शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गळ्यातील चेन मोडण्याची वेळ आली, कसली ब्रेक द चेन ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 00:41 IST

निर्बंध, सततच्या संचारबंदीमुळे सामान्यांचे मोडले कंबरडे

मुरलीधर भवारलोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही रुग्णसंख्या रोखण्यासाठी महापालिकेने कठोर निर्बंध लादले. मात्र, या निर्बंधानंतरही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नाही. अखेर राज्यातील परिस्थिती पाहता सरकारने कोरोना रुग्णांची वाढती चेन तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ ही नियमावली लागू केली. त्यानुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमुळे बाहेर फिरणे शक्य नाही. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे सामान्य माणसाला निर्बंधाचा सामना करावा लागत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसाय करणारे लहान-मोठे दुकानदार, व्यापारी यांचे कंबरडे मोडले आहे. सामान्यांनी खायचे काय असा प्रश्न आहे. खाद्यपदार्थांची आणि किराणा मालाची दुकाने सुरू आहेत. मात्र, कामावर गेल्यावर हातात दोन पैसे येणार. कामावर जाण्यासाठी निघाल्यावर रस्त्यात पोलिसांकडून अडवणूक होते. कारण कामावर निघालेला सामान्य माणूस हा अत्यावश्यक सेवेत कामाला नाही. तो कामावर गेला नाही तर खाणार काय, असा प्रश्न आहे. रेल्वेत सामान्य प्रवाशांची कोंडी करण्यात आली आहे. त्यामुळे खाजगी वाहनाने प्रवास करणे सामान्यांच्या खिशाला परडवणारे नाही. कोरोनाची चेन या निर्बंधामुळे मोडणार असली तरी सामान्यांचे कंबरडेही मोडणार आहे. अशाच तिखट आणि सडेतोड संतप्त प्रतिक्रिया सामान्यांकडून सरकारच्या विरोधात व्यक्त केल्या जात आहेत.

कर्ज कसे फेडायचे..आमचे कपड्याचे दुकान आहे. पहिली लाट आली तेव्हा आमचे दुकान बंद होते. मोठा तोटा सहन करावा लागला. त्यानंतर गणपतीपासून दुकाने काही अंशी सुरू झाली. गणपती व दिवाळीत थोडाफार व्यवसाय झाला. दुकानाच्या जोरावर घराचे कर्ज काढले. आता कर्ज कसे फेडायचे. कारण पहिल्यांदा कडक निर्बंध लावले गेले. राज्य सरकारने ब्रेक द चेन लागू करण्याआधीच मार्च महिन्यापासून कल्याण डोंबिवलीत कडक निर्बंध लागू करून दुकाने बंद करण्यात आली होती.    - सुरेश तायडे, व्यावसायिक

सततच्या लॉकडाऊनमुळे वाढतोय ताणघरी मुलगा, सून, मुलगी तिची दोन मुले आहेत. मुलाचे नुकतेच लग्न झाले. कोरोना काळात साधेपणाने लग्न केले. तरी देखील खर्च झाला. आता मुलाला लग्न केलेली चेन मोडण्याची वेळ आली आहे. कर्जाचा हप्ता भरण्यासाठी चेन मोडली आहे.    -चंदाबाई कुमला जाधव, कल्याणमी एक साधे गृहोपयोगी वस्तूचे दुकान चालविते. त्यासाठी मी एका सहकारी बँकेतून कर्ज काढले होते. लॉकडाऊनपासून आतापर्यंत सारखे दुकान बंद ठेवण्याची वेळ आली. त्यामुळे कर्जाचे हप्ते फेडायचे कुठून. सततच्या कोरोना नियमावलीमुळे ताण येत आहे.    -सारिका ठोंबरे, डाेंबिवली.नुकतेच मुलीच्या पतीचे निधन झाले. तिला घरी आणले आहे. आता पुन्हा संचारबंदी लागू झाली आहे. तिला पुन्हा सासरी कसे सोडायचे. ती आजारी असल्याने तिच्यावर उपचार करण्यात १७ हजार खर्च झाले. पती व मुलाला तुटपुंजा पगार आहे. घराचे हफ्ते फेडण्यात पगार खर्ची होतो. सततच्या निर्बंधांमुळे जगणे कठीण झाले आहे.    - सुरेखा जाधव, कल्याण.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस