शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची जबाबदारी सरकारची; महेश तपासे यांची प्रतिक्रिया

By मुरलीधर भवार | Updated: November 8, 2022 14:32 IST

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचा प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

कल्याण-राज्यातील शेतकऱ्यांना मदत मिळाली नसताना राजकीय दाैरे सुरु आहे. शेतकऱ्यांना आदी मदत द्यावी. शेतकऱ्यांचे अश्रू पूसण्याची जबाबदारी शिंदे फडणवीस सरकारची आहे असे प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचा प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारकडून ठोस पावले उचलणे अपेक्षित असताना राजकीय दौऱ्यांना उधाण आले आहे. आदित्य ठाकरे हे शेतकऱ्यांशी संवाद साधतायत तर दुसरीकडे शिंदे गटातील खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील शेतकऱ्यांसाठी दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते तपासे यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात महेश तपासे यांनी सांगितले.

शिंदे- फडणवीस सरकार अतिशय उदासीन आहे. अतिवृष्टीमुळे जवळजवळ 25 ते 27 लाख हेक्टर शेती उध्वस्त झालीय त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाने ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली होती. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना वाचाळविर पदवी दिली पाहिजे त्यांना शेतकऱ्यांचे दुःख अश्रू दिसत नाहीत. शेतकऱ्यावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अब्दुल सत्तार काय कामगिरी करतात हा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे, अशी टीका महेश तपासे यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्याबाबत बोलताना कार्यकर्त्यांची भावना असते आपल्या लोकांचे स्वागत करायचे मात्र जास्तीत जास्त दायित्व कोणाचं आहे. अश्रू पुसण्याची जबाबदारी ही सरकारचे असते. सरकारमध्ये जे लोक आहेत ते मजोरीने काम करतात. सरकारमध्ये जे लोक बसले त्यांच्या मधला मगरुरपणा हा कमी होत नाही आणि या राज्यातल्या शेतकरी असेल दिन दुबळा असेल आदिवासी मागासवर्गीय अल्पसंख्यांक असेल त्याच्या संदर्भामध्ये कुठल्याच पद्धतीचे धोरण शिंदे सरकारकडे नाही अशी टीका केली.

टॅग्स :FarmerशेतकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार