शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

‘केडीएमसी’तून १८ गावे वगळण्याचा निर्णय अवैध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 05:20 IST

सरकारची अधिसूचना हायकोर्टाकडून रद्द

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतून १८ गावे वगळण्यासंदर्भात राज्य सरकारने अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पालिकेच्या सर्वसाधारण सभेची संमती घेतली नाही. सरकारने नियमाचे व कायदेशीर प्रक्रियेचा भंग केला, असे म्हणत उच्च न्यायालयाने केडीएमसीच्या हद्दीतील १८ गावे वगळण्याचा राज्य सरकारचा निर्णय अवैध ठरवला, तसेच १८ गावांची प्रस्तावित नगरपरिषद स्थापण्याची प्राथमिक अधिसूचनाही रद्द केली.राज्य सरकारने केडीएमसीच्या हद्दीतून २७ पैकी ९ गावे पालिकेतच ठेवली व १८ गावे पालिकेतून वगळली. २४ जून, २०२० रोजी त्याबाबत अंतिम अधिसूचना काढली. त्याच दिवशी राज्य सरकारने उर्वरित १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापण्याबाबत प्राथमिक अधिसूचना काढली.या दोन्ही अधिसूचनांना संदीप पाटील यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यांनी ॲड.डी. एस. म्हैसपूरकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. याचिकेनुसार, कायद्याप्रमाणे महापालिकेत समाविष्ट केलेल्या गावांना नगरपरिषदेत समाविष्ट करता येत नाही, तसेच केंद्र सरकारच्या जनगणनेनुसार या गावांतील लोकांची गणती महापालिकेत झाली आहे. त्यावर मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने याला पालिकेची संमती आहे का? अशी विचारणा सरकारकडे केली.त्यावर सरकारी वकील  बी. सावंत यांनी पालिकेची संमती असल्याचे न्यायालयाला सांगितले. मात्र, तसा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर केला नसल्याची बाब न्यायालयाने सरकारच्या निदर्शनास आणली.२०१५ ते २०२० पर्यंत गावे वगळण्याची प्रक्रिया खोळंबली होती. त्याबाबत पालिकेने आक्षेप घेतला नाही. त्यानंतर राज्य सरकारने प्रक्रिया सुरू केल्यानंतर केडीएमसी आयुक्तांनी ९ गावे पालिकेत ठेवण्याची व १८ गावे वगळण्याची शिफारस सरकारला केली. ही एक प्रकारची मंजुरीच आहे. सर्वसाधारण सभा आणि आयुक्त यांचा निर्णय वेगळा नाही, असा युक्तिवाद सावंत यांनी केला. त्यावर न्यायालयाने सरकारने सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता १८ गावांना या महापालिकेच्या हद्दीतून वगळण्याचा घेतलेला निर्णय हा निव्वळ अवैधच असल्याचे म्हटले. सरकारने कायदेशीर  प्रक्रियेचा भंग केला आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकारने काढलेल्या दोन्ही अधिसूचना रद्द केल्या.२७ गावांचा २०१५ पासूनचा प्रस्ताव कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) हद्दीतून २७ गावे वगळण्याचा प्रस्ताव २०१५ पासून सरकार दप्तरी धूळखात होता. राज्य सरकारने या संदर्भात काढलेल्या अधिसूचनेवर जनसुनावणी घेण्यात आली नव्हती.   त्यानंतर, ठाकरे सरकारने मार्च, २०२० मध्ये २७ गावे वगळण्यासंदर्भात अर्धवट राहिलेली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत २४ जून, २०२० रोजी केडीएमसीच्या हद्दीतून २७ पैकी ९ गावे पालिकेतच ठेवली व १८ गावे पालिकेतून वगळली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMumbai High Courtमुंबई हायकोर्ट