शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाला धाेरण लागू न केल्यास फेरीवाल्यांना KDMCत आणून बसवू, राजू पाटील यांचा इशारा

By मुरलीधर भवार | Updated: April 6, 2023 19:01 IST

फेरीवाला धाेरण लागू न केल्यास फेरीवाल्यांना KDMCत आणून बसवू असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे. 

कल्याण : येत्या महिन्याभरात कल्याण डाेंबिवलीत फेरीवाला धाेरण महापालिका प्रशासनाने लागू न केल्यास फेरीवाल्यांना महापालिका मुख्यालयात आणून बसवू असा इशारा मनसेआमदार राजू पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे. आज मनसेआमदार पाटील यांनी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. 

त्यांनी फेरीवाला मुद्यावर त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीस मनसेचे शहराध्यक्ष मनाेज घरत, पदाधिकारी प्रकाश भाेईर, सुदेश चुडनाईक, राहूल कामत आदी पदाधिकारी उपस्थित हाेते. फेरीवालाही माणूस आहे. त्यांच्यासाठी धाेरण राबविण्याची २०१४ सालापासून सुरु आहे. अद्याप ते लागू का झाले नाही. येत्या महिन्याभरात हे धाेरण लागू न केल्यास फेरीवाल्यांना महापालिका मुख्यालयात आणून बसवू असा इशारा दिला आहे. आयुक्त धाेरण राबविण्याविषयी सकारात्मक आहेत. गेल्या महिन्यात डाेंबिवलीत स्टेशन परिसरातीळ फेरीवाले हटविले गेले नाहीत तर आंदाेलनाचा इशारा आमदारांनी दिला हाेता. 

त्यांनी आंदाेलन करण्यापूर्वीच फेरीवाले स्टेशन परिसरातून गायब झाले. तेव्हा त्यांनी हे शक्य आहे. मात्र प्रशासन करु शकत नाही. याकडे लक्ष वेधले हाेते. आज पुन्हा आमदारांनी या प्रकरणी आयुक्तांची भेट घेतली. आत्ता फेरीवाला धाेरण लागू करण्यासाठी डेडलाईन दिली आहे. फेरीवाल्यांचा सर्वेक्षण झाले असताना त्यांचे जागा वाटप का केली जात नाही हा सवालही त्यांनी प्रशासनाला विचारला. फेरीवाल्या प्रमाणेच रिक्षा स्टॅण्डलाही जागा उपलब्ध करुन देण्याचा मुद्दा उपस्थित केला.

सध्याचे जे राजकारण चालू आहे, कुणी फडतूस बोलतंय कुणी काडतूस बोलतंय. लोकांच्या समस्यांकडे देखील लक्ष दिल पाहिजे. मी स्वतः राजकारणी आहे. मात्र या पातळीला राजकारण नाही केले पाहिजे कोणाच्या तरी पाठी लागून आपली भाषा तशीच वापरायची याला काही अर्थ नाही काही लोकांकडून अपेक्षा असते त्याला खरे उतरले पाहिजे असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.

चाैकट-राज्य सरकार महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील गावांना सुविधा देत असेल तर कोणाच्या पोटात का दुखतं असा सवाल आमदार पाटील यांनी केला आहे. त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील ८६५ मराठी भाषिक गावातील नागरिकांना राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू केल्याने त्याला कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी त्याला विरोध केला. ही योजना महाराष्ट्र सरकारने मागे घ्यावे असे आवाहन कनार्टकने सरकारने केले आहे. त्यावर मनसे आमदारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना टोला लागवला.

 

टॅग्स :kalyanकल्याणMNSमनसेMLAआमदारkdmcकल्याण डोंबिवली महापालिका