शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

फेरीवाला धाेरण लागू न केल्यास फेरीवाल्यांना KDMCत आणून बसवू, राजू पाटील यांचा इशारा

By मुरलीधर भवार | Updated: April 6, 2023 19:01 IST

फेरीवाला धाेरण लागू न केल्यास फेरीवाल्यांना KDMCत आणून बसवू असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे. 

कल्याण : येत्या महिन्याभरात कल्याण डाेंबिवलीत फेरीवाला धाेरण महापालिका प्रशासनाने लागू न केल्यास फेरीवाल्यांना महापालिका मुख्यालयात आणून बसवू असा इशारा मनसेआमदार राजू पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे. आज मनसेआमदार पाटील यांनी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. 

त्यांनी फेरीवाला मुद्यावर त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीस मनसेचे शहराध्यक्ष मनाेज घरत, पदाधिकारी प्रकाश भाेईर, सुदेश चुडनाईक, राहूल कामत आदी पदाधिकारी उपस्थित हाेते. फेरीवालाही माणूस आहे. त्यांच्यासाठी धाेरण राबविण्याची २०१४ सालापासून सुरु आहे. अद्याप ते लागू का झाले नाही. येत्या महिन्याभरात हे धाेरण लागू न केल्यास फेरीवाल्यांना महापालिका मुख्यालयात आणून बसवू असा इशारा दिला आहे. आयुक्त धाेरण राबविण्याविषयी सकारात्मक आहेत. गेल्या महिन्यात डाेंबिवलीत स्टेशन परिसरातीळ फेरीवाले हटविले गेले नाहीत तर आंदाेलनाचा इशारा आमदारांनी दिला हाेता. 

त्यांनी आंदाेलन करण्यापूर्वीच फेरीवाले स्टेशन परिसरातून गायब झाले. तेव्हा त्यांनी हे शक्य आहे. मात्र प्रशासन करु शकत नाही. याकडे लक्ष वेधले हाेते. आज पुन्हा आमदारांनी या प्रकरणी आयुक्तांची भेट घेतली. आत्ता फेरीवाला धाेरण लागू करण्यासाठी डेडलाईन दिली आहे. फेरीवाल्यांचा सर्वेक्षण झाले असताना त्यांचे जागा वाटप का केली जात नाही हा सवालही त्यांनी प्रशासनाला विचारला. फेरीवाल्या प्रमाणेच रिक्षा स्टॅण्डलाही जागा उपलब्ध करुन देण्याचा मुद्दा उपस्थित केला.

सध्याचे जे राजकारण चालू आहे, कुणी फडतूस बोलतंय कुणी काडतूस बोलतंय. लोकांच्या समस्यांकडे देखील लक्ष दिल पाहिजे. मी स्वतः राजकारणी आहे. मात्र या पातळीला राजकारण नाही केले पाहिजे कोणाच्या तरी पाठी लागून आपली भाषा तशीच वापरायची याला काही अर्थ नाही काही लोकांकडून अपेक्षा असते त्याला खरे उतरले पाहिजे असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.

चाैकट-राज्य सरकार महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील गावांना सुविधा देत असेल तर कोणाच्या पोटात का दुखतं असा सवाल आमदार पाटील यांनी केला आहे. त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील ८६५ मराठी भाषिक गावातील नागरिकांना राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू केल्याने त्याला कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी त्याला विरोध केला. ही योजना महाराष्ट्र सरकारने मागे घ्यावे असे आवाहन कनार्टकने सरकारने केले आहे. त्यावर मनसे आमदारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना टोला लागवला.

 

टॅग्स :kalyanकल्याणMNSमनसेMLAआमदारkdmcकल्याण डोंबिवली महापालिका