शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"ज्ञानभाषा, 'भाकरीची' भाषा झाल्याशिवाय मराठी भाषेचे संवर्धन होणार नाही"

By मुरलीधर भवार | Updated: December 20, 2023 16:19 IST

आगरी महोत्सवात डॉ. श्रीपाल सबनीस आणि डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत.

डोंबिवली : मराठी ही ज्ञान व रोजगारस्नेही आणि 'भाकरी'ची भाषा होणार नाही, तोपर्यंत मराठीकडे नव्या पिढीचा कल झुकणार नाही. मराठी ज्ञानभाषा करण्याबरोबरच वाचन संस्कृती वृद्धींगत केल्याशिवाय मराठीचे संवर्धन होणार नाही, असे मत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस आणि डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

डोंबिवलीत सुरू असलेल्या १९ व्या आगरी महोत्सवात `मराठी भाषा संवर्धन व जतन' या विषयावर बुधवारी सायंकाळी परिसंवाद भरविण्यात आला होता. या परिसंवादात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सबनीस आणि डॉ. देशमुख यांच्यासह मराठी साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेचे अध्यक्ष सुरेश देशपांडे आदींनी सहभाग घेतला. आगरी महोत्सवाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. दिपाली केळकर यांनी साहित्यिकांबरोबर संवाद साधला.

डॉ. सबनीस म्हणाले, "महाराष्ट्रात स्मशाने सुंदर पण मराठी भाषा भकास अशी स्थिती दिसून येते. ज्ञानाचा प्रसार करणारी वाचनालये सुंदर करायला हवीत. त्यांना भरघोस मदत देण्याऐवजी राज्य सरकार अ, ब, क आणि ड वर्ग अशी वाचनालयांची उपेक्षा करीत आहेत. वाचनालये जगली, तर मराठी जगेल. मराठी शाळा बंद पडण्यास राज्य सरकार जबाबदार आहे. इंग्रजी शाळांचे स्तोम वाढत असून, ते कमी होणार नाही. सध्या श्रीमंतांची इंग्रजी शाळा व गरीब मजूर आणि सामान्यांची मराठी शाळा अशी वर्गवारी झाली. भविष्यात गरीब माणूसच मराठी टिकवू शकेल. मराठीचे वैभव सिद्ध करण्यासाठी जनजागरण करण्याची गरज आहे."

महाराष्ट्रातील मेट्रो शहरांसह मोठी शहरे अमराठी होत आहे. प्रसिद्ध साहित्यिक पु. भा. भावे, शं. ना. नवरे यांच्या डोंबिवलीची अवस्थाही हळूहळू तशी होत आहे.मराठी ही राजभाषा आहे. परंतु, ज्ञान, उद्योग आणि आर्थिक व्यवहारांमध्ये इंग्रजीचे प्रभूत्व आहे. ज्ञानभाषेच्या नावाखाली आपण नतद्रष्टपणामुळे मराठी नष्ट करीत आहोत. चीन, जपान आणि इस्त्राईलप्रमाणे सर्व विज्ञान व तंत्रज्ञान हे मराठी भाषेत आणण्यासाठी प्रयत्न हवेत. अन्य भाषांतील उच्च दर्जाच्या साहित्याचे मराठीत भाषांतर करायला हवे. त्याचबरोबर शाळां-शाळांमध्ये वाचन संस्कृती वृद्धींगत करण्याची गरज आहे. परराज्यात मराठीचा प्रसार करणाऱ्या ग्रंथालयांनाही मदतीचा हात द्यावा, असे मत डॉ. देशमुख यांनी व्यक्त केले.

डोंबिवलीत एकेकाळी ४२ वाचनालये होती. मात्र, आता एखाद-दुसरा वगळता अन्य वाचनालये बंद पडली आहेत, याकडे लक्ष वेधत सुरेश देशपांडे यांनी मराठीच्या संवर्धनासाठी विविध सूचना केल्या.

यांना मिळाला पुरस्कार

यावेळी आगरी युथ फोरमच्या वतीने आगरी भाषेच्या प्रसारासाठी लेखनाच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या लेखकांना स्व. श्री नकूल पाटील स्मृती साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. लेखक श्याम माळी, मोहन भोईर, गजआनन म्हात्रे, प्रकाश हरिश्चंद्र पाटील, दशरथ तुकाराम मुकादम, दयानंद एकनाथ नाईक यांचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

आगरी महोत्सवात एक दिवस साहित्याचा

साहित्य संमेलनासारख्या भव्य आगरी महोत्सवात एक दिवस हा आगरी भाषेसाठी राखीव ठेवावा, अशी सूचना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सबनीस आणि डॉ. देशमुख यांनी केली होती. त्यानुसार पुढील वर्षाच्या आगरी महोत्सवात एक दिवस आगरी साहित्यासाठी ठेवण्याबाबत नक्की विचार करू, असे संयोजन समितीचे अध्यक्ष वझे यांनी जाहीर केले.

टॅग्स :marathiमराठी