शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

अनोखं आंदोलन! उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पोस्ट कार्ड स्वाक्षरी अभियान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 15:50 IST

Ulhas River Pollution: उल्हास नदीतील प्रदुषणाविरोधात उल्हास नदी कृती बचाव समितीने पोस्ट कार्ड स्वाक्षरी अभियान (postcard Campaign) सुरु केले आहे

उल्हास नदीचे प्रदूषण (Ulhas River Pollution) रोखण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन दिवसापासून मी कल्याणकर संस्थेच्या (Mi kalyankar)) वतीने नदीच्या पात्रात बसून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास बळ देण्यासाठी उल्हास नदी कृती बचाव समितीने पोस्ट कार्ड स्वाक्षरी अभियान सुरु केले आहे. नदी प्रदूषण रोखण्याकडे दुर्लक्ष करणा:या संबंधित अधिका:याना निलंबीत करण्यात यावे अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या पोस्ट कार्ड स्वाक्षरी आंदोलनामुळे मी कल्याणकर संस्थेच्या आंदोलनाला एक प्रकारचे बळ मिळाले आहे. (Postcard Campaign for Ulhas River Pollution)

उल्हास नदी बचाव कृती समितीचे रविंद्र लिंगायत यांनी ही माहिती दिली आहे. नदी बचावसाठी समिती गेल्या दोन वर्षापासून प्रयत्नशील आहे. नदीच्या पात्रत ज्या ठिकाणी प्रदूषण केल जाते. त्याठिकाणचे नमून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेतले जात नाही. ही बाब समितीने उघड केली होती. त्याचबरोबर नदीचा अभ्यास उमगापासून केला होता. त्या अभ्यास पाहणी दौ:यातून नदी कजर्त ते मोहने बंधा:यार्पयत प्रदूषित होते. ही धक्कादायक बाब समोर आली होती. तसेच म्हारळ गावाचा प्रदूषित नाल्याचे सांडपाणी थेट उल्हास नदीत सोडले जाते. याकडेही सरकारी यंत्रणांचे लक्ष वेधले होते.

नदी प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याण संस्थेच्या वतीेन नितीन निकम व त्यांचे सहकारी माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह कैलास शिंदे यांनी नदी पात्रात सुरु केलेल्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. नदी प्रदूषणाची जबाबदार रोखण्याची जबाबदारी नेमकी कोणाची यासाठी एकही सरकारी अधिकारी पुढे येत नाही. हे आंदोलन बेदखल ठरले आहे. त्यामुळे आज उल्हास नदी बचाव कृती समितीने नदी शेजारी असलेल्या गावक:यांच्या मदतीने पोस्टकार्ड स्वाक्षरी मोहिम आजपासून सुरु केली आहे.

नदी प्रदूषण रोखण्याची जबाबदारी न घेणा:या लघू पाटबंधारे, प्रदूषण नियंत्रण मंडल, ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक, पालिका व महापालिकेची अधिकारी, एमआयडीसी या सगळ्य़ाच जबाबदार अधिका:यांचे निलंबन करावे असे पोस्टकार्डवर लिहून स्वाक्षरी केली जात आहे. ते पोस्टकार्ड सरकारला पाठविले जाणार आहे. त्याचबरोबर पर्यावरण मंत्र्यानी ही पोस्टकार्ड पाठविली जाणार आहेत. वालधूनी ही जिवीत असलेली बारमाही नदी नागरीकरणाच्या रेटा व प्रदूषणामुळे सगळ्य़ात जास्त प्रदूषित नदी झाली. या नदीचा नाला झाला. तोच प्रकार आत्ता उल्हास नदी बाबत सुरु आहे. उल्हास नदीचा उल्हास नाला करण्याचा चंग संबंधित अधिका:यांनी बांधला आहे. पाण्याचा नैसर्गिक असलेला इतका मोठा बारमाही स्त्रोत नष्ट झाला तर ४८ लाख जनतेची तहान कोण भागविणार. त्यासाठी पर्यायी व्यवस्था सरकारी अधिकारी वर्गाकडे आहे का असा सवाल उल्हास नदी बचाव कृती समितीने उपस्थित केला आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणpollutionप्रदूषण