शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

सत्ताधारी वाघाचा वाटा खात आहेत; कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांना शिवसेना जबाबदार, राजू पाटील यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 15:38 IST

आमदार पाटील यांनी आज कल्याण मलंग रोडवरील खड्ड्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील हेही उपस्थित होते. रस्त्याच्या पाहणी पश्चात आमदार पाटील हे संतप्त झाले.

कल्याण - रस्त्यावरील खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ठाण्यात बोलले, की अधिकाऱ्यांवर कारवाई करू, ठेकेदारांना काढून टाकू. माझा स्पष्ट आरोप आहे, की येथील सत्ताधारी वाघाचा वाटा खात आहेत. यामुळेच रस्त्यांची खस्ता हालत झाली आहे. यांनी कल्याण-डोंबिवलीची वाट लावली आहे, असा आरोप करत मनसे आमदार राजू पाटील यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच या परिस्थितीसाठी शिवसेनेलाच जबाबदार धरले आहे. (The rulers are eating the share of the tiger; Shiv Sena responsible for pits in Kalyan-Dombivali says MNS leader Raju Patil)

आमदार पाटील यांनी आज कल्याण मलंग रोडवरील खड्ड्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील हेही उपस्थित होते. रस्त्याच्या पाहणी पश्चात आमदार पाटील हे संतप्त झाले. ते म्हणाले, कल्याण मलंग रस्त्यावर 45 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. 31 मे 2019 रोजी हा रस्ता पूर्ण होणे अपेक्षित होते. त्याला वाढीव पैसे दिले जात आहेत. तसेच कंत्रटदाराला मुदतवाढ दिली, तीही संपुष्टात आली. बहुतेक त्याला मुदतवाढ देणार, कारण खाल्ला मिठाला जागणार आहेत. 

या रस्त्याच्या कामाचे 95 टक्के बिल कंत्राट कंपनीला आधीच दिले गेले आहे. हे काम ज्या कंत्राट कंपनीला दिले होते. ती रेलकॉन कंपनी मुंबईत ब्लॅकलिस्टेड आहे. ब्लकलिस्टेड ठेकेदारांना कामे दिली तर हीच परिस्थिती होणार. कल्याण मलंग रस्त्याचीच नव्हे संपूर्ण कल्याण डोंबिवलीतील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. पालकमंत्र्यांनी वेळ काढून रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी करावी, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे. 

आमचे आयुक्तसाहेब हे अद्याप कलेक्टर मोडमधून आयुक्त मोडमध्ये आलेले नाही. खुर्च्या उबवायला बसलेत. कुठलीही कामे करीत नाहीत. कुणाल पाटील यांनी स्वखर्चाने खड्डे बुजविले होते. प्रशासन कोणाचीच दखल घेत नाही. यांना लाजा वाटायला पाहिजेत. आज पाहणीला येणार असे सांगितल्यावर काही मुख्य अधिकारी आजारी पडल्याचे सांगत आहेत. आत्ता मला कळाले, की ते का आले नाही. इंजिनिअर खात्यात बदली केली जाते. कोणाला कोणाचा पायपोस नसतो. एकमेकांवर ढकलपट्टीची कामे चालू असतात. अत्यंत वाईट परिस्थिती करून ठेवली आहे. कल्याण-डोंबिवलीची सत्ताधाऱ्यांनी वाट लावून ठेवली आहे, असेही पाटील  म्हणाले.

कल्याण डोंबिवलीतील खड्डे बुजविण्यावर 114 कोटी रुपये खर्च झाले याविषयी पाटील यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, दिसतो का, असा प्रतिसवाल उपस्थित केला. खड्ड्यांचे सोडा पालिकेतील अधिकारी बिले काढण्यासाठी 2 टक्के घेतात. सगळीकडे अडवणूक, फसवणूक सुरु आहे. एक तर लोकप्रतिनिधी नाहीत. प्रशासक आहे. कशाला कशाचा पायपोस नाही. खड्डे बुजविण्यासाठी आठ वर्षात 114 कोटी रुपये खर्च करुन दरवर्षी हीच परिस्थिती असते. निवडणूका आल्यावर आत्ता स्कीम घेऊन येतील. खड्डे भरा, नाही तर यांना आम्हाला खड्ड्यात भरावे लागेल, असा इशाराही यावेळी आमदार पाटील यांनी दिला आहे. आम्ही काय करू शकतो, मग केसेस करणार आमच्यावर, करू देत. सहनशीलतेचा अंत झाला आहे. नुसते खड्डेच खड्डे आहेत, असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेMNSमनसेPotholeखड्डे