शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : रोगापेक्षा इलाज भयंकर! लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरूच, नागरिकांनी व्यक्त केला संताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 18:52 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : लसीकरण करणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती कल्याण-डोंबिवलीकरांची झाली असल्याचे सांगत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आहे. 

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत लसीकरण मोहिमेचा सावळा गोंधळ  वारंवार समोर येत आहे. टप्प्याटप्प्याने लस प्राप्त होत असल्याने लसीकरण केंद्रही बंद ठेवावी लागत आहे. अशातच लसीकरण केंद्र आणि केडीएमसी प्रशासन यांच्यात देखील योग्य समन्वय नसल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कल्याणातील गुरूनानक लसीकरण केंद्रावरही गुरुवारी सकाळी अचानक नागरिकांना लस प्राप्त न झाल्याचे सांगत पुन्हा जाण्यास सांगितले. यामुळे पहाटेपासून लसीकरणासाठी उभ्या असलेल्या नागरिकांचा संताप अनावर झाला. आता लसीकरण करणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती कल्याण डोंबिवलीकरांची झाली असल्याचे सांगत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आहे. 

गुरुवारी कल्याणातील गुरुनानक हायस्कूल लसीकरण केंद्रावर कुपन घेण्यासाठी पहाटे 3 वाजल्यापासून जवळपास 300 नागरिक उभे होते. मात्र सकळी साडेसात वाजता अचानक लस उपलब्ध झाली नसल्याने लसीकरण होणार नाही असे सांगण्यात आले. या गलथान कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लसीकरण होणार नाही याची महिती  आदल्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी देणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया केंद्रावर उपस्थित असलेल्या संबंधीतांसमोर व्यक्त केल्या. यावर आम्हाला महापालिका प्रशासनाने  सकाळी लस संपल्याची माहिती दिली असे सांगण्यात आले. या सर्व प्रकारामुळे  केडीएमसी प्रशासन आणि लसीकरण केंद्र नागरिकांसोबत उंदीर - मांजराचा खेळ खेळत आहेत का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.  

लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वात जास्त फटका बसला. केडीएमसीचे आरोग्य विभागाचे आर. सी. एच. ऑफीसर डॉ. संदीप निंबाळकर यांना विचारले असता लशींचा साठा अनेकदा रात्री उशीरा किंवा सकाळी प्राप्त होतो. लसीकरणाची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे वेळोवेळी दिली जाते व तसे बोर्ड देखील केंद्राबाहेर लावले जातात असे सांगत प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. 

लसीकरण करणे हे महत्वाचे झाले आहे. लसींचा साठा कमी असल्याने अडचणी येत आहे हे मान्य आहे. मात्र लसीकरण केंद्र व पालिका प्रशासन यांच्यात योग्य तो समन्वय असणे गरजेचे आहे. कारण अनेक नागरिक सुट्टी घेऊन लसीकरण करत आहे. लस घेण्यासाठी आता खूप मनस्ताप सहन करावा लागत असल्याने रोगापेक्षा इलाज भयंकर असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. 

-  प्रतीक्षा वाराणकर, नागरिक 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या