शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

साहेब इथं ही राबवा स्वच्छता मोहीम! मलंगरोडला डम्पिंगची अवकळा, कचऱ्यात प्लास्टिकचा खच

By प्रशांत माने | Updated: October 6, 2023 17:03 IST

केडीएमसीकडून शून्य कचरा मोहीमेंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु आजही बहुतांश ठिकाणी कचरा रस्त्यावरच टाकला जात आहे.

कल्याण: २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने रविवारी सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत यात सक्रिय सहभाग घेतल्याचे कल्याण डोंबिवलीतही पाहायला मिळाले. दरम्यान वास्तव पाहता ही मोहीम प्रतिदिन मलंगरोड परिसरात राबविण्याची गरज आहे. याठिकाणी नागरीकांची रस्त्यावर कचरा टाकण्याची वृत्ती कायम राहीली असताना हा कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने या रोडला डम्पिंगची अवकळा आली आहे.

केडीएमसीकडून शून्य कचरा मोहीमेंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु आजही बहुतांश ठिकाणी कचरा रस्त्यावरच टाकला जात आहे. या कच-यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असताना भटके श्वान आणि गायींचा संचार वाढला असून, श्वान चावाचा धोकाही वाढला आहे. साचणा-या कच-याच्या ढिगा-यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा पडलेला खच पाहता प्लास्टिकबंदीलाही हरताळ फासला गेल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळते. दरम्यान पुर्वेतील मलंगरोड हा कचरा टाकण्याचे हक्काचे ठिकाण बनला आहे का? असा सवाल वास्तव पाहता उपस्थित होतो.

दररोज जमा होणारा कचरा वेळेवर आणि नियमितपणे उचलला जात नसल्याने या भागाला डम्पिंगचे स्वरूप आले आहे. कचरा दूरवर पसरला असताना या ठिकाणी पडलेल्या कच-यात सर्वत्र प्लास्टिकच पाहायला मिळत आहे. यावरून प्लास्टिकबंदीचा फज्जा उडाल्याचे इथेही स्पष्ट होत आहे. रस्त्यावर कचरा टाकणारे नागरिक जसे या परिस्थितीला जबाबदार आहेत. त्याचबरोबर कचरा वेळेवर व नियमितपणे उचलण्यात हयगय करणारे मनपाचे घनकचरा व्यवस्थापन आणि खाजगी कंत्राटदारही तितकेच कारणीभूत आहेत. कच-यामुळे परिसरात भटक्या श्वानांचा उपद्रवही वाढला आहे. रस्त्याच्या कडेला डम्पिंगची अवकळा पाहता आयुक्त साहेब इथे ही स्वच्छता मोहीम राबवाच असे म्हणणे अतिशयोक्तिचे ठरणार नाही.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न