शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

साहेब इथं ही राबवा स्वच्छता मोहीम! मलंगरोडला डम्पिंगची अवकळा, कचऱ्यात प्लास्टिकचा खच

By प्रशांत माने | Updated: October 6, 2023 17:03 IST

केडीएमसीकडून शून्य कचरा मोहीमेंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु आजही बहुतांश ठिकाणी कचरा रस्त्यावरच टाकला जात आहे.

कल्याण: २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने रविवारी सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत यात सक्रिय सहभाग घेतल्याचे कल्याण डोंबिवलीतही पाहायला मिळाले. दरम्यान वास्तव पाहता ही मोहीम प्रतिदिन मलंगरोड परिसरात राबविण्याची गरज आहे. याठिकाणी नागरीकांची रस्त्यावर कचरा टाकण्याची वृत्ती कायम राहीली असताना हा कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने या रोडला डम्पिंगची अवकळा आली आहे.

केडीएमसीकडून शून्य कचरा मोहीमेंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु आजही बहुतांश ठिकाणी कचरा रस्त्यावरच टाकला जात आहे. या कच-यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असताना भटके श्वान आणि गायींचा संचार वाढला असून, श्वान चावाचा धोकाही वाढला आहे. साचणा-या कच-याच्या ढिगा-यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा पडलेला खच पाहता प्लास्टिकबंदीलाही हरताळ फासला गेल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळते. दरम्यान पुर्वेतील मलंगरोड हा कचरा टाकण्याचे हक्काचे ठिकाण बनला आहे का? असा सवाल वास्तव पाहता उपस्थित होतो.

दररोज जमा होणारा कचरा वेळेवर आणि नियमितपणे उचलला जात नसल्याने या भागाला डम्पिंगचे स्वरूप आले आहे. कचरा दूरवर पसरला असताना या ठिकाणी पडलेल्या कच-यात सर्वत्र प्लास्टिकच पाहायला मिळत आहे. यावरून प्लास्टिकबंदीचा फज्जा उडाल्याचे इथेही स्पष्ट होत आहे. रस्त्यावर कचरा टाकणारे नागरिक जसे या परिस्थितीला जबाबदार आहेत. त्याचबरोबर कचरा वेळेवर व नियमितपणे उचलण्यात हयगय करणारे मनपाचे घनकचरा व्यवस्थापन आणि खाजगी कंत्राटदारही तितकेच कारणीभूत आहेत. कच-यामुळे परिसरात भटक्या श्वानांचा उपद्रवही वाढला आहे. रस्त्याच्या कडेला डम्पिंगची अवकळा पाहता आयुक्त साहेब इथे ही स्वच्छता मोहीम राबवाच असे म्हणणे अतिशयोक्तिचे ठरणार नाही.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न