शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

लसच पुरेशी आली नाही तर तिसरी लाट रोखणार कशी?; श्रीकांत शिंदे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 13:49 IST

डोंबिवलीतील महावीर सोसायटीत कच:यापासून खत तयार करण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ खासदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

कल्याण- केंद्र सरकारकडून लोकसंख्येच्या आधारे कोरोना लसीचे डोस राज्याला आणि विविध महापालिकाना पुरविले जात आहेत. मात्र लसीचे डोस पुरेशे येत नसल्याने कोरोनाची तिसरी लाट कशी रोखायची असा सवाल कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे. केंद्राकडून राज्य आणि महापालिकांना जास्तीत जास्त लसीचे डोस उपलब्ध व्हावे अशी मागणी खासदार शिंदे यांना केली आहे. 

डोंबिवलीतील महावीर सोसायटीत कच:यापासून खत तयार करण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ खासदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. लोकसंख्येचे आधारे लसीचे डोस उपलब्ध करुन दिले जातात. कल्याण डोंबिवली महापालिकेची लोकसंख्या जास्त आहे. राज्यातील मुंबई एमएमआर रिजन हे सगळयात मोठी नागरी वसाहत आहे. त्याची लोकसंख्या पाहता एमएमआर रिजनसह राज्याला जास्तीत जास्त लसीचे डोस केंद्र सरकारने उपलब्ध करुन दिले पाहिजेत.

जानेवारी महिन्यापासून लसीकरण देशभरात सुरु झाले. सुरुवातीला लसीचे डोस केंद्र सरकारकडून पुरविले जात होते. मात्र आत्ता मध्यंतरीच्या काळात लसीकरण सातत्याने बंद ठेवण्याची वेळ विविध महापालिकांवर येत आहे. त्यात कल्याण डोंबिवली महापालिकेतील लसीकरण पाच ते सात दिवस बंद होते. तज्ञांच्या मते देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ घातली आहे. तिस:या लाटेची शक्यता असताना लसीचे डोस पुरेसे उपलब्ध झाले नाहीत. तर तिसरी लाट रोखणार कशी असा प्रश्न आहे याकडे खासदार शिंदे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. केंद्राने मुबलक प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध करुन दिल्यास जास्तीत लोकांचे लसीकरण होऊ  शकते. हा विषय केंद्र सरकारने गांभीर्याने गेतला पाहिजे असे शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेShiv SenaशिवसेनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस