शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

दिवाळीनंतर फेरीवाले हटले नाही तर मनसे स्टाईल आंदोलन; आमदार राजू पाटील यांचा आयुक्तांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 21:33 IST

मनसे आमदार राजू पाटील यांनी महापालिका आयुक्तांची आज भेट घेतली. भाजप आमदारानंतर मनसेच्या आमदारांनी आयुक्तांची भेट घेऊन विविध नागरी प्रश्न सोडविण्याची मागणी केली.

कल्याण- कोरोना काळात सगळ्यांनाच आर्थिक फटका बसला आहे. त्यात फेरीवालेही आहेत. दिवाळीनंतर कल्याण आणि डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाले हटविले नाहीत. तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिला आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांनी महापालिका आयुक्तांची आज भेट घेतली. भाजप आमदारानंतर मनसेच्या आमदारांनी आयुक्तांची भेट घेऊन विविध नागरी प्रश्न सोडविण्याची मागणी केली. दिवाळीनंतर ऑपरेशन फेरीवाला हटाव प्रशासनाकडून करण्यात आले नाही. तर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असे आमदारांनी आयुक्तांना बजावले आहे.

२७ गावातील अनेक भागांना कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. २७ गावासाठीच्या अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी टाक्या बांधण्याचा विषय पेंडिंग आहे. २७ गावातील पाणी टंचाई ग्रस्त भागाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा. रस्ते प्रकल्पात आणि रिंग रोड प्रकल्पात आटाली आंबिवली परिसरातील बाधितांना बीएसयूपी प्रकल्पात घरे देण्यात यावी. लोकग्रामचा पादचारी पूलाकरीता टेंडर आले होते. मात्र पुन्हा फेर निविदा काढली आहे. २७ गावातील ग्रामपंचायती असताना त्यांच्याकडून विकासापोटी सरकारला कोट्यावधी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले होते. वसूल केलेल्या मुद्रांक शुल्काच्या तुलनेत त्या गावांमध्ये अत्यंत कमी खर्चाची विकासकामे केली आहेत. रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. या विविध मुद्यांकडे आयुक्तांचे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

शहरातील आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. निवडणूका आल्या की, शिवसेनेकडून बॅनरबाजी केली जाते. कोट्यवधी रुपये मंजूर केल्याचे बॅनर लावले जातात. प्रत्यक्षात लावलेले बॅनर फाटायला आले तरी कामाला अद्याप सुरुवात झाली नसल्याची टिका आमदार पाटील यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काल कल्याणमध्ये आले होते. त्यांनी कल्याण डोंबिवलीतील खराब रस्त्याला तत्कालीन सरकार जबाबदार असल्याचे सांगितले. त्यावर आमदार पाटील यांनी सांगितले की, तत्कालीन सरकारमध्ये केवळ भाजप नव्हती. तर शिवसेनाही होती. युतीचे सरकार होते. त्यामुळे जयंतरावांनी हा प्रश्न शिवसेनेलाही विचारला पाहिजे याकडे लक्ष वेधले आहे. 

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसेkalyanकल्याणhawkersफेरीवाले