शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘बालाजी गार्डन’मधील कचरा उचलणे बंद; प्रशासनाने दिली चार दिवसांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:04 IST

रहिवाशांची केडीएमसीत धाव : प्रशासनाने दिली चार दिवसांची मुदत

कल्याण : केडीएमसीने १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांना स्वत:च कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या घनकचरा विभागाने कोपर परिसरातील ‘बालाजी गार्डन’ सोसायटीचा कचरा उचलणे बंद केले. त्यामुळे तेथील रहिवाशांनी महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात धाव घेतली. या वेळी सोसायटीला चार दिवसांचा वेळ प्रशासनाने दिला आहे. 

‘बालाजी गार्डन’मध्ये नऊ इमारती असून त्यात जवळपास ५२२ सदनिका आहेत. या सोसायट्या वर्षाला ५५ लाख रुपये मालमत्ताकर महापालिकेस भरतात. सोसायटीतील रहिवासी ओला व सुका कचरा महापालिकेच्या घंटागाड्यांमध्ये देतात. मात्र, महापालिकेने दोन दिवसांपासून कोणतीही पूर्व सूचना न देता कचरा उचलणे बंद केले आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत अचानक कचरा उचलणे बंद केल्यास अनारोग्याची परिस्थिती उद्भवू शकते.

सोसायटीत कोणीही आजारी पडल्यास त्याला महापालिका जबाबदार असेल, असा इशारा रहिवाशांनी या वेळी प्रशासनास दिला. महापालिकेकडे न चुकता कर भरूनही महापालिकेकडून कचरा उचलला जात नाही, याकडेही लक्ष वेधले.  घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे म्हणाले, १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांनी त्यांच्या कचऱ्याची स्वत:च विल्हेवाट लावायची आहे.  त्यामुळे कचरा उचलणे बंद केले आहे. आता सोसायटीतील रहिवाशांनी चर्चा केली आहे. सासोयटीने चार दिवसांची मुदत मागून घेतली आहे.

मनसे आमदारांनी  वेधले लक्ष

सोसायटीच्या रहिवाशांसह मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कोकरे यांची भेट घेतली. नागरिक मालमत्ताकर भरत असल्याने त्यांना सर्व प्रकराच्या सोयीसुविधा पुरविणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. अशा प्रकारे अचानक कचरा उचलणे बंद करणे अयोग्य आहे. कचरा उचलला जावा. नागरिकांना गनपॉइंटवर ठेवून काम करता येणार नाही, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसे