शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

सिटी पार्कच्या कामासाठी वालधूनी नदी पात्रात भराव?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:29 PM

Kalyan : प्रकल्पासाठी टाकण्यात येणाऱ्या भरावामुळे पात्र बुजविले जात असल्याचा मुद्या वालधूनी नदी संवर्धनासाठी लढा देणाऱ्या वालधूनी जलबिरादरी या सामाजिक संस्थेच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सिटी पार्कचे काम सुरु केले आहे. जवळपास १०० कोटी रुपये खर्च करुन प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे.

कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सिटी पार्कचे काम सुरु आहे. त्याकरिता टाकण्यात येणारा भरावामुळे वालधूनी नदीचे पात्र बुजविले जात असल्याचा मुद्दा वालधूनी जलबिरादरी यांनी उपस्थित केला आहे.

महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सिटी पार्कचे काम सुरु केले आहे. जवळपास १०० कोटी रुपये खर्च करुन प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. २०१९ सालच्या अतिवृष्टीचा फटका प्रकल्पाच्या कामास बसला होता. आता कोरोना काळात प्रकल्पाचे काम मंद गतीने सुरु होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने कामाला गती मिळाली आहे. याठिकाणी मातीचा भराव टाकला जात आहे. शेजारीच वालधूनी नदीचे पात्र आहे. 

प्रकल्पासाठी टाकण्यात येणाऱ्या भरावामुळे पात्र बुजविले जात असल्याचा मुद्या वालधूनी नदी संवर्धनासाठी लढा देणाऱ्या वालधूनी जलबिरादरी या सामाजिक संस्थेच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे. याठिकाणी संरक्षक भिंत बांधली जात आहे. सिटी पार्क प्रकल्पानजीकच गौरीपाडा, योगीधाम, घोलपनगर परिसर आहे. नदी पत्रात भराव टाकून प्रकल्पासाठी संरक्षक भिंत बांधल्यास पावसाळ्य़ात पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग राहणार नाही. सगळे पाणी नागरीकांच्या घरात शिरु शकते, असा मुद्दा बिरादरीच्यावतीने उपस्थित केला आहे. 

या प्रकरणी बिरादरीच्या सदस्या पुष्पा रत्नपारखी यांनी याकडे लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर हा विषय बिरादरीचे शशिकांत दायमा यांनी सोशल मिडियावर उपस्थित केला आहे. अतिरिक्त मातीचा भराव टाकून नदी वाचविली पाहिजे अशी मागणी रत्नपारखी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

दरम्यान, याविषयी महापालिकेचे प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टीटय़ूटकडे प्रकल्पाचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यांनी दिलेल्या होकारानंतरच सिटी पार्कचे काम नियमानुसार केले जात आहे. त्यामुळे भराव टाकणे व संरक्षक भिंतीचे काम योग्य प्रकारे सुरु आहे. त्यामुळे पाणी साचण्याचा धोका संभवत नाही.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका