शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

"त्या पत्रांचं काय झालं, झोपेचं सोंग घेतलेल्या राज्य सरकारचं करायचं काय?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 14:49 IST

Maharashtra Government And Local News : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे गाड्या अजूनही सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नाहीत.

डोंबिवली - कोविडच्या महामारीमुळे ८ महिन्यापासून मुंबई उपनगरीय रेल गाड्या बंद आहेत. जूनपर्यंत शासकीय, निमशासकीय व खासगी अशी सर्व कार्यालये व कारखाने संपूर्णपणे बंद होते. तीच परिस्थिती सर्वसाधारणपणे संपूर्ण देशातही होती. ही महामारी पुष्कळ प्रमाणात आटोक्यात आलेली आहे. इतर राज्यांनी त्यामुळे बरीचशी बधने शिथिल केलेली आहेत. राज्यात राज्य परिवहन, मुंबईतील बेस्टच्या बसेस कोणत्याही बंधनाशिवाय चालत आहेत. टॅक्सी, अन्य खासगी गाड्यावरही काहीही बंधने  नाहीत.  परंतू मुंबईच्या उपनगरीय रेल्वे गाड्या अजूनही सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नाहीत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेला उद्देशून संभाषण केले, पण त्यात सर्वांसाठी लोकल प्रवासाचा उल्लेख देखील नव्हता, त्यामुळे सामान्यांचे हाल कोण जाणणार असा सवाल करत ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेने मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली. श्रीमंत प्रवाशांना त्यांची स्वतःची वाहने असतात, शासकीय अधिकाऱ्यांना, मंत्र्यांसह त्यांच्या कुटुंबियांसाठी शासकीय वाहने असतात. त्यामुळे उपनगरीय गाड्यांची सुविधा असो, नसो त्याची झळ त्यापैकी कोणालाही लागत नाही, अशी टीका संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केली. मात्र लोकल नसल्याने त्या परिस्थितीत सामान्य माणूस पिचला जात आहे. नोकरी टिकविण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत असतानाच त्याना सध्या जी काही वेतनपोटी मिळकत मिळत आहे ती बहुतांशी मिळकत प्रवासासाठी खर्च करावी लागत आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर उपासमारी, कर्जबाजारी होण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यातून नैराश्य येऊन त्यांनी अन्य टोकाचे निर्णय घेण्याआधीच राज्य शासनाने निर्णय घेऊन सामान्य माणसाचे हाल थांबवावेत असे देशमुख म्हणाले.

देशात अन्यत्र उपनगरीय गाड्या सुरू झाल्या आहेत तेथे त्या सर्व सुरळीत सुरू असल्याने तेथील नागरिकांना बराच दिलासा मिळालेला आहे.  मुंबईची भौगोलिक परिस्थिती पाहता कामावर जाणाऱ्या कार्मचाऱ्यास रोज सकाळ/संध्याकाळी सरासरी ५० किलोमीटरचा प्रवास करणे गरजेचे असते जे सार्वजनिक व स्वस्त पैशात असणे गरजेचे असते. बसने प्रवास करणे शक्य नसते. त्यामुळे मुंबईतही उपनगरीय गाड्यामधील प्रवासाची मुभा सामान्यांसाठी तात्काळ सुरु करण्यात यावी. कोरोना रोखण्यासाठी प्रवासाच्या अटी व शर्ती भलेही कडक असाव्यात, यासंदर्भात राज्य शासनाच्या सचिवांशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला असून त्या पत्रांचे झाले काय? बासनात गुंडाळले का? असा सवाल करत त्यांनी राज्य शासनाला सगळं समजत असून झोपेचे सोंग घेत आहे का? असे असेल तर अशा शासनाचे करायचे तरी काय अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlocalलोकलUddhav Thackerayउद्धव ठाकरे