शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

अतिवृष्टीचा धोका ओळखून 2 अतिधोकादायक इमारतीतील २८ जणांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 20:58 IST

सीसीटीव्ही द्वारे पूर सदृश्य परिस्थितीवर केडीएमसीची नजर

ठळक मुद्देडोंबिवली पश्चिमेतील २० अतिधोकादायक इमारतींपैकी १५ इमारती रहिवासमुक्त करण्यात आल्या. अन्य पाच इमारती रहिवास मुक्त करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत काल रात्रीपासून एकूम ८३.५ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसात धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी काही इमारती रहिवास मुक्त करण्यात आल्या आहेत. कल्याण पूर्व भागातील २ अतिधोकादायक इमारतीतील २८ नागरीक स्थलांतरीत करण्यात आले आहेत. भविष्यातील दुर्घटनांचा अंदाज ओळखून प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. 

डोंबिवली पश्चिमेतील २० अतिधोकादायक इमारतींपैकी १५ इमारती रहिवासमुक्त करण्यात आल्या. अन्य पाच इमारती रहिवास मुक्त करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. ग प्रभागातील २० अतिधोकादायक इमारतींपैकी १२ इमारती रहिवासमुक्त करण्यात आल्या आहेत. ८ इमारतीचे रहिवासमुक्त करण्याचे काम सुरु आहे. अ प्रभागात टिटवाळा परिसरातील १ अतिधोकादायक इमारत रहिवासमुक्त करण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे महापालिकेतील सखल भागात पाणी साचल्याने काही नागरीकांच्या घरात पाणी शिरल्याचे महापालिका प्रशासनाने मान्य केले आहे. महापालिकेने मनुष्यबळासह जेसीबीचा वापर करीत पाणी साचलेल्या भागातील पाण्याचा निचरा करण्याचे काम केले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि शहर अभियंत्या सपन कोळी देवनपल्ली यांनी मुख्यालयातील स्मार्ट सिटी कंट्रोल रुममध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून पावसाचा आढावा घेतला. महापालिकेतील २०१ ठिकाणी असलेल्या ५५१ सीसीटीव्हीच्या सहाय्याने पाणी कुठे साचले आहे याचे अवलोकन करुन पाण्याचा निचरा करण्याचे आदेश अधिकारी वर्गास दिले. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणRainपाऊसBuilding Collapseइमारत दुर्घटना