शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

खड्डे बुजविण्यावरील ‘तो’ खर्च वाया गेलेला नाही; केडीएमसीचे कानावर हात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 11:36 IST

"पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून पावसाने उघडीप घेताच १५ ऑक्टोबरपासून खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे."

कल्याण - कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यावर गेल्या आठ वर्षात ११४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र रस्त्यावरील खड्डे तसेच आहेत. यासंदर्भात महापालिकेच्या शहर अभियंत्यांनी तो खर्च वाया गेलेला नसल्याची माहिती दिली आहे. रस्ते दुरुस्तीवरील खर्च हा मागील वर्षाच्या नियमित खर्चापेक्षा ५० टक्के कमी झाला असल्याचे म्हटले आहे. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून पावसाने उघडीप घेताच १५ ऑक्टोबरपासून खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. सध्या खडी टाकून खड्डे भरले जात आहेत. एक महिन्याच्या कालावधीत सर्व रस्ते सुस्थितीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

शहर अभियंत्या सपना देवनपल्ली कोळी यांनी सांगितले आहे की, बांधकाम साहित्याच्या सरकारी दरसूचीत दरवर्षी ५ ते ७ टक्के इतकी दरवाढ होत असते. त्यात १२ टक्के जीएसटीचा समावेश आहे. महापालिकेने बहुतांश रस्ते सुस्थितीत ठेवले आहेत. गेल्या आठ वर्षात बांधकाम साहित्याच्या दरसूचीतील एकूण ४० टक्के आहे. महापालिकेचा परिघ हा खाडी आणि नदी किनाऱ्याने वेढलेला आहे. अतिवृष्टी आणि भरतीमुळे शहरातील बराचसा भाग पावसाळ्यात पाण्याखाली जातो. अशा परिस्थितीत डांबरी रस्ते खराब होतात.

शहरातील जून्या भागातील रस्ते विकास आराखड्यानुसार कमी रुंदीचे आहेत. रुंदीकरणावर मर्यादा आहेत. त्यावर वाहतूक जास्त आहे. त्यामुळे रस्ते खराब होतात. महापालिकेकडे निधीची कमतरता आहे. डांबरी रस्त्याचे दर तीन वर्षाने पुनरदुरुस्ती करण केले गेले पाहिजे. कॉन्क्रीट रस्त्याचा खर्च डांबरी रस्त्यांपेक्षा चारपट जास्त आहे. सरकारने दिलेल्या निधीतून काही रस्ते कॉन्क्रीटीकरणाचे करण्यात आलेले आहेत. महापलिका हद्दीत ४४० किलोमीटर लांबीच्या रस्त्यापैकी ३७५ किलोमीटर लांबीचे रस्ते हे डांबरी रस्ते आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ३६० कोटी रुपयांचा निधी रस्ते कॉन्क्रिटीकरणासाठी मंजूर केला आहे. ही कामे लवकर सुरू केली जाणार आहेत. ४७.५० किलोमीटरचे रस्ते हे अन्य प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतात. त्यामध्ये कल्याण शीळ रस्ता, डोंबिवली निवासी भागातील रस्ते, गोविंदवाडी बायपास, कल्याणमधील जुना आग्रा रोड यांचा समावेश आहे. पावसाळ्यापूर्वी बहुतांश रस्ते सुस्थितीत आणि खड्डेमुक्त होते. वालधूनी आणि एफ केबीन रेल्वे उड्डाणपूलावर मास्टीक शीट टाकून डांबरीकरण केले होते. हे काम आजही सुस्थितीत आहे.

२७ गावातील रस्ते नियोजनबद्ध विकसीत केलेले नाहीत. बहुतेक रस्ते खडीकरणाने केलेले आहेत. त्यालगत पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारेही नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात रस्ते वारंवार खराब होतात. 

 

टॅग्स :Potholeखड्डेkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली