शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दुकानदारांनी निर्बंधांनाच धातले ‘कुलूप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 23:49 IST

कल्याण, डोंबिवलीत सायंकाळी ७ नंतरही काही दुकाने उघडी : पोलिसांना पाहताच उडाली तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका आयुक्तांनी गुरुवारपासून जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने सायंकाळी ७ नंतर बंद करण्याचा आदेश दिला असतानाही कल्याण व डोंबिवलीत अनेक दुकाने ७ नंतरही उघडी होती. पोलिसांची गाडी येताना पाहून अनेक दुकानदार दुकानांचे शटर खाली ओढत होते. मात्र पोलीस दिसेनासे होताच पुन्हा दुकाने उघडत होते. त्याचवेळी सरबत, वडापाव, भेळपुरी, चायनीजच्या गाड्यांनी निर्बंध पाळल्याचे दिसत होते.

मनपा हद्दीतील दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहणार असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. गुरुवारी या निर्बंधांचा पहिला दिवस होता. सायंकाळी पोलिसांची गाडी दुकाने बंद करण्याकरिता फिरू लागल्यावर दुकानदारांची एकच धावपळ उडाली. अनेक दुकाने सात वाजून गेले तरी उघडीच होती. पोलिसांनी गाडी थांवबून दुकाने उघडी असलेल्या दुकानदारांना तंबी दिली. कोरोनाचे नियम पाळा, आम्हाला कारवाई करण्यास भाग पाडू नका, असे आवाहन पोलिसांनी दुकानदारांना केले. मात्र काही मोजक्या दुकानदारांनी सातच्या आतच शटर डाऊन केले होते. खाद्यपदार्थ, शीतपेयाच्या हातगाड्यांनाही सातपर्यंत व्यवसायाची मुभा असल्याने या गाड्या बंद झाल्या. मात्र दुकानदारांनी लॉकडाऊनचे निर्बंध फारसे मनावर घेतलेले नाहीत.

कोरोनाचे २६४ रुग्णकल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात गुरुवारी कोरोनाच्या २६४ रुग्णांची भर पडली. मागील २४ तासांत १६८ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत. तर, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांमुळे महापालिका परिसरातील एकूण रुग्णसंख्या ६५ हजार ७२९ वर पोहोचली आहे. तर, त्यापैकी ६२ हजार ०६४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या दोन हजार ४५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

डोंबिवली स्थानक परिसरात संमिश्र प्रतिसाद; हातगाड्या सुरूच 

डोंबिवली :  शहरातील बहुतांश भागात गुरुवारी निर्बंधाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असला, तरी मुख्य चौकांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक जमले होते.  रेल्वेस्थानक परिसरात मात्र काही दुकाने बंद असल्याचे दिसून आले.पोळी-भाजी केंद्रे, खाद्यगृह, बार-रेस्टॉरंट, परमिट रूम, आइस्क्रीम पार्लर, ज्युस सेंटर यांना ११ वाजेपर्यंतची मुभा दिली आहे. परंतु, हातगाड्यांवरील खाद्यपदार्थांना संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच परवानगी दिली आहे. डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरात काही खाद्यपदार्थांच्या हातगाड्या सातनंतर सुरू होत्या. शिववडापावच्या गाड्या राजरोस सुरू होत्या. स्थानक परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद होती. परंतु, मानपाडा रोडवर कपडे, बूट-चप्पल, ज्वेलर्स ही दुकानेही रात्री सुरूच होती. पाथर्ली परिसरात मटणविक्रीची दुकाने शटर अर्ध्यावर ठेवून बिनदिक्कत सुरू होती. खाऊगल्ली असलेल्या पेंढरकर महाविद्यालयाच्या बाहेरील रस्त्यावर लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्या मात्र संध्याकाळी बंद होत्या. रिक्षात दोन प्रवाशांना परवानगी असताना रिक्षाचालकांकडूनही जादा प्रवासी भरून वाहतूक सुरू असल्याचे व नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. तर, शेलारनाका परिसरात नागरिक मोठ्या संख्येने एकत्रित जमा झाले होते. त्यामुळे निर्बंध घालण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेल्याचे दिसून आले. 

 

टॅग्स :thaneठाणेkalyan-pcकल्याण