शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी वाघाचा वाटा खात आहेत; कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांना शिवसेना जबाबदार, राजू पाटील यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 15:38 IST

आमदार पाटील यांनी आज कल्याण मलंग रोडवरील खड्ड्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील हेही उपस्थित होते. रस्त्याच्या पाहणी पश्चात आमदार पाटील हे संतप्त झाले.

कल्याण - रस्त्यावरील खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ठाण्यात बोलले, की अधिकाऱ्यांवर कारवाई करू, ठेकेदारांना काढून टाकू. माझा स्पष्ट आरोप आहे, की येथील सत्ताधारी वाघाचा वाटा खात आहेत. यामुळेच रस्त्यांची खस्ता हालत झाली आहे. यांनी कल्याण-डोंबिवलीची वाट लावली आहे, असा आरोप करत मनसे आमदार राजू पाटील यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच या परिस्थितीसाठी शिवसेनेलाच जबाबदार धरले आहे. (The rulers are eating the share of the tiger; Shiv Sena responsible for pits in Kalyan-Dombivali says MNS leader Raju Patil)

आमदार पाटील यांनी आज कल्याण मलंग रोडवरील खड्ड्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील हेही उपस्थित होते. रस्त्याच्या पाहणी पश्चात आमदार पाटील हे संतप्त झाले. ते म्हणाले, कल्याण मलंग रस्त्यावर 45 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. 31 मे 2019 रोजी हा रस्ता पूर्ण होणे अपेक्षित होते. त्याला वाढीव पैसे दिले जात आहेत. तसेच कंत्रटदाराला मुदतवाढ दिली, तीही संपुष्टात आली. बहुतेक त्याला मुदतवाढ देणार, कारण खाल्ला मिठाला जागणार आहेत. 

या रस्त्याच्या कामाचे 95 टक्के बिल कंत्राट कंपनीला आधीच दिले गेले आहे. हे काम ज्या कंत्राट कंपनीला दिले होते. ती रेलकॉन कंपनी मुंबईत ब्लॅकलिस्टेड आहे. ब्लकलिस्टेड ठेकेदारांना कामे दिली तर हीच परिस्थिती होणार. कल्याण मलंग रस्त्याचीच नव्हे संपूर्ण कल्याण डोंबिवलीतील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. पालकमंत्र्यांनी वेळ काढून रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी करावी, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे. 

आमचे आयुक्तसाहेब हे अद्याप कलेक्टर मोडमधून आयुक्त मोडमध्ये आलेले नाही. खुर्च्या उबवायला बसलेत. कुठलीही कामे करीत नाहीत. कुणाल पाटील यांनी स्वखर्चाने खड्डे बुजविले होते. प्रशासन कोणाचीच दखल घेत नाही. यांना लाजा वाटायला पाहिजेत. आज पाहणीला येणार असे सांगितल्यावर काही मुख्य अधिकारी आजारी पडल्याचे सांगत आहेत. आत्ता मला कळाले, की ते का आले नाही. इंजिनिअर खात्यात बदली केली जाते. कोणाला कोणाचा पायपोस नसतो. एकमेकांवर ढकलपट्टीची कामे चालू असतात. अत्यंत वाईट परिस्थिती करून ठेवली आहे. कल्याण-डोंबिवलीची सत्ताधाऱ्यांनी वाट लावून ठेवली आहे, असेही पाटील  म्हणाले.

कल्याण डोंबिवलीतील खड्डे बुजविण्यावर 114 कोटी रुपये खर्च झाले याविषयी पाटील यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, दिसतो का, असा प्रतिसवाल उपस्थित केला. खड्ड्यांचे सोडा पालिकेतील अधिकारी बिले काढण्यासाठी 2 टक्के घेतात. सगळीकडे अडवणूक, फसवणूक सुरु आहे. एक तर लोकप्रतिनिधी नाहीत. प्रशासक आहे. कशाला कशाचा पायपोस नाही. खड्डे बुजविण्यासाठी आठ वर्षात 114 कोटी रुपये खर्च करुन दरवर्षी हीच परिस्थिती असते. निवडणूका आल्यावर आत्ता स्कीम घेऊन येतील. खड्डे भरा, नाही तर यांना आम्हाला खड्ड्यात भरावे लागेल, असा इशाराही यावेळी आमदार पाटील यांनी दिला आहे. आम्ही काय करू शकतो, मग केसेस करणार आमच्यावर, करू देत. सहनशीलतेचा अंत झाला आहे. नुसते खड्डेच खड्डे आहेत, असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेMNSमनसेPotholeखड्डे