शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

फेरीवाला धाेरण लागू न केल्यास फेरीवाल्यांना KDMCत आणून बसवू, राजू पाटील यांचा इशारा

By मुरलीधर भवार | Updated: April 6, 2023 19:01 IST

फेरीवाला धाेरण लागू न केल्यास फेरीवाल्यांना KDMCत आणून बसवू असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे. 

कल्याण : येत्या महिन्याभरात कल्याण डाेंबिवलीत फेरीवाला धाेरण महापालिका प्रशासनाने लागू न केल्यास फेरीवाल्यांना महापालिका मुख्यालयात आणून बसवू असा इशारा मनसेआमदार राजू पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे. आज मनसेआमदार पाटील यांनी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. 

त्यांनी फेरीवाला मुद्यावर त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीस मनसेचे शहराध्यक्ष मनाेज घरत, पदाधिकारी प्रकाश भाेईर, सुदेश चुडनाईक, राहूल कामत आदी पदाधिकारी उपस्थित हाेते. फेरीवालाही माणूस आहे. त्यांच्यासाठी धाेरण राबविण्याची २०१४ सालापासून सुरु आहे. अद्याप ते लागू का झाले नाही. येत्या महिन्याभरात हे धाेरण लागू न केल्यास फेरीवाल्यांना महापालिका मुख्यालयात आणून बसवू असा इशारा दिला आहे. आयुक्त धाेरण राबविण्याविषयी सकारात्मक आहेत. गेल्या महिन्यात डाेंबिवलीत स्टेशन परिसरातीळ फेरीवाले हटविले गेले नाहीत तर आंदाेलनाचा इशारा आमदारांनी दिला हाेता. 

त्यांनी आंदाेलन करण्यापूर्वीच फेरीवाले स्टेशन परिसरातून गायब झाले. तेव्हा त्यांनी हे शक्य आहे. मात्र प्रशासन करु शकत नाही. याकडे लक्ष वेधले हाेते. आज पुन्हा आमदारांनी या प्रकरणी आयुक्तांची भेट घेतली. आत्ता फेरीवाला धाेरण लागू करण्यासाठी डेडलाईन दिली आहे. फेरीवाल्यांचा सर्वेक्षण झाले असताना त्यांचे जागा वाटप का केली जात नाही हा सवालही त्यांनी प्रशासनाला विचारला. फेरीवाल्या प्रमाणेच रिक्षा स्टॅण्डलाही जागा उपलब्ध करुन देण्याचा मुद्दा उपस्थित केला.

सध्याचे जे राजकारण चालू आहे, कुणी फडतूस बोलतंय कुणी काडतूस बोलतंय. लोकांच्या समस्यांकडे देखील लक्ष दिल पाहिजे. मी स्वतः राजकारणी आहे. मात्र या पातळीला राजकारण नाही केले पाहिजे कोणाच्या तरी पाठी लागून आपली भाषा तशीच वापरायची याला काही अर्थ नाही काही लोकांकडून अपेक्षा असते त्याला खरे उतरले पाहिजे असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.

चाैकट-राज्य सरकार महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील गावांना सुविधा देत असेल तर कोणाच्या पोटात का दुखतं असा सवाल आमदार पाटील यांनी केला आहे. त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील ८६५ मराठी भाषिक गावातील नागरिकांना राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू केल्याने त्याला कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी त्याला विरोध केला. ही योजना महाराष्ट्र सरकारने मागे घ्यावे असे आवाहन कनार्टकने सरकारने केले आहे. त्यावर मनसे आमदारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना टोला लागवला.

 

टॅग्स :kalyanकल्याणMNSमनसेMLAआमदारkdmcकल्याण डोंबिवली महापालिका