शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

Corona Vaccine : रोगापेक्षा इलाज भयंकर! लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरूच, नागरिकांनी व्यक्त केला संताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 18:52 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : लसीकरण करणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती कल्याण-डोंबिवलीकरांची झाली असल्याचे सांगत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आहे. 

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत लसीकरण मोहिमेचा सावळा गोंधळ  वारंवार समोर येत आहे. टप्प्याटप्प्याने लस प्राप्त होत असल्याने लसीकरण केंद्रही बंद ठेवावी लागत आहे. अशातच लसीकरण केंद्र आणि केडीएमसी प्रशासन यांच्यात देखील योग्य समन्वय नसल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कल्याणातील गुरूनानक लसीकरण केंद्रावरही गुरुवारी सकाळी अचानक नागरिकांना लस प्राप्त न झाल्याचे सांगत पुन्हा जाण्यास सांगितले. यामुळे पहाटेपासून लसीकरणासाठी उभ्या असलेल्या नागरिकांचा संताप अनावर झाला. आता लसीकरण करणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती कल्याण डोंबिवलीकरांची झाली असल्याचे सांगत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आहे. 

गुरुवारी कल्याणातील गुरुनानक हायस्कूल लसीकरण केंद्रावर कुपन घेण्यासाठी पहाटे 3 वाजल्यापासून जवळपास 300 नागरिक उभे होते. मात्र सकळी साडेसात वाजता अचानक लस उपलब्ध झाली नसल्याने लसीकरण होणार नाही असे सांगण्यात आले. या गलथान कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लसीकरण होणार नाही याची महिती  आदल्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी देणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया केंद्रावर उपस्थित असलेल्या संबंधीतांसमोर व्यक्त केल्या. यावर आम्हाला महापालिका प्रशासनाने  सकाळी लस संपल्याची माहिती दिली असे सांगण्यात आले. या सर्व प्रकारामुळे  केडीएमसी प्रशासन आणि लसीकरण केंद्र नागरिकांसोबत उंदीर - मांजराचा खेळ खेळत आहेत का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.  

लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वात जास्त फटका बसला. केडीएमसीचे आरोग्य विभागाचे आर. सी. एच. ऑफीसर डॉ. संदीप निंबाळकर यांना विचारले असता लशींचा साठा अनेकदा रात्री उशीरा किंवा सकाळी प्राप्त होतो. लसीकरणाची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे वेळोवेळी दिली जाते व तसे बोर्ड देखील केंद्राबाहेर लावले जातात असे सांगत प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. 

लसीकरण करणे हे महत्वाचे झाले आहे. लसींचा साठा कमी असल्याने अडचणी येत आहे हे मान्य आहे. मात्र लसीकरण केंद्र व पालिका प्रशासन यांच्यात योग्य तो समन्वय असणे गरजेचे आहे. कारण अनेक नागरिक सुट्टी घेऊन लसीकरण करत आहे. लस घेण्यासाठी आता खूप मनस्ताप सहन करावा लागत असल्याने रोगापेक्षा इलाज भयंकर असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. 

-  प्रतीक्षा वाराणकर, नागरिक 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या