शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

कल्याण-डोंबिवलीत पाेलिसांकडून कडक संचारबंदीची अंमलबजावणी; कामावरून उशिरा परतणारे मात्र हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 23:34 IST

कामावरून उशिरा परतणारे मात्र हैराण : मोकाट फिरणाऱ्यांची पोलीस ठाण्यात वरात; गर्दुल्ले, मद्यपींना लगाम गरजेचा

मुरलीधर भवारकल्याण : कोरोनाकाळातील सगळ्य़ात कडक असलेली बंदी अनलॉकमध्ये शिथिल झाली होती. मात्र, पुन्हा नववर्षाच्या आगमनाला लोक बाहेर पडणार, पुन्हा कोरोनास आमंत्रण देणार. त्याचबरोबर कोरोना विषाणूचा नवा जनुकीय स्ट्रेन्स पाश्चिमात्य देशात आढळल्यावर पुन्हा तो नव्या रूपात पसरू शकतो. त्याला आवर घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. 

रात्री ११नंतर यासाठी पोलिसांची विशेष तपासणी सुरू आहे. रस्त्यावर पाचपेक्षा जास्त लोक ११नंतर दिसून आल्यावर त्यांना दंडुक्याने ठोकून काढण्याचा शिरस्ता पोलिसांनी सुरू ठेवला. त्याचबरोबर कामावरून उशिरा परतणाऱ्या चाकरमान्यांनाही या संचारबंदीचा फटका बसत आहे. ११नंतर कामावरून घरी परतणाऱ्यांना संचारबंदीला तोंड द्यावे लागत आहे. ओळखपत्र आणि सबळ कारण सांगितल्याशिवाय पोलिसांच्या तावडीतून रात्री परतणाऱ्यांची सुटका होत नाही.  सबळ कारण दिले गेले नाही तर पोलीस दुचाकीचालक असो की चार चाकी वाहन त्यांची चावी जमा करून त्यांना शिक्षा देत आहेत. मोकाट फिरणाऱ्यांना थेट पोलीस स्टेशनला नेले जाते. यामुळे ११ नंतर मोकाट फिरणाऱ्यांवर वचक बसला आहे.

डोंबिवली औद्योगिक वसाहत डोंबिवली औद्योगिक वसाहतीत ४५० कारखाने आहेत. तेथे तिन्ही शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या जवळपास एक लाखांच्या घरात आहे. सध्या अनलॉकमध्ये कारखाने जोमात सुरू झाले आहेत. मात्र, सध्या रात्री ११ नंतर संचारबंदी लागू असल्याने सेकंड शिफ्ट करून सुटणाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. मानपाडा परिसरातील पोलीस बंदोबस्ताला कामगारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कामगारांनी सेकंड शिफ्टची वेळ बदली करा, अशी मागणी केली आहे.

कल्याणमधील लक्ष्मी मार्केटकल्याण स्टेशन परिसरातील लक्ष्मी मार्केटमध्ये तब्बल ४०० फळ-भाजीपाला विक्रेते आहेत. हा परिसर दाटीवाटीचा आहे. लाॅकडाऊमध्ये तब्बल नऊ महिने हे मार्केट बंद होते. अनलॉकमध्येही ते पुन्हा सुरू करण्याची परवानगी नव्हती. ते काही अटीशर्थींवर सुरू केले असले तरी आता त्याला पुन्हा संचारबंदीच्या नियमाचा फटका बसला आहे. रात्री १० वाजेपर्यंत सुरू असलेले मार्केट आता साडेनऊ वाजताच सामसूम होते. संचारबंदीमुळे ग्राहक लवकर येऊन भाजी घेऊन घरी जातात. 

महात्मा फुले चौक कल्याण रेल्वे स्थानकाजवळच महात्मा फुले चौक आहे. तेथे न्यायालय, सहायक पोलीस आयुक्तांचे कार्यालय आहे. मात्र, या चौकात संचारबंदीचा धाक नाही. कारण पुतळ्याच्या शेजारीच कल्याणमधील नशाबाजांचा अड्डा बनला आहे. त्या ठिकाणी पुतळ्याला नशाबाजांनी घेरले आहे. काही दारुडे स्टेशन परिसरातील दुकानाचा आसरा घेतात. त्यात गर्दुल्ल्यांचाही समावेश आहे. त्यामुळे रात्री घरी जाणाऱ्या सामान्यांना या लाेकांचा त्रास सहन करावा लागताे.

 छत्रपती शिवाजी महाराज चौकछत्रपती शिवाजी महाराज चौकात रिक्षाचालकांचे स्टॅण्ड आहेत. त्या ठिकाणी ११ नंतरही प्रवाशांच्या प्रतीक्षेत ते दिसून येतात. तसेच चौकात मटका कुल्फीवाल्यांच्या गाड्या असतात. त्या रात्री ११नंतरही लागलेल्या पाहावयास मिळतात. अवजड वाहनांची येजाही सतत सुरू असते. त्यामुळे शिवाजी चौक हा ११नंतर सामसूम होत नाही. दहा टक्के वर्दळ सुरूच असल्याचे पाहावयास मिळते. 

 

टॅग्स :PoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस