शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandh: KDMC चे कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न; शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये वादंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 13:39 IST

संघटनेचे उपाध्यक्ष रवी पाटील आणि सचिन बासरे यांनी आज महापालिका मुख्यालयात जाऊन महाराष्ट्र बंद असल्याने कामगारांनी कामकाज बंद ठेवा असे आवाहन केले.

 कल्याण- शिवसेना प्रणित म्युन्सीपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने आज महाराष्ट्र बंदच्या पाश्र्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयातील कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी बाजारपेठ पोलिसांनी मुख्यालयात धाव घेतली. पोलिस आणि कामगार संघटनेच्या पदाधिका:यांमध्ये वादंग झाला.

संघटनेचे उपाध्यक्ष रवी पाटील आणि सचिन बासरे यांनी आज महापालिका मुख्यालयात जाऊन महाराष्ट्र बंद असल्याने कामगारांनी कामकाज बंद ठेवा असे आवाहन केले. यावेळी कामगारांना कार्यालया बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब कळताच मुख्यालयात बाजारपेठ पोलिसांनी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी पाटील आणि बासरे यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिस आणि त्यांच्यात वादंग झाला. बंदला महाविकास राज्य सरकारचा आघाडीचा पाठिंबा आहे. बंदचे आवाहन करीत असताना कोणीही त्याला विरोध केलेला नसता त्याठिकाणी पोलिस येऊन त्यांनी बंदच्या कामकाजात हस्तक्षेप केला असल्याचा आरोप पाटील आणि बासरे यांनी केला आहे.

दरम्यान आज दुपारी 12 वाजता शिवाजी चौकातील शिवसेना शाखेत शिवसैनिक जमले होते. त्यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन दुकानदारांना केले. लखीमपूर येथील घटनेचा निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच रस्त्यावर चालणा:या रिक्षा चालकांना थांबवून रिक्षा बंद करण्याचे आवाहन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी संदीप देसाई, उमेश बोरगांवकर आदींनी शिवाजी चौकात लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ निदर्शने केली. महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली ब्रीज दत्त, शकील खान, कांचन कुलकर्णी दुचाकीवरुन पक्षाचे झेंडे हाती घेत शिवाजी चौक, स्टेशन परिसर, खडकपाडा, चिकनघर, सहजानंद चौकातील दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी पोलिसांची जीप पक्षाच्या कार्यकत्र्याचा पाठलाग करीत होती. मात्र कार्यकर्ते कुठेही न थांबता दुकानदारांना दुकाने बंदचे आवाहन करीत होते. काँग्रेच्या काही कार्यकतेा आणि पदाधिका:यांनी शिवाजी चौकात निदर्शने करुन केंद्र सरकारचा निषेध केला.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ५५ बसेस दररोज रस्त्यावर धावतात. मात्र आज महाराष्ट्र बंद असल्याने रस्त्यावर प्रवासी कमी आहेत. त्यामुळे केडीएमटीने आजच्या दिवशी ३३ बसेस रस्त्यावर काढल्या हा्ेत्या. त्यामुळे केडीएमटीला आर्थिक फटका बसणार असल्याची माहिती परिवहनचे सहाय्यक व्यवस्थापक संदीप भोसले यांनी सांगितले.

 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाShiv SenaशिवसेनाMaharashtra BandhMaharashtra Bandh