शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पत्री पुलाचं नाव पत्री पूल कसं पडलं माहित्येय का?; जाणून घ्या रंजक गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 17:04 IST

कल्याण-डोंबिवलीला जोडणाऱ्या पत्री पुलाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून उद्घाटन

कल्याण: कल्याण आणि डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या पत्री पुलाचे अखेर लोकार्पण करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुलाचं उद्घाटन केलं. यामुळे आता हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. पुलाच्या उद्घाटनाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. पत्र पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानं वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल.१९१४ मध्ये बांधण्यात आलेला पत्री पूल बांधण्यात आला. एक दशकापेक्षा अधिक काळ या पुलावरून वाहतूक सुरू होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये पत्री पूल पाडण्यात आला. वाहतुकीसाठी धोकादायक ठरू लागल्यानं नव्या पुलाचं बांधकाम सुरू झालं. अखेर दोन वर्षांनंतर या पुलाचं काम पूर्ण झालं. ग्लोबल स्टील हैद्राबादनं पत्री पूल बांधला आहे. 

पत्री पूलाला पत्री पूल हे नाव कसं पडलं, याची गोष्ट रंजक आहे. ब्रिटिश काळात पत्री पुलाची उभारणी करण्यात आली. जाड पत्रे, लोखंडी स्लीपरचा वापर करून पूल तयार करण्यात आल्यानं त्याला पत्री पूल नाव पडलं. २०१८ मध्ये पूल पाडला गेला. त्यावेळी पुलाच्या सांगाड्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कल्याणला डोंबिवलीसह भिवंडी, ठाणे, नवी मुंबईला जोडणाऱ्या पत्री पुलाचा वापर लाखो प्रवासी करतात. दोन वर्षांपूर्वी पूल पाडण्यात आल्यानं प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत होता. २०२० मध्येच पुलाचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र लॉकडाऊनमुळे पुलाचं बांधकाम जवळपास ३ महिने थांबलं होतं. त्यामुळे पुलाचं काम पूर्ण होण्यास २०२१ उजाडलं. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे