शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

पत्री पुलाचं नाव पत्री पूल कसं पडलं माहित्येय का?; जाणून घ्या रंजक गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 17:04 IST

कल्याण-डोंबिवलीला जोडणाऱ्या पत्री पुलाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून उद्घाटन

कल्याण: कल्याण आणि डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या पत्री पुलाचे अखेर लोकार्पण करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुलाचं उद्घाटन केलं. यामुळे आता हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. पुलाच्या उद्घाटनाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. पत्र पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानं वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल.१९१४ मध्ये बांधण्यात आलेला पत्री पूल बांधण्यात आला. एक दशकापेक्षा अधिक काळ या पुलावरून वाहतूक सुरू होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये पत्री पूल पाडण्यात आला. वाहतुकीसाठी धोकादायक ठरू लागल्यानं नव्या पुलाचं बांधकाम सुरू झालं. अखेर दोन वर्षांनंतर या पुलाचं काम पूर्ण झालं. ग्लोबल स्टील हैद्राबादनं पत्री पूल बांधला आहे. 

पत्री पूलाला पत्री पूल हे नाव कसं पडलं, याची गोष्ट रंजक आहे. ब्रिटिश काळात पत्री पुलाची उभारणी करण्यात आली. जाड पत्रे, लोखंडी स्लीपरचा वापर करून पूल तयार करण्यात आल्यानं त्याला पत्री पूल नाव पडलं. २०१८ मध्ये पूल पाडला गेला. त्यावेळी पुलाच्या सांगाड्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कल्याणला डोंबिवलीसह भिवंडी, ठाणे, नवी मुंबईला जोडणाऱ्या पत्री पुलाचा वापर लाखो प्रवासी करतात. दोन वर्षांपूर्वी पूल पाडण्यात आल्यानं प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत होता. २०२० मध्येच पुलाचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र लॉकडाऊनमुळे पुलाचं बांधकाम जवळपास ३ महिने थांबलं होतं. त्यामुळे पुलाचं काम पूर्ण होण्यास २०२१ उजाडलं. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे