शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

"दिवाळी होती, लोकांच्या घरात कंदील लागले होते अन्..."; मनसेचे आमदार राजू पाटील आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 14:30 IST

राजू पाटील यांनी अधिवेशनाचा शेवटचा दिवस चांगलाच गाजवला. यामध्ये त्यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या दिवा शहरावर आणि तिथल्या समस्यांवर भाष्य करत शासन प्रशासनावर जोरदार टीका केली.

कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी अधिवेशनाचा शेवटचा दिवस चांगलाच गाजवला. यामध्ये त्यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या दिवा शहरावर आणि तिथल्या समस्यांवर भाष्य करत शासन प्रशासनावर जोरदार टीका केली. दिवा शहरातील पायाभूत सुविधा आणि इथल्या अधिकाऱ्यांच्या हप्तेबाजीवर निशाणा साधत दिव्याचे सिंगापूर करणार होते या गोष्टीची देखील त्यांनी आठवण करून दिली. त्याचप्रमाणे येथील पुलाच्या कामासाठी ऐन दिवाळीत लोकांच्या घरी कंदील लागले असताना त्यांना बेघर करण्यात आलं यावर सुद्धा पाटलांनी आक्रमक भूमिका घेतली.     दिवा विभाग ठाणे महापालिकेमध्ये येतो की नाही अशी शंका येते. पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या शहरात हॉस्पिटल, गार्डन, पोलीस स्टेशन नाही. साधं शौचालय देखील नाही. आमदार झाल्यापासून आपण या गोष्टींचा पाठपुरावा करत आहोत. मात्र प्रशासन आणि शासनाला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. दिवा पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाचं काम रखडलं  आहे. त्याचं भूसंपादन न करता टेंडर काढून पुलाचं काम सुरू करण्यात आले होते.

राहती घरे, व्यवसायिक गाळे तोडण्यात आले. ऐन दिवाळीत लोकांच्या घरी कंदील लागले असताना त्यांना बेघर करण्यात आला. ते लोक रस्त्यावर आले. ठाणे महानगरपालिका हम करे सो कायदा या भूमिकेत आहे. त्यांना कुणाचं काही पडलं नाही. आता हा उड्डाणपूल असाच लटकलेला आहे. हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण यामुळे दिव्याचा रेल्वे फाटक बंद होणार आहे. थेट खरेदीने भूसंपादन करा आणि शेतकऱ्यांना मोबदला द्या आणि प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करा अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली. अन्यथा दहा वर्षे हा पूल काही होणार नाही असंही ते आवर्जून म्हणाले.

दिव्याचा सिंगापूर होणार, पण कधी?

 महापालिकेकडून जाहिरातबाजी करण्यात आली होती की दिव्याचं सिंगापूर केलं जाईल. परंतु क्लस्टरचा इथे  काहीच पत्ता नसून त्यात अजून अनधिकृत बांधकामही सुरू आहे. दिवा शहरांमध्ये करोडोची कामे झाली की भ्रष्टाचार झाला याचा ऑडिट झालं पाहिजे अशी आग्रही मागणी राजू पाटील यांनी केली. 

अधिकाऱ्यांची हप्तेबाजी 

दिवा रेल्वे स्टेशनची परिस्थिती अत्यंत खराब आहे. तिथे चालायला जागा नाही. फेरीवाले ,रिक्षा त्यातच खाजगी गाड्या अशी अवस्था स्टेशन परिसरात आहे . इथल्या फेरीवाल्यांनी वार्ड ऑफिसरला सुद्धा मारहाण केली होती. इथले वार्ड अधिकारी फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामांकडून हप्ते गोळा करतात असा आरोप देखील पाटील यांनी केला. यावर काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे नालेसफाईचं ऑडिट करणे देखील गरजेचे आहे या मुद्द्याकडेही पाटील यांनी लक्ष वेधलं.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसेdivaदिवा