शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अनोखं आंदोलन! उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पोस्ट कार्ड स्वाक्षरी अभियान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 15:50 IST

Ulhas River Pollution: उल्हास नदीतील प्रदुषणाविरोधात उल्हास नदी कृती बचाव समितीने पोस्ट कार्ड स्वाक्षरी अभियान (postcard Campaign) सुरु केले आहे

उल्हास नदीचे प्रदूषण (Ulhas River Pollution) रोखण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन दिवसापासून मी कल्याणकर संस्थेच्या (Mi kalyankar)) वतीने नदीच्या पात्रात बसून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास बळ देण्यासाठी उल्हास नदी कृती बचाव समितीने पोस्ट कार्ड स्वाक्षरी अभियान सुरु केले आहे. नदी प्रदूषण रोखण्याकडे दुर्लक्ष करणा:या संबंधित अधिका:याना निलंबीत करण्यात यावे अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या पोस्ट कार्ड स्वाक्षरी आंदोलनामुळे मी कल्याणकर संस्थेच्या आंदोलनाला एक प्रकारचे बळ मिळाले आहे. (Postcard Campaign for Ulhas River Pollution)

उल्हास नदी बचाव कृती समितीचे रविंद्र लिंगायत यांनी ही माहिती दिली आहे. नदी बचावसाठी समिती गेल्या दोन वर्षापासून प्रयत्नशील आहे. नदीच्या पात्रत ज्या ठिकाणी प्रदूषण केल जाते. त्याठिकाणचे नमून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेतले जात नाही. ही बाब समितीने उघड केली होती. त्याचबरोबर नदीचा अभ्यास उमगापासून केला होता. त्या अभ्यास पाहणी दौ:यातून नदी कजर्त ते मोहने बंधा:यार्पयत प्रदूषित होते. ही धक्कादायक बाब समोर आली होती. तसेच म्हारळ गावाचा प्रदूषित नाल्याचे सांडपाणी थेट उल्हास नदीत सोडले जाते. याकडेही सरकारी यंत्रणांचे लक्ष वेधले होते.

नदी प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याण संस्थेच्या वतीेन नितीन निकम व त्यांचे सहकारी माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह कैलास शिंदे यांनी नदी पात्रात सुरु केलेल्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. नदी प्रदूषणाची जबाबदार रोखण्याची जबाबदारी नेमकी कोणाची यासाठी एकही सरकारी अधिकारी पुढे येत नाही. हे आंदोलन बेदखल ठरले आहे. त्यामुळे आज उल्हास नदी बचाव कृती समितीने नदी शेजारी असलेल्या गावक:यांच्या मदतीने पोस्टकार्ड स्वाक्षरी मोहिम आजपासून सुरु केली आहे.

नदी प्रदूषण रोखण्याची जबाबदारी न घेणा:या लघू पाटबंधारे, प्रदूषण नियंत्रण मंडल, ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक, पालिका व महापालिकेची अधिकारी, एमआयडीसी या सगळ्य़ाच जबाबदार अधिका:यांचे निलंबन करावे असे पोस्टकार्डवर लिहून स्वाक्षरी केली जात आहे. ते पोस्टकार्ड सरकारला पाठविले जाणार आहे. त्याचबरोबर पर्यावरण मंत्र्यानी ही पोस्टकार्ड पाठविली जाणार आहेत. वालधूनी ही जिवीत असलेली बारमाही नदी नागरीकरणाच्या रेटा व प्रदूषणामुळे सगळ्य़ात जास्त प्रदूषित नदी झाली. या नदीचा नाला झाला. तोच प्रकार आत्ता उल्हास नदी बाबत सुरु आहे. उल्हास नदीचा उल्हास नाला करण्याचा चंग संबंधित अधिका:यांनी बांधला आहे. पाण्याचा नैसर्गिक असलेला इतका मोठा बारमाही स्त्रोत नष्ट झाला तर ४८ लाख जनतेची तहान कोण भागविणार. त्यासाठी पर्यायी व्यवस्था सरकारी अधिकारी वर्गाकडे आहे का असा सवाल उल्हास नदी बचाव कृती समितीने उपस्थित केला आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणpollutionप्रदूषण