शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अनोखं आंदोलन! उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पोस्ट कार्ड स्वाक्षरी अभियान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 15:50 IST

Ulhas River Pollution: उल्हास नदीतील प्रदुषणाविरोधात उल्हास नदी कृती बचाव समितीने पोस्ट कार्ड स्वाक्षरी अभियान (postcard Campaign) सुरु केले आहे

उल्हास नदीचे प्रदूषण (Ulhas River Pollution) रोखण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन दिवसापासून मी कल्याणकर संस्थेच्या (Mi kalyankar)) वतीने नदीच्या पात्रात बसून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास बळ देण्यासाठी उल्हास नदी कृती बचाव समितीने पोस्ट कार्ड स्वाक्षरी अभियान सुरु केले आहे. नदी प्रदूषण रोखण्याकडे दुर्लक्ष करणा:या संबंधित अधिका:याना निलंबीत करण्यात यावे अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या पोस्ट कार्ड स्वाक्षरी आंदोलनामुळे मी कल्याणकर संस्थेच्या आंदोलनाला एक प्रकारचे बळ मिळाले आहे. (Postcard Campaign for Ulhas River Pollution)

उल्हास नदी बचाव कृती समितीचे रविंद्र लिंगायत यांनी ही माहिती दिली आहे. नदी बचावसाठी समिती गेल्या दोन वर्षापासून प्रयत्नशील आहे. नदीच्या पात्रत ज्या ठिकाणी प्रदूषण केल जाते. त्याठिकाणचे नमून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेतले जात नाही. ही बाब समितीने उघड केली होती. त्याचबरोबर नदीचा अभ्यास उमगापासून केला होता. त्या अभ्यास पाहणी दौ:यातून नदी कजर्त ते मोहने बंधा:यार्पयत प्रदूषित होते. ही धक्कादायक बाब समोर आली होती. तसेच म्हारळ गावाचा प्रदूषित नाल्याचे सांडपाणी थेट उल्हास नदीत सोडले जाते. याकडेही सरकारी यंत्रणांचे लक्ष वेधले होते.

नदी प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याण संस्थेच्या वतीेन नितीन निकम व त्यांचे सहकारी माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह कैलास शिंदे यांनी नदी पात्रात सुरु केलेल्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. नदी प्रदूषणाची जबाबदार रोखण्याची जबाबदारी नेमकी कोणाची यासाठी एकही सरकारी अधिकारी पुढे येत नाही. हे आंदोलन बेदखल ठरले आहे. त्यामुळे आज उल्हास नदी बचाव कृती समितीने नदी शेजारी असलेल्या गावक:यांच्या मदतीने पोस्टकार्ड स्वाक्षरी मोहिम आजपासून सुरु केली आहे.

नदी प्रदूषण रोखण्याची जबाबदारी न घेणा:या लघू पाटबंधारे, प्रदूषण नियंत्रण मंडल, ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक, पालिका व महापालिकेची अधिकारी, एमआयडीसी या सगळ्य़ाच जबाबदार अधिका:यांचे निलंबन करावे असे पोस्टकार्डवर लिहून स्वाक्षरी केली जात आहे. ते पोस्टकार्ड सरकारला पाठविले जाणार आहे. त्याचबरोबर पर्यावरण मंत्र्यानी ही पोस्टकार्ड पाठविली जाणार आहेत. वालधूनी ही जिवीत असलेली बारमाही नदी नागरीकरणाच्या रेटा व प्रदूषणामुळे सगळ्य़ात जास्त प्रदूषित नदी झाली. या नदीचा नाला झाला. तोच प्रकार आत्ता उल्हास नदी बाबत सुरु आहे. उल्हास नदीचा उल्हास नाला करण्याचा चंग संबंधित अधिका:यांनी बांधला आहे. पाण्याचा नैसर्गिक असलेला इतका मोठा बारमाही स्त्रोत नष्ट झाला तर ४८ लाख जनतेची तहान कोण भागविणार. त्यासाठी पर्यायी व्यवस्था सरकारी अधिकारी वर्गाकडे आहे का असा सवाल उल्हास नदी बचाव कृती समितीने उपस्थित केला आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणpollutionप्रदूषण