शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सत्ताधारी वाघाचा वाटा खात आहेत; कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांना शिवसेना जबाबदार, राजू पाटील यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 15:38 IST

आमदार पाटील यांनी आज कल्याण मलंग रोडवरील खड्ड्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील हेही उपस्थित होते. रस्त्याच्या पाहणी पश्चात आमदार पाटील हे संतप्त झाले.

कल्याण - रस्त्यावरील खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ठाण्यात बोलले, की अधिकाऱ्यांवर कारवाई करू, ठेकेदारांना काढून टाकू. माझा स्पष्ट आरोप आहे, की येथील सत्ताधारी वाघाचा वाटा खात आहेत. यामुळेच रस्त्यांची खस्ता हालत झाली आहे. यांनी कल्याण-डोंबिवलीची वाट लावली आहे, असा आरोप करत मनसे आमदार राजू पाटील यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच या परिस्थितीसाठी शिवसेनेलाच जबाबदार धरले आहे. (The rulers are eating the share of the tiger; Shiv Sena responsible for pits in Kalyan-Dombivali says MNS leader Raju Patil)

आमदार पाटील यांनी आज कल्याण मलंग रोडवरील खड्ड्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील हेही उपस्थित होते. रस्त्याच्या पाहणी पश्चात आमदार पाटील हे संतप्त झाले. ते म्हणाले, कल्याण मलंग रस्त्यावर 45 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. 31 मे 2019 रोजी हा रस्ता पूर्ण होणे अपेक्षित होते. त्याला वाढीव पैसे दिले जात आहेत. तसेच कंत्रटदाराला मुदतवाढ दिली, तीही संपुष्टात आली. बहुतेक त्याला मुदतवाढ देणार, कारण खाल्ला मिठाला जागणार आहेत. 

या रस्त्याच्या कामाचे 95 टक्के बिल कंत्राट कंपनीला आधीच दिले गेले आहे. हे काम ज्या कंत्राट कंपनीला दिले होते. ती रेलकॉन कंपनी मुंबईत ब्लॅकलिस्टेड आहे. ब्लकलिस्टेड ठेकेदारांना कामे दिली तर हीच परिस्थिती होणार. कल्याण मलंग रस्त्याचीच नव्हे संपूर्ण कल्याण डोंबिवलीतील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. पालकमंत्र्यांनी वेळ काढून रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी करावी, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे. 

आमचे आयुक्तसाहेब हे अद्याप कलेक्टर मोडमधून आयुक्त मोडमध्ये आलेले नाही. खुर्च्या उबवायला बसलेत. कुठलीही कामे करीत नाहीत. कुणाल पाटील यांनी स्वखर्चाने खड्डे बुजविले होते. प्रशासन कोणाचीच दखल घेत नाही. यांना लाजा वाटायला पाहिजेत. आज पाहणीला येणार असे सांगितल्यावर काही मुख्य अधिकारी आजारी पडल्याचे सांगत आहेत. आत्ता मला कळाले, की ते का आले नाही. इंजिनिअर खात्यात बदली केली जाते. कोणाला कोणाचा पायपोस नसतो. एकमेकांवर ढकलपट्टीची कामे चालू असतात. अत्यंत वाईट परिस्थिती करून ठेवली आहे. कल्याण-डोंबिवलीची सत्ताधाऱ्यांनी वाट लावून ठेवली आहे, असेही पाटील  म्हणाले.

कल्याण डोंबिवलीतील खड्डे बुजविण्यावर 114 कोटी रुपये खर्च झाले याविषयी पाटील यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, दिसतो का, असा प्रतिसवाल उपस्थित केला. खड्ड्यांचे सोडा पालिकेतील अधिकारी बिले काढण्यासाठी 2 टक्के घेतात. सगळीकडे अडवणूक, फसवणूक सुरु आहे. एक तर लोकप्रतिनिधी नाहीत. प्रशासक आहे. कशाला कशाचा पायपोस नाही. खड्डे बुजविण्यासाठी आठ वर्षात 114 कोटी रुपये खर्च करुन दरवर्षी हीच परिस्थिती असते. निवडणूका आल्यावर आत्ता स्कीम घेऊन येतील. खड्डे भरा, नाही तर यांना आम्हाला खड्ड्यात भरावे लागेल, असा इशाराही यावेळी आमदार पाटील यांनी दिला आहे. आम्ही काय करू शकतो, मग केसेस करणार आमच्यावर, करू देत. सहनशीलतेचा अंत झाला आहे. नुसते खड्डेच खड्डे आहेत, असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेMNSमनसेPotholeखड्डे