शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Raj Thackeray: दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंवर खोचक निशाणा, सभेपूर्वीच लोकांना दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 16:28 IST

राज ठाकरे आजपर्यंत कुठेही विजयी झालेले नाहीत, आता तरी विजयी व्हावेत. आता, तरी त्यांची सभा यशस्वी होऊन त्यानिमित्ताने विजय मिळो

कल्याण/डोंबिवली - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेकडे आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन गेल्या महिनाभरापासून राज्यात शाब्दीक गदारोळ माजला आहे. राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेला सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्षपणे विरोधच केला आहे. तर, त्यांची बदललेली भूमिका अनेकांना आश्चर्यचकित करणारी आहे. त्यातूनच, शिवसेनेसह महाविकास आघाडीचे नेते त्यांच्यावर जोरदार टिका करत आहेत. शिवसेनेच्या महिला नेत्या दिपाली सय्यद यांनीही राज ठाकरेंवर आजच्या सभेपूर्वी निशाणा साधला.

राज ठाकरे आजपर्यंत कुठेही विजयी झालेले नाहीत, आता तरी विजयी व्हावेत. आता, तरी त्यांची सभा यशस्वी होऊन त्यानिमित्ताने विजय मिळो, असा चिमटा सय्यद यांनी काढला. कल्याणात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त कल्याणच्या छत्रपती शिवाजी चौकातून न्यू कामगार संघटनेच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उदघाटन दिपाली सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, न्यू कामगार सेनेचे अध्यक्ष समीर पिंपळे, महाराष्ट्र सदस्य हर्षवर्धन साईवाला यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र नांदतात आणि सण साजरे करतात. राज ठाकरेंनी वक्तव्य केल्यानंतर भोंग्याचे जे राजकारण सुरू झाले त्यात राणा दाम्पत्यांनीही उडी घेतली. राजकारण कोण कशासाठी करतोय हे सर्वांना ज्ञात आहे. कोण कोणाची एबीसीडी टिम आहे, हेदेखील माहिती आहे. काही हिंदू जातील राज यांच्याबरोबर तर काही मुस्लिम जातील ओवेसींबरोबर. पण, या राजकारणातून वाद, दंगली होणार आणि सर्वसामान्य नागरीक यात भरडला जाणार. त्यामुळे लोकांनीच विचार केला पाहिजे, असेही दिपाली सय्यद यांनी म्हटले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेShiv Senaशिवसेनाdeepali sayedदीपाली सय्यदMNSमनसेAurangabadऔरंगाबाद