शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

माझी वसुंधरा, माझा निसर्ग, माझा बाप्पा! डोंबिवलीतील जाधव कुटुंबियांची अनोखी संकल्पना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 16:10 IST

Dombivali News : निसर्गाचे महत्त्व पटवून देण्यासाठी डोंबिवलीतील लोढा हेवन येथे माझी वसुंधरा, माझा निसर्ग, माझा बाप्पा ही अनोखी संकल्पना बाप्पाच्या देखाव्यातून मांडली आहे. 

मयुरी चव्हाण 

सृष्टीत सर्वत्र ईश्वराने मुक्तहस्ताने आपल्याला दान दिले आहे. जसे की नद्या, झाडे, तलाव, हवा, निसर्ग, पक्षी, फुले आणि ही यादी न संपणारी आहे. मनुष्याने सुरुवातीला हवा तसा त्याचा उपभोग घेऊन कालांतराने त्याच पर्यावरणाचे व निसर्गाचे लचके तोडण्यास सुरुवात केली. परिणामी पूर, भुस्खलन, दुष्काळ सोबत विविध आजार आले ते वेगळंच! अपरिमित वृक्षतोड, नद्या - समुद्र बुजविणे तसेच डोंगर तोंडून रस्ते बनविणे, नैसर्गिक स्रोत बंद करणे हे सर्व केले आणि त्याचाच परिणाम बदलते ऋतू चक्र,दुष्काळ, महापूर, भुस्खलन आणि महाड, उत्तराखंड, कोल्हापूर या  ठिकाणी झालेला निसर्गाचा कोप. या पार्श्वभूमीवर निसर्गाचे महत्त्व पटवून देण्यासाठी डोंबिवलीतील लोढा हेवन येथे माझी वसुंधरा, माझा निसर्ग, माझा बाप्पा ही अनोखी संकल्पना बाप्पाच्या देखाव्यातून मांडली आहे. 

जाधव कुटुंबीयांनी लाडक्या बाप्पाची मूर्ती घरच्या घरी मातीने बनविली आहे. बाप्पा स्वतःच्या सोंडेने झाडाला पाणी घालत आहेत  असं या देखाव्यातून मांडण्यात आलं असून "वृक्ष जोपासना करावी" असा संदेश देखील देण्यात आला आहे. गवत, लाजाळू, कडीपत्ता, सिलिजेनिया या झाडांचा वापर केला असून सोबत घरातील  कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण कमी करणारे झाड (स्पायडर) देखील वापरले आहे. सजावटीमध्ये कार्डपेपर,मातीची पणती, मातीचे पक्षी, मातीचे दिवे, नैवैद्यासाठी मातीची ताट-वाटी, प्रसादासाठी मातीची भांडी तसेच सुकलेल्या वडाच्या झाडाच्या पारंब्या हे पर्यावरण पूरक सामान व बाप्पाची मूर्ती ही मातीची, रंग पाण्याचे व मातीचे आणि सभोवतालची सजावटही जी ईको फ्रेंडली व पर्यावरणपूरक असल्याचे दिसून येते रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी तुळस देखील सजावटीत वापरली असून झाडे लावा, जंगल टिकवा, पर्यावरण वाचवा असा संदेश देताना बाप्पा विराजमान झाले आहेत.

पावसाचे पाणी डोंगराहून येत असताना माती धरून ठेवण्यासाठी जी झाडे किंवा जी क्षमता लागते ती अनेक ठिकाणी नव्हती म्हणून या ठिकाणी  सर्व गावात भुस्खलन होऊन ती डोंगराखाली गाडली गेली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झाले. त्यामुळे  झाडांचं महत्व खूप आहे तसेच  सोबत कोरोनाच्या प्रत्येक लाटेत जनतेला देखील ऑक्सिजनचीच गरज लागलेली हे देखील सर्वांनांच माहीत आहे म्हणूनच आता आपल्या आसपासच्या पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.

- प्रशांत जाधव , डोंबिवली, लोढा हेवन.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवdombivaliडोंबिवलीenvironmentपर्यावरण