शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे २८ हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 00:53 IST

महापालिका हद्दीत सुरुवातीला १० हॉटस्पॉट होते. त्यानंतर हा आकडा ३२ वर पोहचला. हॉटस्पॉट असलेल्या प्रभागात कडक निर्बंध लादले होते.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवलीत पुन्हा कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका हद्दीत पुन्हा २८ हॉटस्पॉट तयार झालेले आहेत. यात डोंबिवली शहर आघाडीवर आहे. यामुळे सुशिक्षितांच्या डोंबिवलीत कोरोनाचे नियम पाळले जात नाही का, असा सवाल यानिमित्ताने केला जात आहे. डोंबिवलीतून मुंबई उपनगरात नोकरीच्या निमित्ताने मुंबईला जास्त प्रमाणात प्रवास केला जातो. तर कल्याण जंक्शन असलेल्या रेल्वेस्थानकातून लाखो लोक प्रवास करीत आहेत. रेल्वेसह अन्यही बरीच कारणे कोरोनावाढीस जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महापालिका हद्दीत सुरुवातीला १० हॉटस्पॉट होते. त्यानंतर हा आकडा ३२ वर पोहचला. हॉटस्पॉट असलेल्या प्रभागात कडक निर्बंध लादले होते. आताच्या २८ हॉटस्पॉटमध्ये डोंबिवलीतील जयहिंद कॉलनी, गणेशनगर गरिबाचा वाडा, गावदेवी मंदिर, संतोषी माता मंदिर, देवी चौक, शास्त्रीनगर, भागशाळा मैदान, रामनगर, म्हात्रेनगर, खंबाळपाडा, सावरकर रोड, एकतानगर, देसलेपाडा, एमआयडीसी, ठाकूरवाडी, राजूनगर, आनंदवाडी, पाथर्ली या परिसराचा तर कल्याणमध्ये वायलेनगर, खडकपाडा, गंधारी, रामबाग, श्रीकॉम्प्लेक्स, शास्त्रीनगर, चिंचपाडा, तिसगाव या परिसराचा समावेश आहे.  

सोयीसुविधांमुळे लोकांमध्ये वाढली बेफिकिरी 

मागच्या वर्षी कोरोनाचा कहर झाला तेव्हा महापालिका हद्दीत आरोग्याच्या सेवासुविधा अपुऱ्या होत्या. त्यानंतर आरोग्याचा जंबो सेटअप उभारून कोविड केअर सेंटरपासून रुग्णालये सुरू करून टेस्टिंग सेंटर वाढविली आहेत. ॲन्टिजेन व आरटीपीसीआर या दोन्ही टेस्टची सुविधा केली असून कोरोना लसीकरणही सुरू आहे. या सगळ्या सोयीसुविधांमुळे नागरिकांमध्ये कोरोनाचे भय राहिले नसून त्यांच्यात बेफिकीरीपणा दिसून येत आहे. सोशल डिस्टन्सिंग न पाळता गर्दी केली जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा कामाला लागू शकतात. प्रसंगी राज्यासह महापालिकेत पुन्हा एकदा दहा दिवसांचा कडक स्वरूपाचा लॉकडाऊन लागू करण्याचा कठोर निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. 

लग्न समारंभ अथवा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमातून  परतल्यावर लोकांची कोरोना चाचणी केल्यास ती हमखास पॉझिटिव्ह येत आहे. परिणामी नागरिकांनी लग्न सभारंभ आणि पार्ट्यांमध्ये सहभागी होणे टाळावे, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या  आरोग्य विभागाने नागरिकांना केले आहे. 

सभारंभ, पार्ट्यांमुळे वाढतोय कोरोना

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : लग्न सभारंभ आणि पार्ट्यांमुळे कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याची कबुली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. येत्या १० दिवसांत परिस्थिती न बदलल्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा सूर्यवंशी यांनी दिला आहे.मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव मनपा हद्दीत सुरू झाला. त्यावेळी डोंबिवलीतील एका लग्न सभारंभातून कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. आता पुन्हा मनपा हद्दीत लग्न सभारंभ आणि पार्ट्या जोमात सुरू आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. शहरात होणारे लग्न समारंभ, पार्ट्या आणि सोशल गॅदरिंगवर मनपासह पोलिसांची करडी नजर आहे. यापूर्वी मनपाच्या पुढाकाराने सोशल गॅदरिंगप्रकरणी तीन जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, सोशल गॅदरिंग शहरात कमी असले तरी आता लग्नसराई आहे. कोरोना असला तरी नातेवाइकांच्या लग्नासाठी कल्याण-डोंबिवलीतील नागरिक जैयपूर, अहमदाबाद, अमरावती, इंदौर येथे जात आहेत. 

रुग्णसंख्या रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणार  एका इमारतीत कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्यास इमारतीमधील सर्वच रहिवाशांची रॅपिड ॲण्टिजेन चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी इमारतीमधील रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले जात आहे. कोरोनाची वाढती संख्या रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात येणार आहे. एका रुग्णामागे २० जणांची कोरोना चाचणी केली जाणार आहेत. 

रॅपिड ॲण्टिजेन चाचणीचेही प्रमाण वाढविले जाणार आहे. मनपा हद्दीत ३२ टेस्टिंग सेंटर आहेत. तेथे दोन्ही प्रकारच्या चाचण्या करण्यात येत आहेत. १० दिवसांत रुग्णांची संख्या कमी न झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका