शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

गळ्यातील चेन मोडण्याची वेळ आली, कसली ब्रेक द चेन ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 00:41 IST

निर्बंध, सततच्या संचारबंदीमुळे सामान्यांचे मोडले कंबरडे

मुरलीधर भवारलोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही रुग्णसंख्या रोखण्यासाठी महापालिकेने कठोर निर्बंध लादले. मात्र, या निर्बंधानंतरही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नाही. अखेर राज्यातील परिस्थिती पाहता सरकारने कोरोना रुग्णांची वाढती चेन तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ ही नियमावली लागू केली. त्यानुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमुळे बाहेर फिरणे शक्य नाही. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे सामान्य माणसाला निर्बंधाचा सामना करावा लागत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसाय करणारे लहान-मोठे दुकानदार, व्यापारी यांचे कंबरडे मोडले आहे. सामान्यांनी खायचे काय असा प्रश्न आहे. खाद्यपदार्थांची आणि किराणा मालाची दुकाने सुरू आहेत. मात्र, कामावर गेल्यावर हातात दोन पैसे येणार. कामावर जाण्यासाठी निघाल्यावर रस्त्यात पोलिसांकडून अडवणूक होते. कारण कामावर निघालेला सामान्य माणूस हा अत्यावश्यक सेवेत कामाला नाही. तो कामावर गेला नाही तर खाणार काय, असा प्रश्न आहे. रेल्वेत सामान्य प्रवाशांची कोंडी करण्यात आली आहे. त्यामुळे खाजगी वाहनाने प्रवास करणे सामान्यांच्या खिशाला परडवणारे नाही. कोरोनाची चेन या निर्बंधामुळे मोडणार असली तरी सामान्यांचे कंबरडेही मोडणार आहे. अशाच तिखट आणि सडेतोड संतप्त प्रतिक्रिया सामान्यांकडून सरकारच्या विरोधात व्यक्त केल्या जात आहेत.

कर्ज कसे फेडायचे..आमचे कपड्याचे दुकान आहे. पहिली लाट आली तेव्हा आमचे दुकान बंद होते. मोठा तोटा सहन करावा लागला. त्यानंतर गणपतीपासून दुकाने काही अंशी सुरू झाली. गणपती व दिवाळीत थोडाफार व्यवसाय झाला. दुकानाच्या जोरावर घराचे कर्ज काढले. आता कर्ज कसे फेडायचे. कारण पहिल्यांदा कडक निर्बंध लावले गेले. राज्य सरकारने ब्रेक द चेन लागू करण्याआधीच मार्च महिन्यापासून कल्याण डोंबिवलीत कडक निर्बंध लागू करून दुकाने बंद करण्यात आली होती.    - सुरेश तायडे, व्यावसायिक

सततच्या लॉकडाऊनमुळे वाढतोय ताणघरी मुलगा, सून, मुलगी तिची दोन मुले आहेत. मुलाचे नुकतेच लग्न झाले. कोरोना काळात साधेपणाने लग्न केले. तरी देखील खर्च झाला. आता मुलाला लग्न केलेली चेन मोडण्याची वेळ आली आहे. कर्जाचा हप्ता भरण्यासाठी चेन मोडली आहे.    -चंदाबाई कुमला जाधव, कल्याणमी एक साधे गृहोपयोगी वस्तूचे दुकान चालविते. त्यासाठी मी एका सहकारी बँकेतून कर्ज काढले होते. लॉकडाऊनपासून आतापर्यंत सारखे दुकान बंद ठेवण्याची वेळ आली. त्यामुळे कर्जाचे हप्ते फेडायचे कुठून. सततच्या कोरोना नियमावलीमुळे ताण येत आहे.    -सारिका ठोंबरे, डाेंबिवली.नुकतेच मुलीच्या पतीचे निधन झाले. तिला घरी आणले आहे. आता पुन्हा संचारबंदी लागू झाली आहे. तिला पुन्हा सासरी कसे सोडायचे. ती आजारी असल्याने तिच्यावर उपचार करण्यात १७ हजार खर्च झाले. पती व मुलाला तुटपुंजा पगार आहे. घराचे हफ्ते फेडण्यात पगार खर्ची होतो. सततच्या निर्बंधांमुळे जगणे कठीण झाले आहे.    - सुरेखा जाधव, कल्याण.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस