शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पलावा जंक्शन आणि काटई रेल्वे उड्डाणपूलाच्या पोहच रस्त्याचा मार्ग मोकळा

By मुरलीधर भवार | Published: March 19, 2024 5:26 PM

पोहच रस्त्याकरीता आवश्यक असलेले भूसंपादन तातडीने करण्यात यावे असे आदेश कल्याणचे प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांना दिले आहेत.

कल्याण-कल्याण शीळ रस्त्यावर पलावा जंक्शन आणि काटई रेल्वे उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. या दोन्ही पूलांकरीता पोहच रस्ता हवा आहे. या पोहच रस्त्यात खाजगी जमीन मालकांची जागा बाधित होते. त्यांनी या पूलाचे काम दोन वेळा बंद पाडले होते. त्यांना त्यांचा मोबदला दिला जात नसल्याने हा प्रकार घडला होता. आत्ता राज्य रस्ते विकास महामंडळाने महसूल खात्याकडे १९ कोटी ५५ लाख रुपयांचा मोबदला वर्ग केला आहे. पोहच रस्त्याकरीता आवश्यक असलेले भूसंपादन तातडीने करण्यात यावे असे आदेश कल्याणचे प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांना दिले आहेत.

भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम ८० टक्के पूर्ण झालेले आहे. उर्वरीत २० टक्के काम शिल्लक आहे. २० टक्के जागा संपादीत झालेली नाही. ही २० टक्के जागा खाजगी जमीन मालकांची आहे. त्यात १५० लोक बाधित होत आहे. त्यांच्या मोबदल्याचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांनी यापूर्वीच दिले आहे. मोबदल्याची रक्कम ३०७ कोटी रुपये देण्याचे ठरले आहे. यासाठी सर्व पक्षी युवा मोर्चाचे प्रमुख गजानन पाटील हे प्रयत्नशील आहेत.

मनसे आमदार राजू पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी या पूलाच्या कामात रखडपट्टी होत असल्याच्या मुद्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. ३०७ कोटी रुपये रक्कमेत कल्याण शीळ रस्ते बाधिताचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. सध्या पलावा जंक्शन येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उड्डाणपूलाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने नेमलेल्या कंत्राटदार कंपनीकडून सुरु आहे. त्याचबरोबर कल्याण शीळ रस्त्याला खालून दिवा पनवेल रेल्वे मार्ग आहे. त्याचबरोबर डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाचा रेल्वे मार्ग तयार केला जात आहे. सध्या काटई जुना रेल्वे उड्डाणपूल अस्तित्वात आहे.

याठिकाणी नवा रेल्वे उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. पलावा जंक्शन उड्डाण पूल आणि काटई रे्ल्वे उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. हो काम मार्गी लावायचे आहे. हे काम सुरु असताना दोन वेळा काटईतील प्रकल्प बाधितांनी त्यांच्या जमीनीचा मोबदला दिला गेला नसल्याने काम बंद पाडले होते. ३०७ कोटी मोबदला रक्कमेपैकी तूर्तास १९ कोटी ५५ लाख रुपये मोबदला रक्कम महसूल खात्याकडे वर्ग करण्यात आली आहे. या रक्कमेतून बाधितांची जमीन संपादीत करुन उड्डाणपूलाच्या पोहच रस्ता विकास कामातील अडथळा तातडीने दूर करावा असे राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता नितीन बोरोले यांनी कल्याणचे प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांना सूचित केले आहे. रस्ते प्रकल्पातील उर्वरीत बाधितांच्या माेबदला रक्कमेचा विषयही लवकर मार्गी लावला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणRaju Patilराजू पाटील