शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

‘केडीएमसी’तून १८ गावे वगळण्याचा निर्णय अवैध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 05:20 IST

सरकारची अधिसूचना हायकोर्टाकडून रद्द

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतून १८ गावे वगळण्यासंदर्भात राज्य सरकारने अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पालिकेच्या सर्वसाधारण सभेची संमती घेतली नाही. सरकारने नियमाचे व कायदेशीर प्रक्रियेचा भंग केला, असे म्हणत उच्च न्यायालयाने केडीएमसीच्या हद्दीतील १८ गावे वगळण्याचा राज्य सरकारचा निर्णय अवैध ठरवला, तसेच १८ गावांची प्रस्तावित नगरपरिषद स्थापण्याची प्राथमिक अधिसूचनाही रद्द केली.राज्य सरकारने केडीएमसीच्या हद्दीतून २७ पैकी ९ गावे पालिकेतच ठेवली व १८ गावे पालिकेतून वगळली. २४ जून, २०२० रोजी त्याबाबत अंतिम अधिसूचना काढली. त्याच दिवशी राज्य सरकारने उर्वरित १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापण्याबाबत प्राथमिक अधिसूचना काढली.या दोन्ही अधिसूचनांना संदीप पाटील यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यांनी ॲड.डी. एस. म्हैसपूरकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. याचिकेनुसार, कायद्याप्रमाणे महापालिकेत समाविष्ट केलेल्या गावांना नगरपरिषदेत समाविष्ट करता येत नाही, तसेच केंद्र सरकारच्या जनगणनेनुसार या गावांतील लोकांची गणती महापालिकेत झाली आहे. त्यावर मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने याला पालिकेची संमती आहे का? अशी विचारणा सरकारकडे केली.त्यावर सरकारी वकील  बी. सावंत यांनी पालिकेची संमती असल्याचे न्यायालयाला सांगितले. मात्र, तसा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर केला नसल्याची बाब न्यायालयाने सरकारच्या निदर्शनास आणली.२०१५ ते २०२० पर्यंत गावे वगळण्याची प्रक्रिया खोळंबली होती. त्याबाबत पालिकेने आक्षेप घेतला नाही. त्यानंतर राज्य सरकारने प्रक्रिया सुरू केल्यानंतर केडीएमसी आयुक्तांनी ९ गावे पालिकेत ठेवण्याची व १८ गावे वगळण्याची शिफारस सरकारला केली. ही एक प्रकारची मंजुरीच आहे. सर्वसाधारण सभा आणि आयुक्त यांचा निर्णय वेगळा नाही, असा युक्तिवाद सावंत यांनी केला. त्यावर न्यायालयाने सरकारने सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता १८ गावांना या महापालिकेच्या हद्दीतून वगळण्याचा घेतलेला निर्णय हा निव्वळ अवैधच असल्याचे म्हटले. सरकारने कायदेशीर  प्रक्रियेचा भंग केला आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकारने काढलेल्या दोन्ही अधिसूचना रद्द केल्या.२७ गावांचा २०१५ पासूनचा प्रस्ताव कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) हद्दीतून २७ गावे वगळण्याचा प्रस्ताव २०१५ पासून सरकार दप्तरी धूळखात होता. राज्य सरकारने या संदर्भात काढलेल्या अधिसूचनेवर जनसुनावणी घेण्यात आली नव्हती.   त्यानंतर, ठाकरे सरकारने मार्च, २०२० मध्ये २७ गावे वगळण्यासंदर्भात अर्धवट राहिलेली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत २४ जून, २०२० रोजी केडीएमसीच्या हद्दीतून २७ पैकी ९ गावे पालिकेतच ठेवली व १८ गावे पालिकेतून वगळली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMumbai High Courtमुंबई हायकोर्ट