी वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

डोंबिवली: शाळकरी विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला अपघात झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास पुर्वेकडील मानपाडा चार रस्ता येथे घडली. रिक्षात तीन विदयार्थी होते. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. रिक्षा चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जाते. या घटनेमुळे विदयार्थी वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

रमेश बागुल असे रिक्षाचालकाचे नाव आहे. मानपाडा चार रस्ता येथून विदयार्थी घेऊन जात असताना त्याचा रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा रस्ता सोडून बाजुकडील एका दुकानात शिरता शिरता राहिली. रिक्षा थेट फुटपाथवर चढली आणि त्याठिकाणी पार्क असलेल्या मोटारसायकलला धडकली आणि थांबली. धक्कादायक बाब म्हणजे या रिक्षेत मागील सीटवर दोन विदयार्थी बसले होते. मागे सीटवर जागा असतानाही एका विदयार्थ्याला चालकाच्या बाजूला बसविण्यात आले होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शी प्रसाद आपटे यांनी दिली. महत्वाचे म्हणजे रिक्षाचालकाकडे परवाना नसल्याचेही समोर आले आहे. अपघात घडला तेव्हा रिक्षात तीन विदयार्थी होते परंतू एरव्ही दहा ते बारा विदयार्थी या रिक्षात असतात अशीही माहिती मिळत आहे.

आठ हजाराचा ठोठावला दंडसंबंधित रिक्षाचालकाकडे परवाना नसल्याने तसेच निष्काळजीपणे वाहन चालविल्याने वाहतूक शाखेच्या वतीने त्याला आठ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान बेजबाबदार रिक्षाचालकाविरोधात कोणीही तक्रार केलेली नाही त्यामुळे त्याच्याविरोधात  रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला नाही.

आरटीओ विभागाला जाग कधी येणार?कल्याण डोंबिवली शहरात रिक्षा प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असतात त्यात शाळकरी मुले देखील अपवाद नाही. बेकायदा वाहतूकीकडे आरटीओ विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बुधवारी घडलेल्या घटनेनंतर तरी आरटीओ विभागाला जाग येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातStudentविद्यार्थी