शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

खड्डे बुजविण्यावरील ‘तो’ खर्च वाया गेलेला नाही; केडीएमसीचे कानावर हात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 11:36 IST

"पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून पावसाने उघडीप घेताच १५ ऑक्टोबरपासून खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे."

कल्याण - कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यावर गेल्या आठ वर्षात ११४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र रस्त्यावरील खड्डे तसेच आहेत. यासंदर्भात महापालिकेच्या शहर अभियंत्यांनी तो खर्च वाया गेलेला नसल्याची माहिती दिली आहे. रस्ते दुरुस्तीवरील खर्च हा मागील वर्षाच्या नियमित खर्चापेक्षा ५० टक्के कमी झाला असल्याचे म्हटले आहे. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून पावसाने उघडीप घेताच १५ ऑक्टोबरपासून खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. सध्या खडी टाकून खड्डे भरले जात आहेत. एक महिन्याच्या कालावधीत सर्व रस्ते सुस्थितीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

शहर अभियंत्या सपना देवनपल्ली कोळी यांनी सांगितले आहे की, बांधकाम साहित्याच्या सरकारी दरसूचीत दरवर्षी ५ ते ७ टक्के इतकी दरवाढ होत असते. त्यात १२ टक्के जीएसटीचा समावेश आहे. महापालिकेने बहुतांश रस्ते सुस्थितीत ठेवले आहेत. गेल्या आठ वर्षात बांधकाम साहित्याच्या दरसूचीतील एकूण ४० टक्के आहे. महापालिकेचा परिघ हा खाडी आणि नदी किनाऱ्याने वेढलेला आहे. अतिवृष्टी आणि भरतीमुळे शहरातील बराचसा भाग पावसाळ्यात पाण्याखाली जातो. अशा परिस्थितीत डांबरी रस्ते खराब होतात.

शहरातील जून्या भागातील रस्ते विकास आराखड्यानुसार कमी रुंदीचे आहेत. रुंदीकरणावर मर्यादा आहेत. त्यावर वाहतूक जास्त आहे. त्यामुळे रस्ते खराब होतात. महापालिकेकडे निधीची कमतरता आहे. डांबरी रस्त्याचे दर तीन वर्षाने पुनरदुरुस्ती करण केले गेले पाहिजे. कॉन्क्रीट रस्त्याचा खर्च डांबरी रस्त्यांपेक्षा चारपट जास्त आहे. सरकारने दिलेल्या निधीतून काही रस्ते कॉन्क्रीटीकरणाचे करण्यात आलेले आहेत. महापलिका हद्दीत ४४० किलोमीटर लांबीच्या रस्त्यापैकी ३७५ किलोमीटर लांबीचे रस्ते हे डांबरी रस्ते आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ३६० कोटी रुपयांचा निधी रस्ते कॉन्क्रिटीकरणासाठी मंजूर केला आहे. ही कामे लवकर सुरू केली जाणार आहेत. ४७.५० किलोमीटरचे रस्ते हे अन्य प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतात. त्यामध्ये कल्याण शीळ रस्ता, डोंबिवली निवासी भागातील रस्ते, गोविंदवाडी बायपास, कल्याणमधील जुना आग्रा रोड यांचा समावेश आहे. पावसाळ्यापूर्वी बहुतांश रस्ते सुस्थितीत आणि खड्डेमुक्त होते. वालधूनी आणि एफ केबीन रेल्वे उड्डाणपूलावर मास्टीक शीट टाकून डांबरीकरण केले होते. हे काम आजही सुस्थितीत आहे.

२७ गावातील रस्ते नियोजनबद्ध विकसीत केलेले नाहीत. बहुतेक रस्ते खडीकरणाने केलेले आहेत. त्यालगत पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारेही नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात रस्ते वारंवार खराब होतात. 

 

टॅग्स :Potholeखड्डेkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली