शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
2
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
3
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
4
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
5
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
6
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
7
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
8
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
9
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
10
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
11
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
12
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
14
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
15
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
16
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
17
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
18
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
19
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
20
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल

‘बालाजी गार्डन’मधील कचरा उचलणे बंद; प्रशासनाने दिली चार दिवसांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:04 IST

रहिवाशांची केडीएमसीत धाव : प्रशासनाने दिली चार दिवसांची मुदत

कल्याण : केडीएमसीने १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांना स्वत:च कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या घनकचरा विभागाने कोपर परिसरातील ‘बालाजी गार्डन’ सोसायटीचा कचरा उचलणे बंद केले. त्यामुळे तेथील रहिवाशांनी महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात धाव घेतली. या वेळी सोसायटीला चार दिवसांचा वेळ प्रशासनाने दिला आहे. 

‘बालाजी गार्डन’मध्ये नऊ इमारती असून त्यात जवळपास ५२२ सदनिका आहेत. या सोसायट्या वर्षाला ५५ लाख रुपये मालमत्ताकर महापालिकेस भरतात. सोसायटीतील रहिवासी ओला व सुका कचरा महापालिकेच्या घंटागाड्यांमध्ये देतात. मात्र, महापालिकेने दोन दिवसांपासून कोणतीही पूर्व सूचना न देता कचरा उचलणे बंद केले आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत अचानक कचरा उचलणे बंद केल्यास अनारोग्याची परिस्थिती उद्भवू शकते.

सोसायटीत कोणीही आजारी पडल्यास त्याला महापालिका जबाबदार असेल, असा इशारा रहिवाशांनी या वेळी प्रशासनास दिला. महापालिकेकडे न चुकता कर भरूनही महापालिकेकडून कचरा उचलला जात नाही, याकडेही लक्ष वेधले.  घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे म्हणाले, १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांनी त्यांच्या कचऱ्याची स्वत:च विल्हेवाट लावायची आहे.  त्यामुळे कचरा उचलणे बंद केले आहे. आता सोसायटीतील रहिवाशांनी चर्चा केली आहे. सासोयटीने चार दिवसांची मुदत मागून घेतली आहे.

मनसे आमदारांनी  वेधले लक्ष

सोसायटीच्या रहिवाशांसह मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कोकरे यांची भेट घेतली. नागरिक मालमत्ताकर भरत असल्याने त्यांना सर्व प्रकराच्या सोयीसुविधा पुरविणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. अशा प्रकारे अचानक कचरा उचलणे बंद करणे अयोग्य आहे. कचरा उचलला जावा. नागरिकांना गनपॉइंटवर ठेवून काम करता येणार नाही, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसे